एक्स्प्लोर

...तर जस्टिस लोया प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करु : अनिल देशमुख

अमित शाह आणि गुजरातमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप असलेल्या बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती लोया करत होते.

मुंबई : बहुचर्चित जस्टिस ब्रिजगोपाल लोया मृत्यू प्रकरणाचे ताजे आणि नवे पुरावे कुणी दिले तसंच पुन्हा तपासाची मागणी केली तर राज्य सरकार ही केस पुन्हा ओपन करेल, असं राज्याचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. मुंबईत गुरुवारी (9 जानेवारी) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जस्टिस लोया यांच्याच कोर्टात गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन बनावट चकमकप्रकरणाची सुनावणी सुरु होती. जस्टिस लोया हे सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी नागपुरात गेले होते, तिथे 1 डिसेंबर 2014 रोजी त्यांचा  मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आला. परंतु त्यांचा खून झाल्याचा आरोप करण्यात आला.

अनिल देशमुख म्हणाले की, "या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासंदर्भात काही लोकांनी माझी भेट घेतली आहे. जर राज्य सरकारला ठोस पुराव्यांसोबत तक्रार मिळाली तर जस्टिस लोया यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीबाबत विचार करु." सुप्रीम कोर्टाने अनेक याचिका फेटाळल्या मूळ लातूरच्या असलेल्या न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. 2018 मध्ये न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती चंद्रचूड आणि दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळल्या होत्या. मात्र आता पुन्हा तपासाची मागणी केल्यास ही केस पुन्हा ओपन करु, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. काय आहे जस्टिस लोया प्रकरण? अमित शाह आणि गुजरातमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप असलेल्या बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती लोया करत होते. 2005 मध्ये सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसरचं गुजरात पोलिसांनी अपहरण केलं आणि हैदराबादमध्ये झालेल्या कथित एन्काऊंटरमध्ये त्यांना ठार केलं. सोहराबुद्दीन एन्काऊंटरचा साक्षीदार तुलसीरामचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणाशी संबंधित खटला सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात ट्रान्सफर केला होता. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी न्यायाधीश उत्पत करत होते. त्यानंतर त्यांची बदली झाली. यानंतर न्यायमूर्ती लोया यांच्याकडे खटल्याची सुनावणी आली. मात्र डिसेंबर 2014 मध्ये जस्टिस लोया यांच्या मृत्यूनंतर अमित शाह यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली होती.

जर महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली तर भाजपसाठी हा झटका ठरु शकतो. कारण तेव्हा सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, 1 डिसेंबर 2014 रोजी जस्टिस लोया यांचा 'नैसर्गिक मृत्यू' झाला होता. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची एसआयटी तपासाची मागणीही फेटाळली होती.

विरोधकांची प्रतिक्रिया किरीट सोमय्या : कोणत्याही प्रकरणात ठोस पुरावे बाहेर आले तर गृहमंत्रालयाची जबाबदारी त्याची चौकशी करायची. पण कोणी राजकारण करायचा प्रयत्न केला तर ते योग्य नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. सुधीर मुनगंटीवार : सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे, केस कधीही ओपन होऊ शकते. त्यात काही अडचण नाही. पण केस ओपन केली तर त्यामधून निष्कर्षही काढा. केवळ सत्ता ओपन राहावी म्हणून केस ओपन केली, तर जनता माफ करणार नाही, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. प्रवीण दरेकर : नवं सरकार आल्यापासून प्रत्येक गोष्ट सूडबुद्धीने केली जात आहे. क्लोजर रिपोर्ट मिळाला असतानाही गृहमंत्र्यांनी ही केस पुन्हा ओपन करण्याचं वक्तव्य केलं आहे. सत्तेचा उपयोग करुन राजकीय स्वार्थ साधून बदनामीचा प्रयत्न सुरु आहे, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. आशिष शेलार : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली. "ज्या पद्धतीचे वक्तव्य महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केलं आहे, ते पाहता ते फॅक्टच्या आणि कायद्याच्या आधारे कारभार न करता राजकारण करुन कारभार करत आहेत. ज्या लोया प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे, त्याची पुन्हा चौकशी करु असं म्हणणं म्हणजे केवळ याकडे राजकारण म्हणून पाहण्यासारखं आहे," असं शेलार म्हणाले.

...तर चौकशीच्या मागणीचा विचार करायला हवा : शरद पवार जस्टिस लोया प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी लोकांची मागणी असेल तर याचा नव्याने विचार करायला हवा. कोणी जर अशी मागणी करत असेल तर ते कुठल्या आधारावर आहे, याचाही विचार करावा लागेल. परंतु या प्रकरणात कुठलंही तथ्य नसेल तर अशाप्रकारचे आरोप कोणावर लावणेही हे देखील तेवढंच चुकीचं, असं शरद पवार यांनी सांगितलं.

Justice Loya death | जस्टिस लोयांची फाईल पुन्हा ओपन होणार? | ABP Majha HM Anil Deshmukh | जस्टिस लोया केसप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया | ABP Majha Justice Loya death case | जस्टिस लोया मृत्यूप्रकरण काय आहे? | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget