एक्स्प्लोर

ऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार : आदित्य ठाकरे

ऑक्टोबरच्या मध्यात सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा सरकारचा विचार सुरु असल्याचं मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. शिवाय कार्यालयीन कामकाजासाठी 24 तासांचा वापर करता येईल का? याचीही चाचपणी सुरु असल्याचं ते म्हणाले.

मुंबई : 15 ऑक्टोबरनंतर काही प्रमाणात लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा सरकारचा विचार सुरु आहे, असं मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं. प्रवासी संघटना, सर्वसामान्य जनता यांच्याकडून लोकल लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी वाढत आहे. त्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलता येतील का?, यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान महाविकास आघाडीतील कोणत्याही मंत्र्याने याबाबत अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही.

सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे. परंतु इतर प्रवाशांना बस, खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे बरेच तास प्रवासात जात आहेत. त्यामुळे हे हाल टाळण्यासाठी सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार, असं प्रश्न वारंवार विचारण्यात येत आहे. याविषीय आदित्य ठाकरे यांनी या मुलाखतीत भाष्य करत काही महत्त्वाचे संकेत दिले.

इतरांसाठीही मुंबई लोकल प्रवास सुरु करण्याबाबत विचार करा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना

ते म्हणाले की, "ऑक्टोबरच्या मध्यात लोकल सुरु करण्याचा सरकारचा विचार सुरु आहे. प्रवासाच्या आणखी काही सुविधा सुरु करण्यावरही आमचा भर आहे. आम्ही अनेक गोष्टी वेळ घेऊन विचारपूर्वक सुरु करत आहोत. कारण एकदा सुरु केलेल्या गोष्टी आम्हाला पुन्हा बंद करायच्या नाहीत."

तसंच "सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीही संख्या जास्त असल्याने आता लोकलची संख्या वाढवणं गरजेचं आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाशी संवाद सुरु आहे. लोकलची संख्या वाढवल्यावर अधिक जणांना प्रवासाची परवानगी दिली जाईल. अन्यथा प्रवासाच्या इतर साधनांवरील ताण वाढेल," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा विचार आदित्य ठाकरे म्हणाले की, "मुंबईतील कोरोनाची स्थिती आणि लोकसंख्येचा विचार कार्यालयीन वेळांमध्ये बदल करण्याचा विचार आहे. मुंबईत विविध प्रकारची कार्यालयं आहेत. त्यांच्या वेळा बदलण्याचं काम अवघड आहे. सध्या आम्ही विविध कार्यालयं, संकुलं आणि कार्पोरेट्सशी कामाच्या वेळांमध्ये बदल करण्याविषयी चर्चा करत आहोत. कार्यालयीन कामासाठी संपूर्ण 24 तासांचा वापर करता येईल का याची चाचपणी सुरु आहे, जेणेकरुन लोकल सेवेवर ताण येणार नाही. असं झाल्यास ऑक्टोबरपर्यंत सगळ्यांसाठी लोकल सेवा सुरु होऊ शकते."

Aaditya Thackeray | ऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार : आदित्य ठाकरे

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Mumbai BEST Bus Accident: भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनियंत्रित बसने पादचाऱ्याला चिरडलं, तर वाशी टोलनाक्यावर चालकाला अचानक फिट आली अन् बस थेट....
भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनियंत्रित बसने पादचाऱ्याला चिरडलं, तर वाशी टोलनाक्यावर चालकाला अचानक फिट आली अन् बस थेट....
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Embed widget