एक्स्प्लोर

Exclusive : ...तर लॉकडाऊनबाबत निर्णय होऊ शकतो : आयुक्त इक्बालसिंह चहल

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन होणार का? निर्बंध अधिक कठोर करणार का? याबाबत मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

मुंबई :  लॉकडाऊन लावायचा की नाही हे नागरिकांनी ठरवावे. कारण त्यांनी जर नियमांचे पालन केले नाही तर कोरोना रुग्णांची संख्या वाढून निर्बंध आणखी कडक करावे लागतील असे वक्तव्य मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी केले. लॉकडाऊनबाबत दोन महत्त्वाचे निकष, आहेत. हॉस्पीटलमध्ये किती बेड भरले आणि किती शिल्लक आहेत. दुसरा म्हणजे ऑक्सीजनचा वापर. कारण ऑक्सीजनचा वापर जर वाढला, हॉस्पीटलमध्ये लोक मोठ्या प्रमाणात दाखल झाले तर लॉकडाऊनबाबत निर्णय होऊ शकतो असेही चहल म्हणाले. कोरोनाच्या आकड्यांवर लॉकडाऊन होऊ शकत नाही तर हॉस्पीटलच्या वापरावर निर्णय होणार असल्याचेही ते म्हणाले. ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका, तो एक विषाणू आहे असेही चहल यावेळी म्हणाले.

सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे परत मुंबईत लॉकडाऊन होणार का? निर्बंध अधिक कठोर करणार का?  याबाबत मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांच्याशी एबीपी माझाने संवाद सधला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली. सध्या मुंबईत 10 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सीजनचा वापर होत आहे. ओमायक्रॉन झाला असला तरी हॉस्पीटलमध्ये जाण्याचे प्रमाण कमी आहे. ज्यांना लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत, त्यांना ओमायक्रॉनचा धोका कमी असल्याचे चहल यांनी सांगितले. लसीकरण हे खूप महत्त्वाचे आहे. ज्यांनी लस घेतली त्यांना ओमायक्रॉन झाला तरी घाबरण्याचे कारण नाही. त्यांना जास्त लक्षणे दिसूनही येत नसल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या मुंबईतील सध्याच्या स्थितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आहेत. ते दिवसातून दोन वेळा परिस्थितीचा आढावा घेतात. तसेच पर्यावरमंत्री आदित्य ठाकरे हे देखील वेळोवेळी बैठका घेऊन परिस्थितीची माहिती घेत असल्याचे चहल यांनी सांगितले.

दरम्यान, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा लोकांनांच सार्वजनिक वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्या लोकांनी देखील नियमांचे पालन करुनच प्रवास करावा असे चहल यांन सांगितले. सध्या जरी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यूचा दर हा खूपच कमी आहे, त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे चहल म्हणाले, मात्र नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यांनीही काळजी घ्यावी.  डॉक्टर हे आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असल्याचे चहल यांनी यावेळी सांगितले. सध्या 85 टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. ओमायक्रॉनमुळे डेल्टाचे प्रमाण कमी झाले असल्याचे चहल यांनी यावेळी सांगितले.

राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होतेय, त्याचबरोबर नियमांचे पालन केले जात नाही, असा त्यांना प्रश्न विचारला असता, चहल यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 50 टक्क्यांपर्यंत उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. त्याप्रमाणे सर्वांनीच नियमांचे पालन करावे असे चहल म्हणाले. आम्ही मुंबईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे चहल यावेळी म्हणाले. प्रत्येकाने जर मास्कचा वापर केला तर पुढचा धोका टाळू शकतो असेही चहल यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget