एक्स्प्लोर

Maharashtra Farmers: शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी; पीकविम्याच्या नव्या नियमाने गोची,अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे मिळणार नाहीत

Maharashtra Rain Farmers Crops loss: यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, पीकविम्याचे नियम बदलल्याने शेतकऱ्यांना यापूर्वी मिळणारी मोठी आर्थिक मदत आता मिळू शकणार नाही.

Maharashtra Rain Farmers Crops loss: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती, गुरं आणि घर-दार गमावलेल्या या शेतकरी (Farmers) कुटुंबांनी सर्वस्व गमावले आहे. त्यामुळे हे शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसले असतानाच एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण, यंदा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पीकविम्याचे (Crops Insurance Scheme) पैसे मिळू शकणार नाहीत. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पीक विम्याच्या नव्या नियमानुसार या अतिवृष्टीतून (Heavy Rain) पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत. नव्या नियमानुसार, कापणीअंतीच पीक विम्याचे पैसे मिळू शकतात. त्यामुळे आता एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत जुलै, ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे करुन त्याचे अंतिम अहवाल सरकारला सादर करण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत नुकसानभरपाईसाठी 697 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित 721 कोटी रुपयांचा निधी येत्या एक-दोन दिवसांत प्राप्त होईल. ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्याचा अहवाल शासन दरबारी जमा झाला आहे. या महिन्यातील पंचनामे पाऊस ओसरला की पुढील आठ दिवसांत पूर्ण करु. जुलै महिन्यापर्यंतचा निधी आपल्याला मिळाला आहे, ऑगस्टचा काही निधी बाकी असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

जुन्या योजनेत पाच घटकांवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती. यामध्ये उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग आणि उत्पादन आधारित या घटकांचा समावेश होता. यासाठी पूर्वी 30 टक्क्यांची मर्यादा होती. आता केवळ उत्पादन आधारित  नुकसान भरपाई मिळणार आहे व मर्यादा 50 टक्के आहे( तंत्रज्ञान व पीक कापणी.) पूर्वीच्या योजनेत आजच्या अतिवृष्टीसाठी कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळाली असती  पण आता जुना नियम नसल्याने ती मिळणार नाही.

Rain crop loss compensation: नुकसानभरपाईचे पैसे तातडीने मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे?

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच जमा होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे, त्यांनी नोंदीप्रमाणे ई-केवायसी करुन घ्यावे. जेणेकरुन नुकसानभरपाईची रक्कम तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. सरकारकडून आलेली नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आमची एक टीम तालुका पातळीवर कार्यरत आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले असेल तर नुकसान भरपाईचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

बांधावर पाहणी करायला गेलेल्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरलं, दत्तात्रय भरणेंवर प्रश्नांची सरबत्ती, यंत्रणेची लाज काढली

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nanded Crime Love Story: नांदेडच्या प्रेमप्रकरणाचा जातीय विखारामुळे भयंकर शेवट, सक्षम ताटेची केस प्रकाश आंबेडकर लढवणार का? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
सक्षम-आचलला न्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर कोर्टात युक्तिवाद करणार? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
Weakest Currency 2025 : डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
Embed widget