एक्स्प्लोर

Mumbai : जी 20 परिषदेच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई चकाचक! मायानगरीचं रुपडं बदलणार

वर्षभरात संपूर्ण मुंबई बदलून टाकू, मात्र मुंबईकरांचं सहकार्य आवश्यक आहे, असं आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal)यांनी म्हटलं आहे. 

Mumbai G20 Meeting Update: यंदा आपल्या देशाला जी 20 (G 20) परिषदेचं यजमानपद मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु आहे.  वर्षभरात संपूर्ण मुंबई बदलून टाकू, मात्र मुंबईकरांचं सहकार्य आवश्यक आहे, असं आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal)यांनी म्हटलं आहे. 'स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई' करून संपूर्ण मुंबई बदलण्याचं काम बीएमसीकडून हाती घेण्यात आलं आहे. मात्र मुंबईचं रुपडे पालटण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करणे आणि जबाबदारी घेण्याचं मुंबई महापालिका आयुक्तांनी आवाहन केलं आहे. 

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जुलै ऑगस्टमध्ये आम्हाला सूचना दिल्या होत्या. मुंबईचा सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करायचा आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी गेटवे ऑफ इंडियाला 180 आणि नंतर अंधेरीत 310 सौंदर्यकरणाच्या प्रकल्पाचा उद्घाटन केलं. फक्त ठराविक भागच नाही तर पूर्ण मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे आणि हे आम्ही करून दाखवणार आहोत, असं आयुक्तांनी म्हटलं आहे. 

देशाचे प्रतिनिधी जी 20 परिषदेच्या बैठकीला मुंबईत येणार

विकसित आणि विकसनशील देशाचे प्रतिनिधी अधिकारी जी 20 परिषदेच्या बैठकीला मुंबईत येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचं रुपडं बदललं जाणार आहे. आपली तयारी सजावट ही एक छाप पाडून गेली पाहिजे, यासाठी आम्ही मागच्या दहा-बारा दिवसात हे काम पूर्ण करतोय आणि कुठली कसर आम्ही यामध्ये सोडणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. 

पाहुण्यांचं आदरातिथ्य करणे हे एक आपल्यासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे आणि त्यात आपण कुठेही कमी पडणार नाही.  ज्या भागांमध्ये या देशाचे प्रतिनिधी जात आहेत त्या भागांना आम्ही शोकेस केलेला आहे. सजावट केलेली आहे . त्यासोबतच आपल्या मुंबईची राज्याची संस्कृती, लोककला सुद्धा यामध्ये दाखवली जाणार आहे.  जी 20 परिषेदेसाठी जे सौंदर्यीकरण केलेले आहे ते सौंदर्य असंच टिकून राहू देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.  

500 सौंदर्यीकरणाचे प्रकल्प हाती घेतले आहे. त्यांचे भूमिपूजन झालं आहे त्यातील निम्मे तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आणखी बाराशे प्रकल्प आम्ही सुरू करत आहोत म्हणजे एकूण 1700 प्रकल्पाचे काम वर्षभरात पूर्ण करणार आहोत, असं चहल यांनी सांगितलं.  त्यामुळे पूर्ण मुंबई अशी स्वच्छ आणि सुंदर दिसेल मात्र लोकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असंही चहल म्हणाले.

ही बातमी देखील वाचा

G 20: पंतप्रधान म्हणाले, प्रत्येक राज्यांची विविधता दर्शवा; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं, परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार
संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
Embed widget