एक्स्प्लोर

मुंबईत खाऊ गल्ल्या बंद ठेवल्यावरुन जरांगे पाटीलही संतापले, आधी रोहित पवारांनी शेअर केली होती चिठ्ठी

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय?

मुंबई : आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे. परंतु, राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल, असे म्हणत आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी मुंबईतील (Mumbai) खाऊ गल्ल्या आज बंद ठेवल्यावरुन संताप व्यक्त केला आहे. एकीकडे हजारोंच्या संख्येने लाखापेक्षा जास्त मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदान, हायकोर्ट आणि सीएसएमटी परिसरात ठिय्या मांडून आहेत. मुंबईतील आझाद मैदानात 5000 आंदोलकांनाच परवानगी देण्यात आली होती. मात्र, मोठ्या संख्येने मराठा (Maratha) बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, त्यांची गैरसोय व्हावी म्हणून खाऊ गल्ल्या बंद ठेवल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला आहे.  तर, जरांगे पाटील यांनीही आपल्या पत्रकार परिषदेत हॉटेल्स, टपऱ्या बंद ठेवल्यावरुन संताप व्यक्त केला.   

मुंबईत आमचे पोरं आले म्हणून तुम्ही टपऱ्या बंद करणार, हॉटेल्स बंद करणार, सगळं पाण्याचं बंद करणार. मग, आम्ही पण तुमच्या सभा आमच्या इथं आल्यावर पाईपलाईनीतून त्या दिवशी पाणी बंद करणार अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. तुमच्या रेस्ट हाऊसचही पाणी बंद करू, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मुंबईत हॉटेल्स, खाऊ गल्लीत बंद असलेल्या टपऱ्यांवरुन संताप व्यक्त केला. तत्पूर्वी, रोहित पवार यांनीही ट्विट केलं होतं. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान, रोहित पवारांनी एक चिठ्ठीही शेअरे केली असून त्यामध्ये खाऊ गल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिल्याचं म्हटलं आहे. 

या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा असे म्हणत रोहित पवार यांनी मनोज जरांगेंच्या पहिल्या आंदोलनाची आठवणही करुन दिली. 

मुंबईत मराठा बांधवांसाठी जेवण

दरम्यान, राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून आपल्यासोबत भाकरी, चपात्या, भाजी, तिखट गरम पुऱ्या, चिवडा असे पदार्थ सोबत आणले आहेत. तर, काही मराठा बांधवांसाठी मुंबईतील समाजबांधवांनी खाण्या-पिण्याची सोय केली आहे. मात्र, आंदोलनस्थळाजवळ असलेल्या 2-3 खाऊ गल्ल्या बंद ठेवण्यात आल्याने आंदोलकांना हॉटेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, तसेच जवळील भागात रस्त्यावरच सहज उपलब्ध होईल, असे अन्नपदार्थ मिळणार नाहीत, हेच दिसून येत आहे. 

हेही वाचा

Gunratna Sadavarte: मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, ठाकरेंवरही कारवाई व्हावी; गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांत धाव

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena vs BJP : भाजप-शिवसेनेची राज्यात मैत्री, पण नगरपालिकेत कुस्ती? Special Report
Donkey soap : गाढविणीच्या दुधाने अंघोळ, काय असतं खास? Special Report
Periods Leave Policy : कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports
Iran : इराणमध्ये फाशीचं सत्र, दहा महिन्यात 1000 जण फासावर Special Report
Celebrity Marriage : अब्जाधीश वामसी गदिराजूंचा डोळे दीपवणारा लग्नसोहळा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
Sunil Shelke : मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
Yugendra Pawar : आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
IPL :राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठा निर्णय घेणार
राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Embed widget