एक्स्प्लोर

'भूक म्हणजे काय आम्ही जाणतो', स्वराज्य फाऊंडेशनकडून पुढील 10 दिवस मुंबईत मोफत जेवण

राज्यभरात 15 दिवसांची संचारबंदी लागू झाल्यानंतर अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन मुंबईतील काळाचौकी इथली स्वराज्य फाऊंडेशन पुढील 10 दिवस मुंबईत सर्वसामान्यांसाठी मोफत जेवण देणार आहे.

मुंबई : मुंबईत कडक निर्बंध लागू झाल्यानंतर आता पुन्हा एकदा अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. ही बाब लक्षात घेत काळाचौकी येथे असणाऱ्या स्वराज्य प्रतिष्ठानने पुढाकार घेत पुढील 10 दिवस सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत जेवण उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. 

मागच्या लॉकडाऊनमध्ये अनेकजण उपासमार होत असल्यामुळे चालत गावी गेले होते. यामध्ये भुकेमुळे अनेकांचे प्राण देखील गेले होते. हीच बाब लक्षात घेत काळाचौकी येथील स्वराज्य प्रतिष्ठाने पुढाकार घेत आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी दुपारच्या जेवणाची सोय केली आहे. 'भूक म्हणजे काय आम्ही जाणतो' आशा आशयाचं एक पोस्टर तयार करुन त्यांनी ते सोशल मीडियातून व्हायरल केलं आहे. स्वराज्य फाऊंडेशनच्या या उपक्रमाचं सर्वसामान्य नागरिकांकडून प्रचंड कौतुक होतं आहे. 

याबाबत बोलताना स्वराज्य फाऊंडेशनचे काळाचौकी इथे राहणारे संस्थापक अध्यक्ष उदय पवार म्हणाले की, "मागील टाळेबंदीत सर्वसामान्य नागरिकांचे जेवण मिळत नसल्यामुळे प्रचंड हाल झाले. त्यामुळे अनेकांनी टाळेबंदी असताना देखील पायी चालत जाऊन आपला गाव गाठला. निदान शहरात राहून उपाशी राहण्यापेक्षा गावी जाऊन काहीतरी कमवून खाऊ अशी मानसिकता या नागरिकांची होती. त्यावेळी अनेक सामाजिक संस्थानी पुढाकार घेऊन अनेकांना जेवण, पाणी पुरवलं देखील, परंतु त्यातील काहींना मिळालं आणि काहींना नाही मिळालं. आता राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 4 मार्चला काही निर्बंध जाहीर केले. परंतु तरीदेखील घरातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी नाही. त्यामुळे अखेर 15 मार्च पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध जाहीर केले. या नियमांनुसार नागरिकांना घरातून बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे हातावर पोट असणारे टॅक्सी ड्रायव्हर, छोटे व्यावसायिक, कामगार, रिक्षा चालक यांची उपासमार होण्याची शक्यता आहे. मागील टाळेबंदीत अन्नधान्य वाटणारे भरपूर होते परंतु आता मात्र ही संख्या कमी आहे. त्यामुळे या लहान कष्टकरी मंडळीची उपासमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एक पाऊल पुढं टाकत आजपासून दुपारी 12 ते 1 शहीद भगतसिंग मैदान मुख्य दरवाज्यासमोर काळाचौकी येथे जेवण वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे." 

"शनिवारी दुपारी हा विचार आमच्या मनात आला आणि आम्ही तत्काळ कृती करत हा निर्णय जाहीर देखील केला आहे. आम्ही हा उपक्रम पुढील 10 दिवस करणार आहोत. जर पुढील काळात आणखी काही दिवस निर्बंध वाढले तर त्याकाळात देखील आम्हाला मदत करता येऊ शकेल का याचा विचार आम्ही करत आहोत," असं उदय पवार यांनी सांगितलं.

सध्या छोटे व्यवसायिक घरी आहेत. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी यांना जेवण मिळतं त्यामुळे किमान एकवेळची त्यांची गरज भागावण्याचा प्रयत्न स्वराज्य फाऊंडेशन करत आहे.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
Uddhav Thackeray Speech : मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Chavan : 'ठाकरे कुटुंबानेच महाराष्ट्राला वाईट दिवस दाखवले', चव्हाणांचा घणाघात
Raj Thackeray : 'कल्याणमधील ४,५०० मतदार Malabar Hill मध्येही मतदान करतात'
Thackeray vs Shah: 'जागे रहा नाहीतर Anaconda येईल', Uddhav Thackeray यांचा Amit Shah यांच्यावर हल्लाबोल
Uddhav Thackeray : 'तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे', थेट इशारा
Uddhav Thackeray : 'मतचोरीचा लाभ कोणी घेतला? मुख्यमंत्र्यांनी पर्दाफाश करावा'- ठाकरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
Uddhav Thackeray Speech : मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
Satyacha Morcha Mumbai: फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय...मनसे अन् महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
फॅशन स्ट्रीट ते BMC मुख्यालय...मनसे-महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
Raj Thackeray : मलबार हिलमध्ये कल्याण ग्रामीण, भिवंडीसह मुरबाडच्या 4500 जणांच मतदान, दुबार मतदारांच्या संख्येचा पाढा वाचला, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
मतदार यादीवर काम करा, दुबार तिबार सापडल्यास फोडून काढा,पोलिसांच्या ताब्यात द्या : राज ठाकरे
MVA ans MNS Mumbai Morcha: आमची सत्ता रस्त्यावर! राज अन् उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत 'मनसे' एकीची वज्रमूठ; निवडणूक आयोगाला गर्भित इशारा
आमची सत्ता रस्त्यावर! राज अन् उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत 'मनसे' एकीची वज्रमूठ; निवडणूक आयोगाला गर्भित इशारा
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Embed widget