एक्स्प्लोर

Veer Savarkar | काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी नाही, मनमोहन सिंगांच वक्तव्य

काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी नाही, असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

मुंबई : काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी नाही, असं मत माजी डॉ. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मांडलं आहे. काँग्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांबाबत मतभेद आहेत, मात्र त्यांच्याबाबत आदर असल्याचं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. मनमोहन सिंग मुंबईत अर्थव्यवस्थेबाबत संवाद साधण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आपलं मत मांडलं.

काँग्रेस पक्षापेक्षा जास्त देशभक्त कुणी नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजप आणि आरएसएसचं नाव देखील नव्हतं. त्यामुळे काँग्रेसला देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा टोला मनमोहन सिंग यांनी भाजपला लगावला. काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी नाही, म्हणून इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने पोस्टल स्टॅंप सुरु केला होता, अशी माहितीही मनमोहन सिंग यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. यावर बोलताना, भारतरत्न देण्यासाठी एक समिती नेमली जाते आणि ती समिती भारतरत्न कुणाला द्यायचं याबाबत निर्णय घेत असते, असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं.

याआधी काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यास तीव्र विरोध केला होता. सावरकरांना भारतरत्न देणार असाल तर नथुराम गोडसेला ही भारतरत्न मिळणार, अशी टीका मनिष तिवारी यांनी केली होती.

जम्मू काश्मीरमधील कलम 370 वर बोलताना मनमोहन सिंग यांनी म्हटलं की, कलम 370 हटवण्यास आमचा विरोध नव्हता. मात्र ज्या पद्धतीने त्याची अमंलबजावणी झाली, याला आमचा विरोध होता. आता जम्मू काश्मीरच्या नागरिकांच्या सुखसोईंसाठी प्रयत्न केले पाहिजे, असंही ते म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget