एक्स्प्लोर

Mumbai Municipal Corporation Election 2021: मुंबई पालिकेसाठी काँग्रेसचा 100 दिवसांचा प्रोग्राम, 227 जागांसाठी प्रयत्न : भाई जगताप

येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस सर्व जागा लढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुंबई काँग्रेस (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी सांगितलं. तसेच मुंबई कॉंग्रेसने 100 दिवसाचा कार्यक्रम तयार केला असून त्या माध्यमातून सर्व 227 वार्डात पोहचण्याचं नियोजन करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रसने 100 दिवसांचा कार्यक्रम तयार केला असून त्या माध्यमातून लोकांना विश्वास देणार असल्याचं मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. महापालिका निवडणुकीत पक्षाने किती जागा लढवायच्या हे हायकमांड ठरवेल पण आम्ही सर्व 227 जागा लढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही भाई जगताप यांनी स्पष्ट केलं.

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा!

भाई जगताप म्हणाले की, "कॉंग्रेस पक्ष येत्या 100 दिवसात महापालिकेच्या सर्व 227 वार्डापर्यंत पोहचणार आहे. मागील 15 वर्षामध्ये आम्ही या वार्डामध्ये निवडणूक लढलो आहे. आता सर्व जागा लढवण्याची भूमिका आमची आहे. मागील काही वर्षांमध्ये जे लोक काँग्रेस सोडून गेलेत त्याची आम्ही घरवापसी करणार आहोत."

मुंबईत स्वबळावर लढणारी काँग्रेस नवी मुंबईत मात्र महाविकास आघाडीबरोबर जाणार

भाई जगताप पुढे म्हणाले की, "मुंबईतील पाचशे स्क्वेअर फिटच्या घरांना टॅक्स माफ करण्यासंदर्भातला शासन निर्णय भारतीय जनता पार्टीने दोन वेळा काढून त्याचा फायदा हा निवडणुकीसाठी उचलला होता. तत्कालीन सरकारने जो शासन निर्णय घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी या सरकारने करावी. तसेच मुंबई परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी माफिया मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यांच्यापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मोफत पाणीपुरवठा करावा."

'मुंबई सेंट्रल टर्मिनस'ला 'नाना शंकरशेठ टर्मिनस' यांचेच नाव का?

भाई जगताप पुढे म्हणाले की, "जनगणना अधिनियमानुसार 10 वर्षानी आरक्षण बदलायचे. आता ते आरक्षण 5 वर्षांनी बदलते. 2012 नंतर दर 5 वर्षांनी वॉर्ड रचना बदलत आहे. त्यामुळे संबंधित परिसरात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं नुकसान होतय. हे नुकसान टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे दहा वर्षांनीच आरक्षणात बदल करावा अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे."

सध्या बोरिवली ईस्टमध्ये 92 कोटी खर्च करुन स्काय वॉक बांधण्यात येत आहे, त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. या पूर्वी मुंबईत तयार झालेल्या स्काय वॉकचा वापर नागरिकांना किती होतो हा संशोधनाचा विषय आहे. मग हा स्काय वॉक का बनवला जात आहे ? त्याचा वापर कोणीही करत नाही, त्या ठिकाणी वेगळ्याच गोष्टी सुरु असतात. हा स्काय वॉक रद्द करा अशी मागणी देखील मुंबई काँग्रेसने केली असल्याचं भाई जगताप यांनी सांगितलं.

'मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'; शिवसेनेकडून गुजराती समाजाचा मेळावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget