एक्स्प्लोर

Mumbai Coronavirus: मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, आज 274 नव्या रुग्णांची भर

Mumbai Coronavirus Update : मुंबईत आज रोजी 1635 सक्रिय रुग्ण असून आज कोणताही मृत्यू झालेला नाही. 

Mumbai Coronavirus Update : एकीकडे देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना मुंबईतील रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. आज मुंबईत नवीन 274 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 216 रुग्ण बरे झाले आहेत. यापैकी आज 13 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत आज कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. 

मुंबईत एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1635 वर पोहोचली आहे. आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 13 ने वाढून ती 121 वर पोहोचली आहे. तर ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 34 इतकी झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 11,59,819 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 11.38,432 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  

मुंबईत आज कोरोनाच्या एकून 2,026 चाचण्या घेण्यात आल्या असून आतापर्यंत 1,88,17,140 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर 98.2 टक्के इतका आहे. 

महापालिकेचे आवाहन

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेने केले आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपर वापरणे, हाताची स्वच्छता राखणे, वारंवार हात धुणे, आजारी असल्यास घरात विलगीकरणात राहणे तसेच श्वसनाचे आजार असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करणे या गोष्टींचे पालन करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. 

वाढत्या कोरोनाच्या उद्रेकाने पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असताना लॉकडाऊन लागेल का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. कोरोना एन्डॅमिक झाल्यानंतर कोरोनाचे अनेक व्हेरियंट बघायला मिळत आहेत. अशात ओमायक्रॉनच्या एक्सबीबी 1.16 या सब-व्हेरीयंटमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. अशात सरकारी रुग्णालयात मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलंय. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा मास्क घालावा का? असा प्रश्न निर्माण झालाय. 

कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांनी केलेलं आवाहन

कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत आहे, अशात बूस्टर डोस ज्यांनी घेतले नसतील अशांनी बूस्टर डोज घेतले पाहिजे.

लस घेतली असेल तरीही तुम्हाला कोव्हिड होऊ शकतो. मात्र आजाराची तीव्रता कमी होताना बघायला मिळते. सहव्याधी असलेल्या रुग्णांना अधिक धोका असतो. अशात त्यांनी बूस्टर डोस घेतला पाहिजे. 

रुग्णालयात जात असाल तर मास्क घालावा. ज्या लोकांना सर्दी, खोकला, ताप आहे अशांनी मास्क घातला पाहिजे.

बंदिस्त ठिकाणी जात असाल तर मास्क घालावा.

देशात सर्वत्र कोरोनाच्या लढाईसाठी सज्ज राहण्यासाठी मॉकड्रिल पार पडताना बघायला मिळाले. मात्र, अद्यापही रुग्णालयात भर्ती होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे आणि ती कमीच राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त केला जात आहे. 

सुरुवातीला साथीच्या महामारीत मास्क सर्वत्र बंधनकारक करण्यात आलं होतं. त्यानंतर जशी जशी रुग्णसंख्या कमी झाली तसे नियमात बदल होत गेले. त्यानंतर चेहऱ्यावरील मास्क देखील निघालेत. मात्र कोरोनावरील औषध अद्यापही बाजारात आलेलं नाही. त्यामुळे कोव्हिडच्या लढाईत मास्क हे देखील एक व्हॅक्सिन आहे. अशात रुग्णसंख्या आटोक्यात ठेवायची असेल तर मास्कदेखील लावला पाहिजे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
आंदोलन का झालं, का नाही याचं उत्तर माझ्याकडं नाही, पण डोळे मिटून मी जेनझीवर विश्वास ठेवेन : मोहन भागवत
आंदोलन का झालं, का नाही याचं उत्तर माझ्याकडं नाही, पण डोळे मिटून मी जेनझीवर विश्वास ठेवेन : मोहन भागवत
CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget