एक्स्प्लोर

अनिल अंबानीसाठी देश विकायला काढलाय का? : राज ठाकरे

"वाघाचे पुतळे उभारुन वाघ वाचत नसतात. ही गोष्ट गुजरातमध्ये सिंहांच्याबाबत झाली असती तर किती गोंधळ झाला असता," असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला आहे.

मुंबई : T1 वाघिणीच्या मृत्यूच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. अनिल अंबानींच्या प्रकल्पासाठी वाघिणीला मारल्याची चर्चा सुरु आहे. त्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. "अनिल अंबानीसाठी देश विकायला काढलाय का?" असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. तसंच "वाघिणीला मारायची गरज नव्हती, तिला बेशुद्ध करायला हवं होतं. पुतळे उभारुन वाघ वाढत नाहीत," असंही ते म्हणाले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. वाघिणीला बेशुद्ध करुन संवर्धन करता आलं असतं जी गोष्ट तुम्हाला वाचवता आली असती, ती तुम्ही वाचवली नाही. इतर आयुधं आपल्याकडे आहेत. तिला बेशुद्ध करुन संवर्धन करता आलं असतं. वाघ दुर्मिळ होत आहेत. ज्यांचे प्राण गेले आहेत, त्यांचंही वाटतंय. अशा गोष्टी जगभरात घडत असतात. ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचं वास्तव्य असतं तिथे वसाहती वसल्या तर अशा घटना घडतात, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. उद्या मुनगंटीवाराचं मंत्रिपद जाईल अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर सरकारवर विशेषत: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका होत आहे. याबद्दल राज ठाकरे म्हणाले की, "या विषयावर मुनगंटीवार बेफिकीरीपणे उत्तर देत आहेत. ते वनमंत्री आहेत, याचा अर्थ त्यांना वनातलं सगळं कळतं किंवा त्यावर ते रिसर्च करत होते, असं नाही. ते आता मंत्री झाले आहेत, उद्या मंत्रीपद जाईल. त्यामुळे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारीने बोलावं." एक जीव गेला, सोबत आणखी दोन जीव जाणार T1 वाघिणीला ठार केल्यानंतर तिचे दोन बछडे अनाथ झाले आहेत. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. "आज त्या वाघिणीची दोन बछडे सापडत नाहीत. ती कुठे असतील. म्हणजे एक जीव गेलाय, त्यासोबत आणखी दोन जीव जाणार. यांना सत्तेचा माज आला आहे. आम्ही काहीही केलं तरी आम्हाला काही होणार नाही. मला वाटतंय घोडा मैदान जवळ आहे. यांचा माज उतरणं अत्यंत आवश्यक आहे," असं ते म्हणाले. अंबानींसाठी देश विकायला काढलाय का? अनिल अंबानींच्या प्रकल्पासाठी वाघिणीला ठार केल्याचा आरोप सरकारवर होत आहेत. याविषयी राज ठाकरे यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. "वाघिणीला जिथे मारलं तिथून 60 किमी अंतरावर अनिल अंबानींचा प्रकल्प येत आहे. अनिल अंबानीसाठी देश विकायला काढलाय का? अनिल अंबानी या सगळ्या गोष्टी करणार, त्याच्यासाठी सरकार विकलं गेलंय? त्यासाठी काम करत आहात का? इतकं भान सुटलं सरकारचं? कोण अनिल अंबानी? ही धेंडं सरकारने पोसावी आणि त्याचं नुकसान महाराष्ट्र आणि देशाने सोसायचं, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच राज्यातलं सरकार हे मोदी सरकारच्या आशीर्वादाने बसलं आहे. ते आहेत तोपर्यंत हे आहेत. त्यांना माज आहे म्हणून यांना माज असल्याची टीकाही केली. पुतळे उभारुन वाघ वाढत नाहीत वाघ ही दुर्मिळ प्रजाती आहे. पुतळे उभारुन वाघ वाढत नसतात. हीच गोष्ट गुजरातमध्ये सिंहांच्या बाबतीत झाली असती तर केवढा हंगामा झाला असता. वन्यप्राण्यांच्या भागात घुसूच नये वन्यप्राण्यांच्या भागात घुसूच नये कोणी. ओसाड जागा असताना जंगलातच का शिरायचं असतं? यांना काही कर्तव्य नाही. कोण जगतंय, मरतंय याचं त्यांना देणं-घेणं नाही, त्यांना फक्त पुतळे उभारायचे आहेत. तिथे वल्लभभाईंचा पुतळा उभा करायचा, इथे वाघाचे पुतळे उभे करायचे. बस पुतळेच उभे करा. सर्वाधिक बिबटे असलेली जगात एकमेव जागा आहे आणि ती म्हणजे मुंबईतील नॅशनल पार्क. ही जागा अनधिकृत इमारती आणि झोपडपट्टीने वेढली जातेय. अशा परिस्थितीत सरकारचं लक्ष नसेल तर हे प्राणी तुमच्या घरात घुसणारच आहेत. जातील कुठे ते

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Embed widget