एक्स्प्लोर
मुंबईत टकटक गँगचा धुमाकूळ : जितेंद्र आव्हाड
सभागृहात कायदा आणि सुव्यवस्था विषयावर चर्चा सुरु असताना, मुंबईतील पवई परिसरात टकटक गँगने धुमाकूळ घातल्याचं जितेंद्र आव्हाड सांगितलं.

मुंबई : मुंबईत टकटक गँगचा धुमाकूळ झाला असून आतापर्यंत 1200 मोबाईल फोन चोरीला गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहेत. ते विधानसभेत बोलत होते. सभागृहात कायदा आणि सुव्यवस्था विषयावर चर्चा सुरु असताना, मुंबईतील पवई परिसरात टकटक गँगने धुमाकूळ घातल्याचं जितेंद्र आव्हाड सांगितलं. टकटक गँगच्या चोरीचा फंडा ट्रॅफिकमध्ये एखाद्या कारच्या खिडकीच्या काचेवर या गँगचे लोक टकटक करतात. चालकाने काच खाली केल्यावर त्याला बोलण्यात गुंतवतात. इतक्यात टोळीचा आणखी एक जण दुसऱ्या काचेवर टकटक करतो. तेवढ्यात पहिला चोर गाडी चालकाचा मोबाईल फोन घेऊन पसार होतो. अशाप्रकारे 1200 मोबाईल फोनची चोरी झाल्याची नोंद असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
Before You Go
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती






















