एक्स्प्लोर

कोरोना गेलेला नाही, दुसरी लाट नव्हे त्सुनामी येईल अशी भीती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर जबाबदारी नाही, असे म्हणत विरोधकांवरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

मुंबई : आतापर्यंत चांगलं सहकार्य केलं तसचं पुढं करा, कोरोना गेलेला नाही. त्यामुळे दुसरी लाट नव्हे त्सुनामी येईल अशी भीती वाटत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अनेक राज्यांमध्ये कोरोना वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे आपण आधीच काळजी घेण्याची गरज आहे. नाहीतर आपल्यालाही कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

दिवाळीनंतर राज्यात पुन्हा कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई हे प्रमाण जास्त आहे. उद्यापासून अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला.

महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. वारकऱ्यांना आवाहन ते म्हणाले की, मला राजकारण करायचे नाही. पण कोरोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे देखील उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. आजपासून 4 दिवसांनी मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण होतील. शूरवीर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कमांडोज यांनी प्राणपणाने अतिरेक्यांशी सामना केला. आजही आपण काही महिन्यांपासून या कोविड नावाच्या छुप्या दहशतवाद्याशी कडवा मुकाबला करतो आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. उत्तर भारतीयांची छट पूजा झाली. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे असे विनम्र आवाहन मी वारकरी बंधू भगिनींना करतो आहे. यंदा दसऱ्याला शिवसेनेचा मेळावा देखील शिवतीर्थावर मोठेपणाने साजरा न करता साधेपणाने केला, मी आपला मुख्यमंत्री आहे त्यामुळे लोका सांगे ब्रह्मज्ञान असे असू नये म्हणून नियम माझ्यापासून काटेकोरपणे पाळले नाही तर तुम्हाला काही सांगायचा अधिकार नाही. दिवाळीत फटाके वाजवू नका असे मी सांगितले आणि आपण माझे ऐकले आणि यंदा खूप कमी फटके उडाले. प्रत्येक गोष्टींसाठी कायदे करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले. आरोग्याची चौकशी जिव्हाळ्याने व्हावी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविताना यंत्रणेतील सर्व लोकांनी अफाट काम केले आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जन जागृती करणे हे साधेसुधे काम नाही. या मोहिमेचा हेतू केवळ चौकशी करणे नाही तर आरोग्य नकाशा तयार करणे आहे. यामध्ये आपल्याला किती जणांना सहव्याधी आहे ते कळले. या सर्वांशी यंत्रणेतील लोकांनी एक जिव्हाळा दाखवून संपर्क साधणे व चौकशी करणे महत्वाचे आहे. दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल मला काहीशी नाराजी व्यक्त करायची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेले आहे. दिल्लीत दुसरी तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे कीकाय असे वाटतेय. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. कृपा करून सगळं उघडे केले म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीना सांभाळा कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांना आहे. आजपर्यंत आपण त्यांना सांभाळून होतो. आता कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये वाढतोय आणि त्यांच्या माध्यमातून घराघरातल्या ज्येष्ठ मंडळीपर्यंत होतोय हे निश्चितच खूप धोकादायक आहे. आज आपल्या हातात लस नाही, कधी येईल ते सांगता येत नाही. आली तरी राज्यातल्या सर्व लोकांना अगदी दोन डोस द्यायचे म्हटले तरी 24 ते 25 कोटी जनतेला द्यावी लागेल. त्यामुळे केवळ मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, हात धूत राहणे हीच त्रिसूत्री आहे. कोविडनंतर रुग्ण खडखडीत बरे सुद्धा होत आहेत पण पण पोस्ट कोविड दुष्परिणाम सुद्धा दिसताहेत. आपण कशासाठी विषाची परीक्षा बघायची असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि, . आपण शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन सावधपणे पावले टाकत आहोत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who Is Acharya Devvrat: संस्कृतमधून शपथ घेतली, आता गुजरातच्या राज्यपालांवर महाराष्ट्राचा अतिरिक्त भार, कोण आहेत आचार्य देवव्रत?
संस्कृतमधून शपथ घेतली, आता गुजरातच्या राज्यपालांवर महाराष्ट्राचा अतिरिक्त भार, कोण आहेत आचार्य देवव्रत?
Sangli News: सांगलीत 'स्पेशल 26' फिल्मी स्टाईलने घरात एन्ट्री अन् आयकर अधिकारी असल्याचे सांगत कोट्यावधी रुपयांची रोकड आणि सोनं लुटलं
सांगलीत 'स्पेशल 26' फिल्मी स्टाईलने घरात एन्ट्री अन् आयकर अधिकारी असल्याचे सांगत कोट्यावधी रुपयांची रोकड आणि सोनं लुटलं
Pune Rain: खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
बीडमध्ये पावसाचा धुमाकुळ ! सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, कुठे काय परिस्थिती?
बीडमध्ये पावसाचा धुमाकुळ ! सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, कुठे काय परिस्थिती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who Is Acharya Devvrat: संस्कृतमधून शपथ घेतली, आता गुजरातच्या राज्यपालांवर महाराष्ट्राचा अतिरिक्त भार, कोण आहेत आचार्य देवव्रत?
संस्कृतमधून शपथ घेतली, आता गुजरातच्या राज्यपालांवर महाराष्ट्राचा अतिरिक्त भार, कोण आहेत आचार्य देवव्रत?
Sangli News: सांगलीत 'स्पेशल 26' फिल्मी स्टाईलने घरात एन्ट्री अन् आयकर अधिकारी असल्याचे सांगत कोट्यावधी रुपयांची रोकड आणि सोनं लुटलं
सांगलीत 'स्पेशल 26' फिल्मी स्टाईलने घरात एन्ट्री अन् आयकर अधिकारी असल्याचे सांगत कोट्यावधी रुपयांची रोकड आणि सोनं लुटलं
Pune Rain: खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
बीडमध्ये पावसाचा धुमाकुळ ! सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, कुठे काय परिस्थिती?
बीडमध्ये पावसाचा धुमाकुळ ! सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, कुठे काय परिस्थिती?
Sangli News: जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करा; आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी
जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करा; आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी
Mumbai Heavy Rain: मुंबईला रेड अलर्ट, पुढील तीन तास महत्त्वाचे; रेल्वे ट्रॅक, रस्ते पाण्याखाली
Mumbai Heavy Rain: मुंबईला रेड अलर्ट, पुढील तीन तास महत्त्वाचे; रेल्वे ट्रॅक, रस्ते पाण्याखाली
शिवसेना आणि मनसे युतीची 'राज'कीय चर्चा, काँग्रेसचं दिल्लीत ठरणार, पण शरद पवारांचं काय? संजय राऊतांनी केला खुलासा!
शिवसेना आणि मनसे युतीची 'राज'कीय चर्चा, काँग्रेसचं दिल्लीत ठरणार, पण शरद पवारांचं काय? संजय राऊतांनी केला खुलासा!
नितेश राणे विरुद्ध उदय सामंतामध्ये कलगीतुरा सुरुच; रंगीबेरंगी मफलर विरुद्ध भगवे मफलर वापरण्यावरून टोलेबाजी
नितेश राणे विरुद्ध उदय सामंतामध्ये कलगीतुरा सुरुच; रंगीबेरंगी मफलर विरुद्ध भगवे मफलर वापरण्यावरून टोलेबाजी
Embed widget