एक्स्प्लोर

113 वर्ष जुन्या गेट वे ऑफ इंडियाला तडे? ऑडिटनुसार दर्शनी भागात भेगा

Gateway Of India Mumbai : गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू फक्त मुंबईचीच नाही. तर अवघ्या देशाची ओळख.

Gateway Of India Mumbai : मुंबई म्हंटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर जी दृष्य येतात ती म्हणजे अथांग अरबी समुद्राच्या काठावर असलेल्या गेट वे ऑफ इंडियाची. मुंबई शहराचा मानबिंदु म्हणून गेट वे ऑफ इंडियाकडे बघितलं जातं. 113 वर्षांपासून समुद्राच्या लाटा आणि वादळांचा सामना करत ही वास्तू आजही दिमाखात उभी आहे.   मात्र, याच गेट वे ऑफ इंडियाला तडे गेल्याचं समोर आलं आहे. पाहूयात काय आहे हे संपूर्ण प्रकरण?  

113 वर्ष जुन्या गेट वे ऑफ इंडिया या वास्तूला तडे गेल्याचं समोर आले आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये तडे पडल्याचं निष्पन्न झाले आहे. 'गेट वे'च्या जिर्णोधाराचा प्रस्ताव सरकार मान्य करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू फक्त मुंबईचीच नाही. तर अवघ्या देशाची ओळख. 1911 साली इंग्रजांनी या वास्तूची निर्मिती केली. आणि 1924 साली सर्वसामान्यांसाठी खुली केली. पण, 100 वर्षांपेक्षा जास्त जुन्या वास्तूला तडा गेलाय...मुंबई जवळून जाणाऱ्या प्रत्येक चक्रीवादळावेळी गेट वेनं उंच उंच लाटा झेलल्या.. पण, यावेळच्या वादळानंतर..एक अत्यंत महत्वाची गोष्ट निदर्शनास आली. ती म्हणजे गेल्या वर्षीच्या चक्रीवादळात वास्तूचं नुकसान झाल्याचं दिसलं. याप्रकरणी मागील आठवड्यात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. 

 गेट वे ऑफ इंडियाच्या इमारतीला खरंच, तडे गेलेत का?

1911 सालची ही वास्तू 1924 मध्ये लोकांकरीता खुली करण्यात आली होती. नुकतंच गेट वे ऑफ इंडियाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं. त्याच ऑडिटनुसार इमारतीवर दर्शनी भागात भेगा गेल्याचं दिसलं. वास्तूवर अनेक ठिकाणी वनस्पतींही वाढल्याचं दिसलं. दुसरीकडे, डोममधील वॉटरप्रूफिंग आणि सिमेंट काँक्रीटचे देखील नुकसान झालं आहे.  

त्यानंतरच राज्याच्या पुरातत्व आणि वास्तुसंग्रहालय संचालनालयानं 6.9  कोटींचा जीर्णोध्दारासाठीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केलाय. जो अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गेट वे ऑफ इंडिया वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो. इंग्लंडचा राजा पाचवा जाॅर्ज यांच्या भेटीस्मरणार्थ हे प्रवेशद्वार उभारलं गेलं होतं. स्वातंत्र्यानंतर ब्रिटीश साम्राज्याच्या शेवटच्या सैनिकांनी भारत सोडला तेव्हा ते या संरचनेतून गेलेहोते. ज्यानंतर भारतातील ब्रिटीश साम्राज्याचे वर्चस्व संपुष्टात आलं होतं.  भारताचं प्रवेशद्वारे समजल्या जाणाऱ्या ह्या शहरानं ही वास्तू जपली आहे.  अनेक चित्रपटातून ही वास्तू लोकांच्या घराघरातआणि मनात देखील पोहोचली. मात्र, सध्याला ही वास्तू धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल समोर आलाय. त्यामुळे सरकारआता याप्रकरणी काय पाऊलं उचलतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Land Scam: एकनाथ खडसेंना ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागला तोच व्यक्ती पार्थ पवारांच्या प्रकरणात सामील, आता हिशेब चुकता करणार, नेमकं प्रकरण काय?
एकनाथ खडसेंना ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागला तोच व्यक्ती पार्थ पवारांच्या प्रकरणात सामील, आता हिशेब चुकता करणार, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: सर्व निवडणुका सोबत लढवणार; Satej Patil, Vinayak Raut बैठकीला हजर
Railway Crackdown: CSMT स्टेशनवर आंदोलनावर कायमची बंदी, 'मोटारमन लॉबी'त आता No Protests
BMC Elections: भाजपच्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली, 'रिपोर्ट कार्ड'च्या आधारावर तिकीट वाटप?
Land Scam Allegation: '200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली', Pratap Sarnaik यांच्यावर गंभीर आरोप
Mundhwa Land Scam: कंपनीत 99% भागीदारी, तरी Parth Pawar यांच्यावर गुन्हा का नाही? विरोधकांचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar Land Scam: एकनाथ खडसेंना ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागला तोच व्यक्ती पार्थ पवारांच्या प्रकरणात सामील, आता हिशेब चुकता करणार, नेमकं प्रकरण काय?
एकनाथ खडसेंना ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागला तोच व्यक्ती पार्थ पवारांच्या प्रकरणात सामील, आता हिशेब चुकता करणार, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Ryan Williams : भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
Devendra Fadnavis & Ajit Pawar: माझ्या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, पुणे जमीन घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
माझ्या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
Embed widget