एक्स्प्लोर

रोहित आर्याशी बोलण्यास दीपक केसरकरांनी का दिला नकार? पवई ओलीसनाट्यादरम्यान नेमकं घडलं काय?

माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे . रोहित आर्यशी बोलण्यासाठी नकार का दिला ? याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलंय .

Mumbai Hostage case:  पवई येथील तीन तासांच्या ओलीस नाट्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली . मुंबईतील पवई परिसरातील एका स्टुडिओमध्ये 17 अल्पवयीन मुलांना पोलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा (Rohit Arya) पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला . मात्र हे ओलीस नाट्य घडत होतं तेव्हा रोहित आर्य याने पोलिसांना माझी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले होते . एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने जेव्हा केसरकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा रोहित आर्य याच्याशी बोलायला केसरकर यांनी नकार दिला . यावरून माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे . रोहित आर्यशी बोलण्यासाठी नकार का दिला ? याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलंय .

Deepak Kesarkar: काय म्हणाले दीपक केसरकर ?

माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले,'' कोणाचा एनकाउंटर होणार हे कुणाला माहिती नव्हतं. मुलांना ओलीस धरलं चुकीचं होत. त्यामुळे मुलांचा जीव महत्वाचा होता. मी मंत्री नसल्याने ठोस आश्वासन देऊ शकत नव्हतो. त्यांनी मंत्र्यांशी संपर्क साधला असता आणि ते उपलब्ध नसल्यास त्यांनी मला पुन्हा संपर्क केला असता आणि विनंती केली असती तर आवश्यक बोललो असतो. त्यांना त्या विभागाचे मंत्रीच आश्वासन देऊ शकले असते." पोलिसांनी कुणाशी संपर्क साधला हा त्या खात्याचा प्रश्न होता. मुलांना ओलीस धरलं हे अत्यंत चुकीच होत. आश्वासन न देता नुसत बोलायचं असत तर बोललो असतो. त्याने मुलाना ओलीस ठेवून त्याला ठोस आश्वासन हवं होत तर त्या खात्याच्या मंत्री किंवा त्या खात्याच्या अधिकाऱ्यांना होते. ते अधिकार मला नाहीत."

'निर्णय त्या परिस्थितीनुसार घ्यावे लागतात...'

केसरकर पुढे म्हणाले, ''मुलांना ओलीस धरलं तेव्हा मला पोलिसांचा फोन आला तेव्हा मी बोलतो म्हणून सांगितलं. मात्र जेव्हा मला मुल ओलीस ठेवलं आणि तिथे ज्वलनशील पदार्ध आहेत, हे समजल्यानंतर त्याला ठोस आश्वासन मिळालं नसत आणि मुलांना काही केलं असत तर ते चुकीच झालं असत. त्यामुळे ते निर्णय त्या परिस्थिती नुसार घ्यावे लागतात. मी मंत्री नसल्यामुळे मी आश्वासन देण्याची माझी क्षमता नाही. यात मुलांचा प्रश्न महत्वाचा होता. यात एनकाउंटर होणार हे कुणालाही वाटलं नसतं. 

मला एकदाच संपर्क झालेला होता. आश्वासना व्यतिरिक्त अजून काही मदत हवी असल्यास मला फोन वर सांगितल असतं तर ती वेगळी बाब होती. माझी चौकशी आवश्यक असावी. पोलिसांना जे काही माहिती पाहिजे ती देऊ. रोहित आर्या यांच्याशी पहिल्यादा पोलिसांना बोलतो म्हणून सांगितलं होत, मात्र मुलांना ओलीस धरलं हे समजलं, मुलांचा जीव धोक्यात होता, तेव्हा मी बोलण्यास नकार दिला." असंही टे पुढे म्हणाले.

17 अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवलं ...

पवईतील स्टुडिओमध्ये 30 ऑक्टोबर रोजी घडलेल्या ओलीसनाट्यात रोहित आर्याने एकूण  17 अल्पवयीन मुलांसह, दोन वयस्कर लोकांना ओलीस ठेवले होते. आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले होते. आर्याचा दावा होता की, शिक्षण विभागासाठी केलेल्या कामाची थकीत रक्कम न मिळाल्यामुळे तो नाराज होता आणि त्यामुळेच त्याने हा मार्ग निवडला. ओलीसनाट्यादरम्यान रोहित आर्याने पोलिसांना स्पष्ट सांगितले की, “शालेय शिक्षण विभागासाठी मी प्रकल्प राबवला, पण त्याचे पैसे अजून मिळाले नाहीत.” या प्रकरणात आर्याला शिक्षण राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी थेट संवाद साधायचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याने परिस्थितीची माहिती देण्यासाठी केसरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, केसरकर यांनी आर्याशी बोलण्यास नकार दिला, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Monsoon Diseases : मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget