एक्स्प्लोर

कोरोना गेलेला नाही, दुसरी लाट नव्हे त्सुनामी येईल अशी भीती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर जबाबदारी नाही, असे म्हणत विरोधकांवरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

मुंबई : आतापर्यंत चांगलं सहकार्य केलं तसचं पुढं करा, कोरोना गेलेला नाही. त्यामुळे दुसरी लाट नव्हे त्सुनामी येईल अशी भीती वाटत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अनेक राज्यांमध्ये कोरोना वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे आपण आधीच काळजी घेण्याची गरज आहे. नाहीतर आपल्यालाही कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

दिवाळीनंतर राज्यात पुन्हा कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई हे प्रमाण जास्त आहे. उद्यापासून अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला.

महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. वारकऱ्यांना आवाहन ते म्हणाले की, मला राजकारण करायचे नाही. पण कोरोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे देखील उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. आजपासून 4 दिवसांनी मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण होतील. शूरवीर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कमांडोज यांनी प्राणपणाने अतिरेक्यांशी सामना केला. आजही आपण काही महिन्यांपासून या कोविड नावाच्या छुप्या दहशतवाद्याशी कडवा मुकाबला करतो आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. उत्तर भारतीयांची छट पूजा झाली. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे असे विनम्र आवाहन मी वारकरी बंधू भगिनींना करतो आहे. यंदा दसऱ्याला शिवसेनेचा मेळावा देखील शिवतीर्थावर मोठेपणाने साजरा न करता साधेपणाने केला, मी आपला मुख्यमंत्री आहे त्यामुळे लोका सांगे ब्रह्मज्ञान असे असू नये म्हणून नियम माझ्यापासून काटेकोरपणे पाळले नाही तर तुम्हाला काही सांगायचा अधिकार नाही. दिवाळीत फटाके वाजवू नका असे मी सांगितले आणि आपण माझे ऐकले आणि यंदा खूप कमी फटके उडाले. प्रत्येक गोष्टींसाठी कायदे करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले. आरोग्याची चौकशी जिव्हाळ्याने व्हावी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविताना यंत्रणेतील सर्व लोकांनी अफाट काम केले आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जन जागृती करणे हे साधेसुधे काम नाही. या मोहिमेचा हेतू केवळ चौकशी करणे नाही तर आरोग्य नकाशा तयार करणे आहे. यामध्ये आपल्याला किती जणांना सहव्याधी आहे ते कळले. या सर्वांशी यंत्रणेतील लोकांनी एक जिव्हाळा दाखवून संपर्क साधणे व चौकशी करणे महत्वाचे आहे. दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल मला काहीशी नाराजी व्यक्त करायची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेले आहे. दिल्लीत दुसरी तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे कीकाय असे वाटतेय. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. कृपा करून सगळं उघडे केले म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीना सांभाळा कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांना आहे. आजपर्यंत आपण त्यांना सांभाळून होतो. आता कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये वाढतोय आणि त्यांच्या माध्यमातून घराघरातल्या ज्येष्ठ मंडळीपर्यंत होतोय हे निश्चितच खूप धोकादायक आहे. आज आपल्या हातात लस नाही, कधी येईल ते सांगता येत नाही. आली तरी राज्यातल्या सर्व लोकांना अगदी दोन डोस द्यायचे म्हटले तरी 24 ते 25 कोटी जनतेला द्यावी लागेल. त्यामुळे केवळ मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, हात धूत राहणे हीच त्रिसूत्री आहे. कोविडनंतर रुग्ण खडखडीत बरे सुद्धा होत आहेत पण पण पोस्ट कोविड दुष्परिणाम सुद्धा दिसताहेत. आपण कशासाठी विषाची परीक्षा बघायची असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि, . आपण शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन सावधपणे पावले टाकत आहोत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok kharat: अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
Video: साताऱ्यात राजांना मारलं, दोन राजे मार खातात; सभागृहात अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचंलं, म्हणाले, कुठे गेले वाघ?
Video: साताऱ्यात राजांना मारलं, दोन राजे मार खातात; सभागृहात अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचंलं, म्हणाले, कुठे गेले वाघ?
Eknath Shinde and Devendra Fadnavis: फडणवीसांनी शिवसेना आमदारांच्या पायऱ्यांवरच्या आंदोलनाबाबत नाराजी बोलून दाखवली, एकनाथ शिंदेंचा तात्काळ प्रतिसवाल, म्हणाले, 'साताऱ्यात जयकुमार गोरे वागले ते योग्य होतं का?'
फडणवीसांनी नाराजी बोलून दाखवताच एकनाथ शिंदेंचा तत्क्षणी प्रतिसवाल, म्हणाले, 'साताऱ्यात गोरे जे वागले ते...'

व्हिडीओ

Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई
Neelam Gorhe सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, सीसीटीव्ही सादर करण्याचे निर्देश
Jaykumar Gore Satara : सातारा एसपींचे निलंबन मागे घ्या, जयकुमार गोरे आक्रमक
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
PM Modi: इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
Ashok kharat: अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
शेपूट घातली, चिरडून मारताहेत, भाजपचं नाव घ्यायला घाबरता, मंत्री मार खाताहेत म्हणत अनिल परबांनी शिंदे सेनेच्या सातारच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं; उदय सामंत, शंभूराज देसाई जागेवर भडकले अन् म्हणाले..
शेपूट घातली, चिरडून मारताहेत, भाजपचं नाव घ्यायला घाबरता, मंत्री मार खाताहेत म्हणत अनिल परबांनी शिंदे सेनेच्या सातारच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं; उदय सामंत, शंभूराज देसाई जागेवर भडकले अन् म्हणाले..
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
Renu Desai on Dhurandhar 2: 'मोदीजींची अंधभक्त असल्याचा अभिमान...'; उपमुख्यमंत्र्यांच्या Ex पत्नीची पोस्ट, 'धुरंधर 2'ची क्लिप शेअर करत म्हणाली...
'मोदीजींची अंधभक्त असल्याचा अभिमान...'; उपमुख्यमंत्र्यांच्या Ex पत्नीची पोस्ट, 'धुरंधर 2'ची क्लिप शेअर करत म्हणाली...
सभापती राम शिंदे नीलम गोऱ्हेंचा निर्णय फिरवणार? साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या निर्णयावरुन वातावरण तापलं
सभापती राम शिंदे नीलम गोऱ्हेंचा निर्णय फिरवणार? साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या निर्णयावरुन वातावरण तापलं
Raj Thackeray:
"कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?" 'अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेव्हा खरंच...' राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
Embed widget