एक्स्प्लोर

BDD : लाज वाटली पाहिजे असा कारभार सुरू, 70 हजार चौ. फुटांचा भाव असताना बीडीडीतील लोकांना फुकटात मेंटेनन्स फ्री घरं देताय? हायकोर्टाचा सवाल

Naigaon BDD : करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी थांबवत, जनतेत निर्माण होणारी आर्थिक दरी दूर करण्यासाठी प्रयत्न करा असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

Mumbai High Court On Naigaon BDD Chawl : 'लाज वाटली पाहिजे, असा कारभार सध्या राज्यात सुरूय' हे कडक ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी राज्य सरकारवर ओढलेत. दादर, वरळीत घर घेताना 70 हजार रूपये प्रति चौ. फुटाला मोजावे लागतायत आणि बीडीडीतील भाडेकरुंना फुकट घरं देत आहात, सोबत त्यांना 12 वर्षे मेंटनन्स फ्रीची खैरातही दिली जात आहे. हे योग्य नाही, या शब्दांत हायकोर्टानं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. बीडीडी पुनर्विकासासाठी नायगाव येथील घरं रिकामी करण्याच्या प्रक्रियेला दिलेली अंतरिम स्थगिती हायकोर्टानं मंगळवारी उठवली आहे. तसेच ही घरं रिकामी करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश देत यासंदर्भातील याचिका निकाली काढली आहे.

हायकोर्टाचा संताप का?

राज्य शासनची हल्लीची धोरणं नागरिकांमध्ये फूट पाडणारी आहेत. एकाला एक तर दुसऱ्याला वेगळा न्याय अशा प्रकारे कारभार सुरूय. करदात्यांची पैशांची नुसती उधळपट्टी सुरु आहे. कशासाठी सुरु आहे हे सर्व?, आज मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कर्जत, कसाऱ्याला राहणारेही मेंटनन्स भरतात, मग मुंबईत एखादा पुनर्विकास केल्यानंतर कोणत्या अधिकाराखाली तुम्ही मेंटेनन्स फ्री ची सवलत देता?. मेंटेनन्स फ्रीची सवलत देणंच मुळात बेकायदा आहे. हे राज्यघटनेला अनुसरुन नाही, असं वेळोवेळी न्यायालयानं सांगितलेलं आहे. तरीही कायदे मंडळ चुकीचे कायदे करुन नागरिकांमध्ये एकप्रकारे दरी निर्माण करण्याचं काम करतं आहे. म्हणजे घरासाठी पै पै जोडणारा मेंटनन्स भरणारा भरत चाललाय आणि फुकट घर मिळणाऱ्याला शासनाकडून सवलत दिली जाणार?, हा कुठला नियम असे खडेबोल हायकोर्टानं सुनावलेत. 

काय आहे प्रकरण?

नायगाव येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरु आहे. त्यासाठी इथली घरं रिकामी करण्याचं काम सुरु आहे. सध्या पावसाळा सुरुय, मुलांच्या शाळाही सुरुयत. त्यामुळे तूर्तास तरी 12 ते 16 'ब' बीडीडी इमारती रिकाम्या करु नये, अशी मागणी करणारी याचिका संदेश दयानंद मोहिते यांनी हायकोर्टात केली आहे. त्याची दखल घेत हायकोर्टानं पुढील आदेशांपर्यंत घरे रिकामी करण्याची प्रक्रिया करु नये, असे अंतरिम निर्देश दिले होते. यावरील सुनावणी मंगळवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर झाली. बीडीडी चाळीतील भाडेकरुंना मोफत घरे दिली जाणार आहेत व त्यांना 12 वर्षे मेंटनन्स फ्री असणार आहे, अशी माहिती म्हाडाचे वकील प्रकाश लाड यांनी हायकोर्टाला दिली. त्यावर हायकोर्टानं राज्य सरकारची चांगलीच कानउघडणी केली.

पुनर्विकास झालेल्या इमारतीला काही वर्षे मेंटनन्स फ्री असावा, अशी तरतूद विकास नियामावलीत आहे का?, अशी विचारणा हायकोर्टानं म्हाडाकडे केली. त्यावर अशी कोणतीच तरतूद नाही. पण राज्य शासनाच्या आदेशानुसार ही सवलत दिली जातेय, असं म्हाडाचे वकील प्रकाश लाड यांनी न्यायालयाला सांगितलं. याची नोंद घेत हायकोर्टानं या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत बीडीडी पुनर्विकासासाठी नायगाव येथील घरं रिकामी करण्याच्या प्रक्रियेला दिलेली अंतरिम स्थगिती उठवली. ही घरं रिकामी करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश देत संदेश मोहिते यांनाही बीडीडीतील घरं रिकामी करण्याचे निर्देश देत त्यांची याचिका निकाली काढली.

ही बातमी वाचा:

 

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget