एक्स्प्लोर

Mumbai Rain : मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाची जोरदार हजेरी 

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. या पावसामुळं मुंबईकरांना उकाड्यापासून  दिलसा मिळाला आहे.

Mumbai Rain : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचे दिसत आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. या पावसामुळं मुंबईकरांना उकाड्यापासून  दिलसा मिळाला आहे. मुंबईत रात्री पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुंबईतही पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, रात्रीपासून पुन्हा पावासाचा जोर वाढला आहे. दरम्यान, आजही मुंबईत पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 
 
काही भागात वाहतुकीवर परिणाम

मुंबईत झालेल्या पावसामुळं काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. कुर्ला-अंधेरी रोडवरील काजूपारा इथेही रस्त्यावर पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. वाहतूक संथ गतीनं सुरु होती. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, सायन परिसरात काही वेळ जोरदार पाऊस झाला. मुंबईसह राज्यातील इतरही काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही काल दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं झाडे उन्मळून पडली आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत चांगला पाऊस

महाराष्ट्रात आत्तापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावासानं हजेरी लावली आहे. 1 जून ते 31 ऑगस्टपर्यंत राज्यात सरारीपेक्षा 18 टक्के अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं (Meteorological Department) दिली आहे. सांगली जिल्हा सोडता संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर सर्वाधिक पाऊस नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाला आहे. तिथे सरासरीच्या 53 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात 814 मिमी पाऊस होत असतो, मात्र, प्रत्यक्षात यावर्षी 957 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

राज्यातील सांगली जिल्हा सोडता संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. सांगलीत सरासरीच्या 21 टक्के कमी पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक पाऊस नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाला आहे. सरासरीच्या 53 टक्के अधिक पावसाची नोंद नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाली आहे.  त्यानंतर नांदेडमध्ये सरासरीच्या 50 टक्के अधिक पाऊस तर नागपुरात सरासरीच्या 47 टक्के अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.  दरम्यान, पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपुरात सरासरीच्या 30 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
Devendra Fadnavis On Minister Foreign Tours: सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
Thane Crime News: आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
Pydhonie Deaths: डोकाडिया कुटुंबातील व्यक्तींच्या यकृत अन् मूत्रपिंडाचा हिरवट रंग; 'हिस्टोपॅथॉलॉजी' अहवालात धक्कादायक खुलासा; अवयवांचा हिरवट रंग विषबाधेचे संकेत, रिपोर्ट समोर
डोकाडिया कुटुंबातील व्यक्तींच्या यकृत अन् मूत्रपिंडाचा हिरवट रंग; 'हिस्टोपॅथॉलॉजी' अहवालात धक्कादायक खुलासा; अवयवांचा हिरवट रंग विषबाधेचे संकेत, रिपोर्ट समोर

व्हिडीओ

Mateen Patel Home Demolish : नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराचं पाडकाम, पालिका अधिकारी काय म्हणाले_
Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रात्री अकराला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट, पुन्हा परत घरी आले अन् पहाटे अखेरचा श्वास; अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावासोबत नेमकं काय घडलं? मृत्यूवर दाव्यांवर सनसनाटी दावे
रात्री अकराला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट, पुन्हा परत घरी आले अन् पहाटे अखेरचा श्वास; अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावासोबत नेमकं काय घडलं? मृत्यूवर दाव्यांवर सनसनाटी दावे
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
Gold-Silver Rate : सोनं 9,231 रुपयांनी महाग, चांदीतही मोठी उसळी, अचानक झालेल्या या दरवाढीमागे नेमकं काय आहे कारण?
सोनं 9,231 रुपयांनी महाग, चांदीतही मोठी उसळी, अचानक झालेल्या या दरवाढीमागे नेमकं काय आहे कारण?
बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी झाले मुख्य सचिव, SIR निरीक्षक झाले मुख्यमंत्र्यांचे सल्लागार; भाजप-निवडणूक आयोगाच्या चोर बाजारात चोरी जेवढी मोठी, तेवढे मोठं बक्षीस' राहुल गांधींचा हल्लाबोल
बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी झाले मुख्य सचिव, SIR निरीक्षक झाले मुख्यमंत्र्यांचे सल्लागार; भाजप-निवडणूक आयोगाच्या चोर बाजारात चोरी जेवढी मोठी, तेवढे मोठं बक्षीस' राहुल गांधींचा हल्लाबोल
कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतात किती दिवसांचा पेट्रोल गॅसचा साठा शिल्लक? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीच केला खुलासा
कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतात किती दिवसांचा पेट्रोल गॅसचा साठा शिल्लक? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीच केला खुलासा
CM Vijay Thalapathy Kamal Haasan Support: मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'
मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'
मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ; गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?
मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ; गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?
अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावाच्या अकाली निधनाने कुटुंबात सन्नाटा; मृत्यूचा कारणाचा अजूनही उलघडा नाही, सपा प्रमुख स्वत: पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले
अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावाच्या अकाली निधनाने कुटुंबात सन्नाटा; मृत्यूचा कारणाचा अजूनही उलघडा नाही, सपा प्रमुख स्वत: पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले
Embed widget