एक्स्प्लोर

माजी राज्यपालांचा महापुरुषांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता; हायकोर्टाची टिप्पणी, याचिका फेटाळली

Maharashtra News: माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधातील याचिका फेटाळली.न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाचा निर्णय.

Maharashtra News: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले महाराष्ट्राचे (Maharashtra News) माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं (High Court Of Bombay) नुकतीच फेटाळून लावली आहे. माजी राज्यपाल कोश्यारी यांचा हेतू समाजाचं प्रबोधन (Social Awareness) करण्याचाच होता, कोणत्याही महान व्यक्तीचा अनादर करण्याचा नव्हता असं निरीक्षण न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Justice Sunil b. Shukre) आणि न्यायमूर्ती अभय वाघवासे (Abhay Waghwase) यांच्या खंडपीठानं या संदर्भातील याचिका फेटाळताना आपल्या आदेशात नमूद केलं आहे. 

राज्यपालांची (Governor of Maharashtra) वक्तव्य ही इतिहासाच्या विश्लेषणात्मक आहेत. ही वक्तव्य राज्यपालांचा सामाजिक दृष्टीकोन दाखवतात. श्रोत्यांनीही समाजाभीमूख दृष्टीकोन आत्मसात करत तो आचरणातही आणावा हाच त्या वक्तव्यांमागचा उद्देश होता. त्यामुळे ही वक्तव्य प्रथमदर्शनी कोणत्याही महापुरुषाचा अवमान करणारी नाहीत. म्हणूनच ही फौजदारी कायद्यानुसार, दखल घेण्यास पात्र ठरत नाहीत, असंही निरीक्षण हायकोर्टानं (High Court) आपल्या आदेशात नोंदवत ही याचिका फेटाळून लावली.

याचिका नेमकी काय होती? 

माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले (Jyotirao Phule) आणि मराठी माणसाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाईची मागणी करत रिट याचिका दाखल करण्यात आली होती. अनुसूचित जाती, जनजाती प्रतिबंधक अधिनियम 2015 (सुधारित) कलम 3 (1)(5) अन्वये ही याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यपाल आणि भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी (BJP MLA Sudhanshu Trivedi) यांनी केलेल्या विवादीत वक्तव्यांमुळे अनुसूचित जाती सोबतच सर्वसामान्य लोकांच्याही भावना दुखावल्या गेल्याचा आरोप याचिकर्ते रामा कटारनावरे यांनी आपल्या याचिकेतून केला होता. या याचिकेद्वारे त्यांनी कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

उस्मानाबादच्या धाराशिव नामांतरामुळे समाजात कोणतीही धार्मिक तेढ नाही, लोकांनी स्वागतच केलं; राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget