एक्स्प्लोर

... तर एकनाथ खडसे 2014 ला मुख्यमंत्री झाले असते : रावसाहेब दानवे

एकनाथ खडसे यांची त्यांना मुख्यमंत्री करावं अशी इच्छा होती. 2014 साली जर खडसे प्रदेशाध्यक्ष झाले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना दानवे म्हणाले की, खडसेंची नाराजी मुख्यमंत्री पदाच्या दाव्यापासूनच सुरु झाली.

मुंबई : राजकारणात नाराजी एकदाच उद्भवत नसते. छोट्या मोठ्या घटनांनी ती वर येते. एकनाथ खडसे यांची त्यांना मुख्यमंत्री करावं अशी इच्छा होती. 2014 साली जर खडसे प्रदेशाध्यक्ष झाले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना दानवे म्हणाले की, खडसेंची नाराजी मुख्यमंत्री पदाच्या दाव्यापासूनच सुरु झाली. मात्र त्यांना त्या काळात मुख्यमंत्री करता आलं नाही. त्यांना मुख्यमंत्री करता आलं नाही यात चूक कुणाची होती? नाथाभाऊंना प्रदेशाध्यक्ष व्हा असं म्हटलं होतं. राजनाथ सिंह, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी या नेत्यांनी देखील त्यांना गळ घातलेली की प्रदेशाध्यक्ष व्हा. पण त्यांनी माझी तब्येत चांगली नाही असं म्हणत प्रदेशाध्यक्ष पद नाकारलं.  त्यांना काय माहीत की 2014 ला आमचं सरकार येणार आहे. जर ते प्रदेशाध्यक्ष झाले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते, असं ते दानवे म्हणाले.

'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक

मंत्री दानवे म्हणाले की, मी स्वत: मुक्ताईनगरला त्यांना भेटायला गेलो. त्यांना म्हणालो तुम्ही प्रदेशाध्यक्ष व्हा. मात्र त्यांनी केंद्रीय नेतृत्वाने सांगूनही प्रदेशाध्यक्षपद नाकारलं. त्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरायचे. जर त्यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं असतं तर ते मुख्यमंत्री देखील झाले असते, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. राजकारणात संधी येत असते. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं असतं. मात्र त्यानंतरही राज्याच्या मंत्रिमंडळात महत्वाची खाती दिली. मात्र तरीही ते समाधानी नव्हते. त्यांची पात्रता होती ती खाती सांभाळण्याची याबाबत दुमत नाही, असंही दानवे म्हणाले.

... म्हणून राष्ट्रवादीतच जाण्याचा निर्णय घेतला, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण

दानवे म्हणाले की, याआधी खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर किती आरोप केले. आता एकमेकांवर आरोप करणारे एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीने खडसेंचा वापर विकासकामांसाठी करुन घ्यावा, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, आपल्या नाराजीसाठी खडसे यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या. अमित शाहांसह अनेकांच्या भेटी त्यांनी घेतल्या. मात्र त्यांची नाराजी दूर झाली नाही. आम्ही त्यांची मनधरणी करुन थकलो, मात्र ती दूर झाली नाही, असं देखील दानवे म्हणाले. नाथाभाऊंच्या जाण्यानं भाजपची हानी आहे. त्यांची मनधरणी करण्यात अपयशी ठरलो, असं देखील दानवे म्हणाले.

भाजपमध्ये एकही नेता असंतुष्ट नाही. यांच्यातच मेळ नाही, हे कुणाच्याही अपेक्षा पूर्ण करु शकत नाहीत, अशी टीका दानवेंनी केली.

'खडसेंनी भाजप सोडणं धक्कादायक, पक्षासाठी चिंतनाची बाब', खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजप नेत्यांना धक्का

दिल्या घरी सुखी राहावे - रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खडसे यांनी प्रवेशाच्या घोषणा केलेल्या दिवशी म्हटलं होतं की, एकनाथ खडसेंचा हा दुर्देवी निर्णय आहे. त्यांचं राजकीय करिअर भाजपमध्ये घडलं. काही कारणांनी ते मुख्य प्रवाहातून बाहेर गेले. ते जिकडे जात आहेत, त्या लोकांनीही त्यांच्यावर टीका केल्या आहेत. काही काळ त्यांनी वाट पाहायला हवी होती. त्यांच्याविषयी आदर आहेत. त्यांनी दिल्या घरी सुखी राहावे. त्यांना आम्ही वेगळं समजत नव्हतो. आम्ही चिंतन नेहमीच करतो. देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. आमच्यात मनभेद नव्हते, मतभेद होते. मतभेद सर्वच पक्षात असतात. राजकारणात अशा घटना घडत असतात. खडसे आणि फडणवीस हे चांगले मित्र होते. आमच्यात बिनसलं काही नव्हतं, असं दानवे म्हणाले.  आम्ही खूप प्रयत्न केले की त्यांनी पक्षांतर करु नये. त्यांनी पक्षासाठी खूप केलं. पक्षानही त्यांना खूप दिलं, असंही दानवे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget