एक्स्प्लोर

Maharashtra Farmers: शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी; पीकविम्याच्या नव्या नियमाने गोची,अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे मिळणार नाहीत

Maharashtra Rain Farmers Crops loss: यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, पीकविम्याचे नियम बदलल्याने शेतकऱ्यांना यापूर्वी मिळणारी मोठी आर्थिक मदत आता मिळू शकणार नाही.

Maharashtra Rain Farmers Crops loss: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती, गुरं आणि घर-दार गमावलेल्या या शेतकरी (Farmers) कुटुंबांनी सर्वस्व गमावले आहे. त्यामुळे हे शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसले असतानाच एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण, यंदा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पीकविम्याचे (Crops Insurance Scheme) पैसे मिळू शकणार नाहीत. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पीक विम्याच्या नव्या नियमानुसार या अतिवृष्टीतून (Heavy Rain) पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत. नव्या नियमानुसार, कापणीअंतीच पीक विम्याचे पैसे मिळू शकतात. त्यामुळे आता एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत जुलै, ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे करुन त्याचे अंतिम अहवाल सरकारला सादर करण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत नुकसानभरपाईसाठी 697 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित 721 कोटी रुपयांचा निधी येत्या एक-दोन दिवसांत प्राप्त होईल. ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्याचा अहवाल शासन दरबारी जमा झाला आहे. या महिन्यातील पंचनामे पाऊस ओसरला की पुढील आठ दिवसांत पूर्ण करु. जुलै महिन्यापर्यंतचा निधी आपल्याला मिळाला आहे, ऑगस्टचा काही निधी बाकी असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

जुन्या योजनेत पाच घटकांवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती. यामध्ये उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग आणि उत्पादन आधारित या घटकांचा समावेश होता. यासाठी पूर्वी 30 टक्क्यांची मर्यादा होती. आता केवळ उत्पादन आधारित  नुकसान भरपाई मिळणार आहे व मर्यादा 50 टक्के आहे( तंत्रज्ञान व पीक कापणी.) पूर्वीच्या योजनेत आजच्या अतिवृष्टीसाठी कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळाली असती  पण आता जुना नियम नसल्याने ती मिळणार नाही.

Rain crop loss compensation: नुकसानभरपाईचे पैसे तातडीने मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे?

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच जमा होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे, त्यांनी नोंदीप्रमाणे ई-केवायसी करुन घ्यावे. जेणेकरुन नुकसानभरपाईची रक्कम तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. सरकारकडून आलेली नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आमची एक टीम तालुका पातळीवर कार्यरत आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले असेल तर नुकसान भरपाईचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

बांधावर पाहणी करायला गेलेल्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरलं, दत्तात्रय भरणेंवर प्रश्नांची सरबत्ती, यंत्रणेची लाज काढली

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget