एक्स्प्लोर

कोकणात मागेल त्या गावी एसटी, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा उपक्रम!

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मागेल त्या गावी एसटी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने याची घोषणा केली आहे.

मुंबई : गणेशोत्सवामध्ये कोकणवासीयांना आपल्या गावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मागेल त्या गावी एसटी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यासाठी दोनशेहुन अधिक एसटी बसेसचं बुकिंग कोकणवासियांनी केललं आहे. 10 ते 12 तारखेपर्यंत याहून अधिक एसटी बसेसची मागणी असल्याने त्याही कोकणवासीयांना पुरवण्यात येणार आहेत.

कोरोनामुळं यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांनी हा उत्सव रद्द करुन तो साध्या पद्धतीने करण्यास सकारात्मक पाऊल उचलेलं आहे. कोकणातला गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांसाठी सर्वात मोठा सण आणि उत्सव असतो. त्यामुळे हा उत्सव कोकणात जाऊन आपल्या घरी साजरा करावा, अशी कोकणवासीयांची इच्छा आहे. यासाठी राज्य शासनाने काही अटी आणि शर्ती घालून कोकणवासीयांना आपल्या गावी जाण्याची परवानगी दिलेली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामुळे प्रवाशांना दिलासा

याचा फायदा घेत अनेक खाजगी कंपन्यांनी आपल्या गाड्या उपलब्ध करून कोकणवासीयांकडून अवाच्या सव्वा भाडे आकारुन कोकणात सोडण्यासाठी गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत. यामध्ये कोकणवासीयांची पिळवणूक होऊ नये म्हणून गणेशोत्सवाला कोकणात जाता यावं यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कोकणवासीयांसाठी विशेष गाड्यांची योजना सुरू केलेली आहे. कोकणात जाण्यासाठी अनेक खाजगी गाड्यांचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर कोकणवासीयांना परवडणाऱ्या दरात आणि त्यांना हव्या असणाऱ्या गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाने ही योजना सुरू केलेली आहे. मागेल त्याला एसटी, मागेल त्या गावी जाणाऱ्या एसटी, याअंतर्गत कोकणवासीयांसाठी गणेश उत्सवा निमित्त ही खास सेवा सुरू केली आहे. या सेवेला कोकणवासीय देखील चांगला प्रतिसाद देत आहेत.

कोरोनाच्या काळात कोकणात सुरक्षित आणि कमी दरात आपल्या गावी जाता यावं यासाठी चाकरमान्यांनी एसटीचा पर्याय निवडलेला आहे. आपल्या गावी जाण्यासाठी कोकणवासीय कुर्ला, परळ, मुंबई सेंट्रल, मैत्री पार्क या परिसरातील विभागात जाऊन एसटीचे बुकिंग करत आहेत. महामंडळाने या सेवेसाठी ॲप द्वारे बुकिंग सुरु केलेले आहेत. यालाही कोकणवासीय चांगला प्रतिसाद देत आहेत.

कोकणात मागेल त्या गावी एसटी

कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना ग्रुप बुकिंग करता येते. एका गावात जर 15 पेक्षा जास्त लोक असतील तर त्यांना एसटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका एसटीमध्ये 22 लोक प्रवास करतील. एसटीचं पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. 5 ते 12 ऑगस्ट या कालावधीमध्ये ही सेवा देण्यात येणार आहे. एसटीच्या योजनेला कोकणवासियांनी चांगला प्रतिसाद दिला. दिनांक 9 ते 12 या चार दिवसांमध्ये ज्यादा बसेस सोडण्याची सुविधा सुध्दा एसटीने उपलब्ध करून दिलेली आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली जाहीर

कोरोनाच्या काळात संपूर्ण राज्यातील एसटी सेवा ठप्प झाल्या होत्या. मात्र, आता हळूहळू ही सेवा पुन्हा कार्यान्वित होऊ लागलेली आहे. कोकणातील गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना जाता यावं यासाठी अनेक गावातील नागरिकांनी एसटी महामंडळाला विनंती केली होती. राज्य सरकारच्या परवानगीने यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासीयांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी मागेल त्या गावी एसटी हा उपक्रम सुरू केलेला आहे. नागरिकांना घर बसल्या आपल्या गावी जाण्यासाठी एसटीचे बुकिंग करता यावं यासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करण्याचीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. याला नागरिक चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती मुंबई आगर प्रमुख संजय सुर्वे यांनी दिली.

काल दुपारी मी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीवर कोकणात गणेशोत्सवासाठी बसेस सुरु केल्याची बातमी ऐकली. त्यामुळे मी तातडीने कुर्ला बस स्थानकावर येऊन या संदर्भातील चौकशी केली. आज मला माझ्या कुटुंबियांसाठी रत्नागिरीला जाण्यासाठी आरक्षण उपलब्ध झालेलं आहे. आम्ही खाजगी गाडीचा पर्याय शोधला होता. मात्र, त्याचं भाडं आम्हाला परवडणारं नव्हतं, पण एसटीचे बुकिंग मिळाल्यामुळे आम्ही समाधानी आहोत. काही दिवसापासून वाटत होतं की यंदाचा गणेशोत्सव कोकणामध्ये आपल्या गावी जाऊन साजरा करण्याची संधी उपलब्ध होणार नाही. पण राज्य सरकार आणि एसटी महामंडळानं एसटी बसेस सुरू केल्यामुळे आता आमच्या गावी जाऊन हा उत्सव साजरा करता येणार आहे. याचा विशेष आनंद मला वाटत असल्याचं विशाल देसाई या प्रवाशाने सांगितले.

गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाची सेवा सुरू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget