एक्स्प्लोर

12 वर्षांपासून रखडलेला कळवा रेल्वे ब्रिज अखेर मार्चमध्ये सुरु होणार; मध्य रेल्वेची डोखेदुखी जाणार

कोरोना काळात अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याचा वेळ असूनही गेल्या 12 वर्षांपासून रखडलेला कळवा रेल्वे ब्रिज अजूनही अपूर्णच आहे.

ठाणे : कोरोना काळात अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याचा वेळ असूनही गेल्या 12 वर्षांपासून रखडलेला कळवा रेल्वे ब्रिज अजूनही अपूर्णच आहे. रेल्वेने आपल्या मार्गावरील गर्डर टाकून काम पूर्ण केले आहे, त्याला देखील अनेक वर्षे उलटली. मात्र, ब्रिज वर चढायचा आणि उतरायचा रस्ता जो ठाणे महापालिका बांधत आहे, तोच अपूर्ण असल्याने रोज प्रचंड ट्राफिक या फाटकाजवळ होते.

मध्य रेल्वेचे वेळापत्रक ज्या रेल्वे फाटकामुळे रोज बिघडते ते म्हणजे कळवा रेल्वे फाटक. खरंतर हे रेल्वे फाटक काही वर्षे आधीच बंद झाले असते. पण नेहमीप्रमाणे लालफितीच्या कारभारात ते अडकले. याच फाटकाच्या जागी एक पुल बांधण्याचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. मात्र, या पुलाचे काम गेली बारा वर्षे पूर्ण होऊ शकले नाही. "कळवा रेल्वे फटकामुळे होत असलेला त्रास पाहून 2006 साली याठिकाणी 1 पूल बांधण्याचे ठरवले गेले, त्याला 2008 झाली ठाणे महानगरपालिकेने मंजूर घेऊन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र, त्यानंतर कळवा पूर्वेला आणि पश्चिमेला पूल ज्या ठिकाणी उतरवायचा होता त्याजागी जमिनीचे अनेक वाद समोर आले, यातील मफतलाल कंपनीच्या जमिनीच्या वादामुळे सर्वात जास्त विलंब झाला", असे कळवा खारेगाव प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी सांगितले. सिद्धेश देसाई गेली अनेक वर्षे या पूलाच्या बांधकामासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करीत आहेत.

12 वर्षांपासून रखडलेला कळवा रेल्वे ब्रिज अखेर मार्चमध्ये सुरु होणार; मध्य रेल्वेची डोखेदुखी जाणार

2008 साली मंजुरी मिळाल्यानंतर ठाणे महानगरपालिका आणि रेल्वेकडून या पुलाचे काम जास्तीत जास्त तीन ते चार वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही आणि आजही हा पूल अपूर्ण बांधून उभा आहे. रेल्वेने काही वर्षांपूर्वी त्यांच्या जागेवरील गर्डर टाकून, त्यांच्या वाट्याचे काम पूर्ण केले. मात्र, ठाणे महापालिकेकडून कामाला हवी तशी गती मिळाली नाही.

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यास रेल्वे अनुकूल; पण..

लॉकडाउन झाल्यापासून महत्त्वाची बांधकामे पूर्ण करण्याची मोठी संधी ठाणे महानगर पालिका प्रशासनाकडे होती. मात्र, त्या संधीचं सोनं त्यांना करता आले नाही. आता पुढील मार्च महिन्यात हा ब्रीज बांधून पूर्ण होईल, असे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. "कोरोना काळात हे काम रखडले कारण मजूर आणि इतर गोष्टींचा तुटवडा होता. आता मात्र काम पूर्ण गतीने सुरू आहे, ते लवकर करण्याचे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत, मार्च 2021 मध्ये हा पूल पूर्ण होईल", असे म्हस्के म्हणाले.

तर दुसरीकडे या दिरंगाईचा फटका कळवेकरांना भोगावा लागतोय. अनेकांचे जीव गेल्या अनेक वर्षात गेलेले आहेत. स्थानिकांच्या भावना ऐकून घ्यायला देखील कोणाकडे वेळ नाही. कळवा रेल्वे फाटक हे मध्य रेल्वेचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे दुखणे आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस या फाटकामुळे सर्व गाड्या रखडतात. त्याचा थेट परिणाम मध्य रेल्वेच्या लाखो प्रवाशांवर होतो. या त्रासातून त्यांना ठाणे महानगरपालिका सोडवू शकते. मात्र, आता नवी डेडलाईन मिळाल्याने कळवेकर हवालदिल झाले आहेत.

#MumbaiLocal लोकल सुरू करण्यासाठी अटी-शर्तींवर सहमती नाही? गर्दीची जबाबदारी घेण्यावरून टोलवाटोलवी?

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident : चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, 10 जण गंभीर जखमी
चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, 10 जण गंभीर जखमी
आमच्या पक्ष नेतृत्वानं आत्मपरिक्षण करावं; सचिन अहिरांनंतर ठाकरेंचा आणखी एक आमदार नाराज?
आमच्या पक्ष नेतृत्वानं आत्मपरिक्षण करावं; सचिन अहिरांनंतर ठाकरेंचा आणखी एक आमदार नाराज?
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Sachin Ahir : स्वत: आमदार, उपनेते, कामगार सेना अध्यक्ष, मुलीला प्रभाग समिती, भावाला BEST समिती, सचिन अहिरांना ठाकरेसेनेत कोणती पदं? 
स्वत: आमदार, उपनेते, कामगार सेना अध्यक्ष, मुलीला प्रभाग समिती, भावाला BEST समिती, सचिन अहिरांना ठाकरेसेनेत कोणती पदं? 

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Sachin Ahir Anti Defection Law: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
Sachin Ahir and Aaditya Thackeray: पक्ष सोडताच पहिला हल्ला आदित्य ठाकरेंवर, वरळीतून निवडणूक लढणार का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले....
पक्ष सोडताच पहिला हल्ला आदित्य ठाकरेंवर, वरळीतून निवडणूक लढणार का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले....
Embed widget