एक्स्प्लोर

Mumbai: दिवाळीच्या काळात फटाक्यांचा जोर आणि आगीच्या घटनांचा घोर: जाणून घ्या का?

दिवाळी दरम्यान आगीच्या घटना वर्षी दरवर्षी जोमाने वाढतात पण त्यातून मुक्त होऊन फायर-फ्री सेलिब्रेशन कसे करावे? हा एक मोठा प्रश्न आहे. 

Mumbai: दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात अग्निसुरक्षा आणि अग्निशमन निर्वासन हा नेहमीच एक प्रमुख चिंतेचा विषय राहिला आहे. शहरांतील पायाभूत सुविधा, अरुंद गल्ल्या, वाहतूक, खड्डे हे अशा आगीच्या अपघातांचे एक मोठे कारण आहे. दिवाळी दरम्यान आगीच्या घटना वर्षी दरवर्षी जोमाने वाढतात पण त्यातून मुक्त होऊन फायर-फ्री सेलिब्रेशन कसे करावे? हा एक मोठा प्रश्न आहे. 

मुंबई अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळीच्या काळात आगीच्या घटनांची संख्या हि जास्त आहे. गेल्या वर्षी मुंबई अग्निशमन दलाला 65 कॉल आले होते, तर यावर्षी फायर कॉल्सची संख्या 85 अशी आहे. हे फायर कॉल्स दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसांत मुंबईत नोंदवले गेले होते, त्यापैकी 37 किंवा जवळपास 44 टक्के फटाक्यांमुळे होते. खबरदारीच्या सूचना जारी करूनही मुंबईत आगीच्या अनेक घटना नोंद झाल्या. बाल्कनीतून किंवा उंच इमारतीच्या गच्चीवरती फटाके फोडण्याची एक रीत झाली आहे आणि त्यामुळे उंच इमारतींमधील अग्निसुरक्षा आणि अग्निशमन मार्गावर प्रामुख्याने प्रश्न निर्माण होतो. 

मुंबई अग्निशमन दलाने अलीकडेच म्हटल्याप्रमाणे, 2019 ते सप्टेंबर 2022 पर्यंत एकट्या मुंबईत सुमारे 15,822 फायर कॉल्स नोंद करण्यात आले आहेत. आकडेवारी दर्शवते कि गेल्या तीन वर्षांत आगीच्या घटनांमध्ये सुमारे 73 मृत्यू आणि 516 जखमी झाले. अग्निशमन दलाचे अनेक जवान जखमी झाले.  दुर्दैवाने, आपले कार्यालय किंवा घर असलेली इमारत पूर्णपणे अग्निरोधक बनवता येईल, अशी हमी जास्त किंमत मोजल्यानंतरहि कोणी देत नाही, परंतु अशा अतिउच्च इमारतींचे बांधकाम व्यावसायिक आणि आणि बिल्डर यांनी अग्निसुरक्षा प्रक्रियेला प्राधान्य देण्याचे ठरवून जर राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने दिलेल्या सल्ल्याचे पालन केले तर आगीच्या अपघातांपासून इमारत अत्यंत सुरक्षित होईल. 

आगीच्या अपघातांदरम्यान आगीतून बाहेर काढणे हा एक मोठा आणि अत्यंत तांत्रिक विषय आहे जो गंभीर असूनही भारतात चर्चित होऊ शकलेला नाही. दिवाळीच्या आगीच्या घटनांची नोंद बघता, फायर इव्हॅक्युएशन सिस्टीम व आगीच्या नियमांचे पालन किती महत्वाचे आहे ते लक्षात येते. वस्तुस्थिती लक्षात घेता अलीकडेच ऊर्जा विभागाने 2018 च्या परिपत्रकापासून पूर्वलक्षी प्रभावाने 70 मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसविण्याबाबत सल्लागार जारी केला आहे. जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी अग्निशमन अधिकाऱ्यांना उच्च मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक सुरक्षित आणि जलद मार्ग प्रदान करण्यासाठीचे हे एक दूरदर्शी पाऊल आहे. 

डॉ. विक्रम मेहता (महाराष्ट्रातील फायर इव्हॅक्युएशन मॅन म्हणून ओळखले जाणारे) म्हणतात, “फायर इव्हॅक्युएशन लिफ्टची रचना लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि आगीच्या अपघातात अग्निशमन दलाला लोकांना जलद बाहेर काढण्यात मदत करण्यासाठी केली गेली आहे. प्रत्येक उंच इमारतीमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट असणे आवश्यक आहे आणि बंधनकारक आहे. फायर इव्हॅक्युएशन लिफ्टचा वापर वाढवण्यासाठी व्यावहारिक हस्तक्षेप विकसित करून त्यांना बहु-अनुशासनात्मक दृष्टीकोन देखील स्वीकारण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे आपण लोकांचा जीव तसेच मालमत्ता वाचवू शकू.”

फायर इव्हॅक्युएशन लिफ्टची रचना IoT सारख्या प्रगत तंत्रज्ञानाने केली आहे. इमारतीमध्ये आग लागल्यास ते इमारतीच्या अग्निसुरक्षा यंत्रणा टीम/सुरक्षा टीम, लिफ्ट ऑपरेटर आणि जवळच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाला संदेश पाठवतो. इव्हॅक्युएशन लिफ्टमुळे अग्निशमन दलाला कमीतकमी वेळेत सुरक्षितपणे आग प्रभावित मजल्यापर्यंत पोहोचता येत व त्याचबरोबर सर्व वयोगटातील आणि अपंग व्यक्तीना जलद व सुरक्षितपणे काढणं शक्य आहे. पॉवर फेल झाल्यास फायर इव्हॅक्युएशन लिफ्टमध्ये 30 मिनिटांचा बॅटरी बॅकअप आहे. शहराच्या पायाभूत सुविधा, अतिवृष्टी किंवा वाहतूक कोंडी, वारा किंवा धुके यांसारखे घटक हे अग्निशमन कार्यात अडथळा आणू शकतात, ज्यामुळे लोकांना वेळेवर बाहेर काढणे हे अशक्य होते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या

भयंकर! हातात रॉकेटचा बॉक्स पेटवून फटाके फोडण्याचा जीवघेणा स्टंट; औरंगाबादेतील व्हिडिओ व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
बसला ओव्हरटेक करताना रिक्षाचा भीषण अपघात, मुंबईतील दहिसरमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू
बसला ओव्हरटेक करताना रिक्षाचा भीषण अपघात, मुंबईतील दहिसरमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू
Mumbai Goa Highway : 31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध, वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातायेत, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 
गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध, वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातायेत, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget