एक्स्प्लोर

'रिमोट कंट्रोल' कसा बनला राजकीय शब्द? पहिल्यांदा कोणी वापरला होता?

सध्याच्या राजकारणात रिमोट कंट्रोल हा शब्द बऱ्याचदा वापरला जातो. बाळासाहेबांपासून सोनिया गांधी तसंच शरद पवार यांच्याकडे सत्तेचा रिमोट कंट्रोल असल्याचं बोललं गेलं. पण रिमोट कंट्रोल या शब्दाला राजकारणात एवढं महत्त्व कधीपासून मिळायला लागलं?

मुंबई : रिमोट कंट्रोल हे टीव्ही किंवा इतर उपकरणं चालवण्याचं छोटं यंत्र आहे, पण भारतीय राजकारणात मागील अडीच दशकांपासून या शब्दाचा सर्रास वापर होत आहे. या शब्दाचा वापर नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र सरकारचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात नाही. पवार फक्त सरकारचे मार्गदर्शक आहेत." ज्याप्रकारे रिमोट कंट्रोलचा वापर टीव्ही चालू-बंद करण्यासाठी, चॅनल बदलण्यासाठी होतो, त्याचप्रकारे काही राजकीय नेते सरकारच्या बाहेर राहूनही सरकार नियंत्रणात ठेवतात. आपल्या अदृश्य रिमोटद्वारे त्यांनी कधी मंत्र्यांना बदललं तर कधी मुख्यमंत्री, कधी सरकारला काही निर्णय घेण्यास भाग पाडलं तर काही निर्णय थांबवले. सरकार कोणत्या मुद्द्यावर कोणती भूमिका घेणार, याचा निर्णय रिमोट कंट्रोल ज्या नेत्याच्या हातात आहे तोच ठरवतो. पहिल्यांदा वापर कोणी आणि कधी केला? या शब्दाचा पहिला वापर 1995 मध्ये झाला होता. त्यावेळी महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं होतं. ज्यावेळी शिवसेनेकडून मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं, तेव्हा पत्रकारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विचारलं होतं की, "तुम्ही सत्तेचा भाग का नाही?" यावर बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं की, "सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात राहिल." याचा अर्थ स्पष्ट होता की, सरकारचा चेहरा मनोहर जोशी असले तरी सरकारची खरी ताकद बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात होती. बाळासाहेबांनी शपथ घेतली होती की ते ना कधी निवडणूक लढणार ना कधी सत्तेचं कोणतंही पद स्वीकारणार. बाळासाहेबांनी आपल्याजवळील रिमोट कंट्रोलचा पुरेपूर वापरही केला. सरकारचे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्याच सांगण्यावरुन घेण्यात आले. 1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा त्यांनी रिमोटचं बटण दाबलं तेव्हा मनोहर जोशी यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि त्याजागी नारायण राणे यांना बसवलं. मात्र त्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या हातातून रिमोट कंट्रोल निसटला आणि महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. मुख्यमंत्री काँग्रेसचा, सरकारमध्ये वजन मात्र शरद पवारांचं 2004 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्याकडे आला. मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं खरं पण वजन मात्र शरद पवारांचंच होतं. यामागे कारण असं होतं की, काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकूनही शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली. तेव्हा काँग्रेसने 69 तर राष्ट्रवादीने 71 जागा जिंकल्या होत्या. केंद्रातही रिमोट कंट्रोल शब्दाचा वापर रिमोट कंट्रोल शब्दाचा वापर केंद्र सरकारसाठीही झाला. 2004 मध्ये जेव्हा यूपीएची सत्ता आली, तेव्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पंतप्रधानपद नाकारुन डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधानपदी बसवलं. त्यानंतर पुढील दहा वर्षांपर्यंत म्हणजेच 2014 पर्यंत केंद्र सरकारचा रिमोट कंट्रोल सोनिया आणि राहुल गांधी यांच्या हातात होता, असं म्हटलं गेलं. सरकारचा रिमोट पवारांच्या हाती नाही, ते मार्गदर्शक : उद्धव ठाकरे 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर जे सत्तेचं नाटक झालं, त्याचे सूत्रधार शरद पवार असल्याचं म्हटलं जातं. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्या हातात आहे आणि 1995 पासून 1999 पर्यंत ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी सरकार  नियंत्रणात ठेवलं होतं, तसंच शरद पवार आता करत आहेत, अशीही चर्चा आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. शरद पवार केवळ मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत, असा दावा त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या
Mumbai Rajbhavan : खळबळजनक बातमी! हाय सिक्युरिटी असलेल्या राजभवनात गोळी झाडली, ड्युटीवरील SRPF जवानाने संपवलं जीवन
खळबळजनक बातमी! हाय सिक्युरिटी असलेल्या राजभवनात गोळी झाडली, ड्युटीवरील SRPF जवानाने संपवलं जीवन
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget