एक्स्प्लोर

माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांचं वृद्धापकाळाने निधन

राम प्रधान यांच्या सेवेचा बराचसा काळ हा केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर किंवा परदेशात गेला. त्यांनी सरकारी सेवेत काम करताना आलेले अनुभव राजकारण्यांशी संबंध यावर आधारित त्यांनी बियॉन्ड एक्सपेक्टेशन हे आत्मचरित्रही लिहिले होते.

मुंबई : माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांचे शुक्रवारी वयाच्या 92व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.  36 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत अनेक केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध जुळले होते. यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते. पंजाबमधील ऑपरेशन ब्ल्यूस्टारनंतर पंजाबमध्ये शांती निर्माण करण्यापासून ते मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याचा अहवाल सादर करण्यापर्यंत त्यांनी विविध भूमिका बजावल्या होत्या. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय इतिहासातील एक चालता-बोलता अध्याय संपला आहे. राम प्रधान जीनिव्हात असताना त्यांना बाबासाहेब भोसले यांनी फोन करून  महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तेव्हा आपण कधी भेटलेलो नाही वा आपले कधी नावही ऐकलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलत आहे यावर विश्वास कसा ठेवणार असा प्रतिप्रश्न विचारणारे अधिकारी म्हणजे राम प्रधान. १९५२ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी राम प्रधान यांनी संरक्षण मंत्रालय, व्यापार मंत्रालय, राज्याचे गृहसचिव, जहाजबांधणी विभागाचे महासंचालक, जिनिव्हात संयुक्त राष्ट्रसंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय गृहसचिव ते अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद अशी विविध पदे भूषवली आहेत. राम प्रधान यांच्या सेवेचा बराचसा काळ हा केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर किंवा परदेशात गेला. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये गृह सचिव असताना त्यांना सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असल्याचा सुगावा लागला. ही बाब त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या कानावर घातली परंतु त्यांचा शरद पवार यांच्यावर विश्वास असल्याने त्यांनी लक्ष दिले नाही आणि एक आठवड्याभरातच दादांचे सरकार गेले. राजीव गांधी पंतप्रधान असताना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता मुंबईत आले होते. विमानतळावरच त्यांनी राम प्रधान यांना दिल्लीत काम करण्यास सांगितले. राम प्रधान यांनी गृहसचिवपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा पंजाब, आसाम आणि मिझोराम या तीन राज्यांमध्ये हिंसाचार सुरू होता. पंजाब-प्रश्नावर तोडगा काढण्याची जबाबदारी राजीव गांधी यांनी त्यांच्यावर सोपवली होती. तेव्हा त्यांनी राज्यपाल बदलण्याची आणि तेथे राजकीय व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची सूचना केली. अर्जुनसिंग यांची राज्यपालपदी निवड झाली. पुढे पंजाबमध्ये शांततेसाठी करारही झाला. आसामचा तिढा सोडविण्यातही त्यांनी यश मिळवले होते. 30 जून 1986 हा निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी भारत सरकार आणि मिझो बंडखोरांमध्ये शांतता करार घडवून आणला होता. सरकारी सेवेत काम करताना आलेले अनुभव, राजकारण्यांशी संबंध यावर आधारित त्यांनी बियॉन्ड एक्सपेक्टेशन हे आत्मचरित्रही लिहिले होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut :  अशोक खरात सरकारचाच माणूस, त्याचापाठी 40 आमदार; खासदार संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...
अशोक खरात सरकारचाच माणूस, त्याचापाठी 40 आमदार; खासदार संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...
Sunil Tatkare on NCP Merger: सुनील शेळकेंनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा 'जिवंत' केला, सुनील तटकरे म्हणाले, ' ते ज्येष्ठ आमदार, प्रभावी नेते...'
सुनील शेळकेंनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा 'जिवंत' केला, सुनील तटकरे म्हणाले, ' ते ज्येष्ठ आमदार, प्रभावी नेते...'
Pune Crime: नोकरी गेल्याने मानसिक धक्का, मुंबईच्या आदित्य सातपुतेंचं पुण्यातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?
नोकरी गेल्याने मानसिक धक्का, मुंबईच्या आदित्य सातपुतेंचं पुण्यातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?
BMC commissioner : मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
Iran War Live Update: 'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
Aniket Varma: अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
Pankaja Munde : स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
Ashok Kharat:अशोक खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांची नावं डमी आयडेंटिटीने सेव्ह, सरकारी वकिलांचा कोर्टात
अशोक खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांची नावं डमी आयडेंटिटीने सेव्ह, सरकारी वकिलांचा कोर्टात
Thane Electricity Supply : ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
Chhatrapati Sambhajinagar Crime: तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
Embed widget