एक्स्प्लोर

कंगना रनौतनं पालिकेवर केलेल्या आरोपांपेक्षा वस्तुस्थिती पूर्णत: भिन्न; मुंबई महापालिकेचा हायकोर्टात दावा

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी करणार्‍या अभिनेत्री कंगना राणौतनं पाली हिल येथील बंगल्यात केलेलं बांधकाम हे बेकायदेशीर असल्यानेच त्यावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कंगनानं त्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर इतर आरोप करावेत अशी ठाम भूमिका पालिकेच्यावतीनं मांडण्यात आली.

मुंबई : वांद्रे पाली हिल येथील आपल्या ऑफिसवर मुंबई महापालिकेनं केलेली कारवाई ही केवळ शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच निव्वळ सुडबुध्दीनं केली, असा दावा कंगना रनौतच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी करण्यात आला. याची दखल घेत न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठानं खासदार संजय राऊत यांनी या कारवाईबद्दल केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण व्हिडिओ तसेच त्यांनी केलेले ट्वीट्स कोर्टात सादर करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले. तसेच मंगळवारी यासंदर्भात संजय राऊत यांच्या वकिलांना युक्तिवाद करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारच्या सुनावणीत राऊत यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, राऊत यांनी समाजमाध्यमांवर कधीही कंगनाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी करणार्‍या अभिनेत्री कंगना राणौतनं पाली हिल येथील बंगल्यात केलेलं बांधकाम हे बेकायदेशीर असल्यानेच त्यावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कंगनानं त्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर इतर आरोप करावेत अशी ठाम भूमिका पालिकेच्यावतीनं मांडण्यात आली. कंगनानं बांधकामात केलेले बदल हे छोटेमोठे नसून एफएसआयच्या नियमांच मोठ्या प्रमाण उल्लंघन झालेलं आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे याप्रकरणी याचिका दाखल होऊच शकत नाही, असा दावा करत ही याचिका फेटाळून लावण्याची विनंती कोर्टाकडे केली आहे.

कंगवाच्यावतीने अ‍ॅड. बिरेंद्र सराफ यांनी युक्तीवाद करताना कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारच्या धोरणांवर टिका केल्यानं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना तिखट प्रतिक्रिया दिली होती. तिला धडा शिकविला पाहिजे, असं वक्तव्य करताना काही आक्षेपार्ह शब्दही वापरले. आणि त्यानंतर लगेच पालिकेकडून कारवाईची हालचाल सुरु झाली असा आरोप कंगनाच्यावतीनं करण्यात आला. संजय राऊत यांनी एका हिंदी वृत्त वाहीनीवर दिलेल्या मुलाखतीचा संबधित व्हिडीओ कोर्टात लावून दाखवण्यात आला.

पाहा व्हिडीओ : कंगनाकडून कार्यालयात अनेक बेकायदेशीर बांधकाम, मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीचा दावा

बंगल्यात कोणतंही अनधिकृत बांधकाम सुरु नव्हतं असा दावा करताना जरी बेकायदा बांधकाम सुरु होतं असं गृहित धरलं तर पालिकेने बजावलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी आवश्यक कालावधी देणे बंधनकारक आहे. मात्र पालिकेने ना वेळ दिला, ना बांधकाम नियमित करण्यासाठी नियमानुसार संधी दिली, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. बेकायदेशीर बांधकामांसंबंधी कारवाई करण्यापूर्वी किमान 15 दिवसांची नोटीस द्यावी, असा निकाल यापूर्वी हायकोर्टानं दिला आहे. तर, सुप्रीम कोर्टाने अनधिकृत बांधकामाच्या फोटोंसह मालकाला किमान सात दिवसांची नोटीस देण्यात यावी असं स्पष्ट केलं आहे. असं असताना पालिकेने उत्तर देण्याची पुरेशी संधी न देता केवळ 24 तासांची नोटीस देऊन घाईघाईत तोडकामाची कारवाई केली असा युक्तिवाद कंगनाच्यावतीनं करण्यात आला.

पालिकेनं कंगनाच्या याचिकेतील सर्व आरोप फेटाळून लावले. आपल्या विधानांमुळे निव्वळ आकसापोटी ही कारवाई केल्याचा दावाच हास्यास्पद आहे. मुळात कंगनाच्या विधानांचा आणि पालिकेच्या कारवाईचा काहीही संबंध नाही. आपण कोणतंही बेकायदा बांधकाम केलेलंच नाही अशी भुमिका कशी काय घेईल? असा सवालही पालिकेनं उपस्थित केला. पालिकेनं या बेकायदा बांधकामासंबधी 24 तासांची नोटीस दिली होती. तसेच जागा रिकामी करण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता, त्यावर तिनं कोणतंही उत्तर न दिल्यानं त्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे कारवाईत झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही असं पालिकेनं ठणकावलं आहे. या बांधकामावर कारवाई वेगात झाली असेल परंतु ती चुकीची मुळीच नाही. तसेच कारवाई सूडबुध्दीने केल्याच्या आरोपाची पळवाट काढत बेकायदेशीर बांधकामाची पाठराखण करता येणार नाही असंही पालिकेने हायकोर्टात स्पष्ट केलं.

मात्र पालिकेच्या युक्तीवादानंतर न्यायालयानं पालिकेच्या कारवाईतील तत्परतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलं? अन्य बेकायदा बांधकामाविषयी नोटीसी काढल्यावर इतक्या तत्परतेनं कारवाई का होत नाही?, त्यामुळे या कारवाईत कुठे तरी पाणी मुरतंय, असं मत न्यायालयानं यावेळी व्यक्त केलं. सोमावरच्या सुनावणीत अखेरच्या सत्रात हायकोर्टानं ही कारवाई करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना कोर्टापुढे हजर करत काही प्रश्न विचारले. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
धक्कादायक! गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलानेच आईचे लाखो रुपयांचे दागिने चोरले, आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलानेच आईचे लाखो रुपयांचे दागिने चोरले, आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात
Rohit Pawar on NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यातून कोणीतरी घरभाडं अन् ब्युटी पार्लरचे पैसे दिले, अजितदादांना समजल्यावर संतापले, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यातून कोणीतरी घरभाडं अन् ब्युटी पार्लरचे पैसे दिले, अजितदादांना समजल्यावर संतापले, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Embed widget