एक्स्प्लोर

Coronavirus cases : मुंबईसाठी पॉझिटिव्ह बातमी, पहिल्यांदाच शून्य कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai Coronavirus cases : तब्बल 34 महिन्यानंतर मुंबईमध्ये शून्य कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

Mumbai Coronavirus cases : मुंबईकरांसाठी पॉझिटिव्ह बातमी समोर आली आहे. तब्बल 34 महिन्यानंतर शहरात शून्य कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 16 मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. दोन वर्षापूर्वी मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांचा स्फोट झाला होता, त्यामुळे राज्याच्या चिंतेत वाढ झाली होती. धारावी, दादर, कुर्ला या गर्दीच्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. पण आज मुंबई शहरात एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. मुंबईसाठी पॉझिटिव्ह बातमी आहे. 

मुंबईत किती सक्रिय रुग्ण?

मुंबईमध्ये आज एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. ही दिलासादायक बातमी आहे. पण मुंबईत सध्या 23 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 1154317 इतक्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1134547 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 19747 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई पालिकेला यश -

मार्च 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बाधित रुग्ण संख्या 21 हजारांच्या घरात पोहोचली होती, तर कोरोनामुळे रोज मृत्यू होण्याची संख्या 100 च्या घरात पोहोचली होती. मात्र राज्य सरकार व मुंबई महापालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईत धडकलेल्या कोरोनाच्या तिन्ही लाटा परतवण्यात पालिका यश आले. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा उसळल्या असून ओमायक्राॅन बीएफ 7, एक्सबीबी, एक्सबीबी 1.5 असे नवनवीन व्हेरिएंटचा शिरकाव मुंबईत झाला. मात्र पालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे.  

आज कुठे रुग्ण आढळले?

राज्यात आज आठ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. केडीएमसी, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, जालना आणि वाशिम येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. तर नाशिक मनपामध्ये आज दोन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात इतर ठिकाणी एकाही कोरोना रुग्णांची नोंद नाही. 

राज्यात किती सक्रिय रुग्ण?

महाराष्ट्र आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 110 सक्रिय रुग्ण आहेत. आज राज्यात आठ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा आहे. आज 15 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 79,88,545 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.17 % एवढे झाले आहे.

 
भारतातली लसीकरण किती?

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.30 कोटी लस मात्रा ( 95.16 कोटी दुसरी मात्रा आणि 22.57 कोटी वर्धक मात्रा रुपात) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 2,18,324 लस मात्रा देण्यात आल्या. भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,931 आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.01% आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.81% आहे. गेल्या 24 तासात 90  रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती  4,41,49,436 वर पोचली.

गेल्या 24 तासात 89 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत एकूण 91.45  कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,61,679 चाचण्या करण्यात आल्या. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.06 %  इतका आहे. तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.08% इतका आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
आंदोलन का झालं, का नाही याचं उत्तर माझ्याकडं नाही, पण डोळे मिटून मी जेनझीवर विश्वास ठेवेन : मोहन भागवत
आंदोलन का झालं, का नाही याचं उत्तर माझ्याकडं नाही, पण डोळे मिटून मी जेनझीवर विश्वास ठेवेन : मोहन भागवत
CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget