एक्स्प्लोर

Maharashtra Farmers: शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी; पीकविम्याच्या नव्या नियमाने गोची,अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे मिळणार नाहीत

Maharashtra Rain Farmers Crops loss: यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, पीकविम्याचे नियम बदलल्याने शेतकऱ्यांना यापूर्वी मिळणारी मोठी आर्थिक मदत आता मिळू शकणार नाही.

Maharashtra Rain Farmers Crops loss: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती, गुरं आणि घर-दार गमावलेल्या या शेतकरी (Farmers) कुटुंबांनी सर्वस्व गमावले आहे. त्यामुळे हे शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसले असतानाच एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण, यंदा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पीकविम्याचे (Crops Insurance Scheme) पैसे मिळू शकणार नाहीत. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पीक विम्याच्या नव्या नियमानुसार या अतिवृष्टीतून (Heavy Rain) पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत. नव्या नियमानुसार, कापणीअंतीच पीक विम्याचे पैसे मिळू शकतात. त्यामुळे आता एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत जुलै, ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे करुन त्याचे अंतिम अहवाल सरकारला सादर करण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत नुकसानभरपाईसाठी 697 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित 721 कोटी रुपयांचा निधी येत्या एक-दोन दिवसांत प्राप्त होईल. ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्याचा अहवाल शासन दरबारी जमा झाला आहे. या महिन्यातील पंचनामे पाऊस ओसरला की पुढील आठ दिवसांत पूर्ण करु. जुलै महिन्यापर्यंतचा निधी आपल्याला मिळाला आहे, ऑगस्टचा काही निधी बाकी असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

जुन्या योजनेत पाच घटकांवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती. यामध्ये उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग आणि उत्पादन आधारित या घटकांचा समावेश होता. यासाठी पूर्वी 30 टक्क्यांची मर्यादा होती. आता केवळ उत्पादन आधारित  नुकसान भरपाई मिळणार आहे व मर्यादा 50 टक्के आहे( तंत्रज्ञान व पीक कापणी.) पूर्वीच्या योजनेत आजच्या अतिवृष्टीसाठी कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळाली असती  पण आता जुना नियम नसल्याने ती मिळणार नाही.

Rain crop loss compensation: नुकसानभरपाईचे पैसे तातडीने मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे?

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच जमा होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे, त्यांनी नोंदीप्रमाणे ई-केवायसी करुन घ्यावे. जेणेकरुन नुकसानभरपाईची रक्कम तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. सरकारकडून आलेली नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आमची एक टीम तालुका पातळीवर कार्यरत आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले असेल तर नुकसान भरपाईचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

बांधावर पाहणी करायला गेलेल्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरलं, दत्तात्रय भरणेंवर प्रश्नांची सरबत्ती, यंत्रणेची लाज काढली

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget