एक्स्प्लोर

मुंबईत पुढील पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध

गेल्या 5 महिन्यात कोरोनामुळे रक्तदान शिबिरं न झाल्याने पुढील 5 ते 6 दिवस रक्तसाठा पुरु शकणार आहे. आणि ही बाब अत्यंत काळजीची आहे.

मुंबई : मुंबईकरानो सावधान... तुम्हाला जर तात्काळ रक्ताची गरज भासली तर ते मिळेलच याची शक्यता कमी आहे. कारण सध्याच्या घडीला मुंबईत पुढील 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. कोरोनामुळे गेल्या 5 महिन्यांपासून रक्तदान शिबिरात कमालीची घट झाल्याने मुंबईत रक्तसाठा कमी झालेला आहे.

'रक्तदान श्रेष्ठ दान' असं आपण म्हणत असतो. या वाक्याला प्रेरीत होऊन आपण रक्तदानही करत असतो. मात्र गेल्या 5 महिन्यापासून मुंबईत रक्तदान शिबिरांमध्ये कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम आता मुंबईवर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. गेल्या 5 महिन्यात कोरोनामुळे रक्तदान शिबिरं न झाल्याने पुढील 5 ते 6 दिवस रक्तसाठा पुरु शकणार आहे. आणि ही बाब अत्यंत काळजीची आहे.

BLOG | रक्तदान शिबिरांना कोरोनाचा खो!

मुंबईत कोरोनाचे संक्रमण होण्या पूर्वी दोन ते अडीच हजार रक्तदान शिबीरं दर महिन्याला मुंबईत आयोजित होत होती. मात्र कोरोनामध्ये हजार ते बाराशे शिबीरं झाली आहेत. या कालावधीत 50 टक्के रक्तदानात घट झालेली आहे. पूर्वी 50 टक्के सामान्य नागरिक रक्तदान करायचे तर 15 टक्के कॉलेज व 35 टक्के कॉर्पोरेट मधून रक्तदान शिबीरातून रक्त उपल्बध व्हायचे. मात्र कोरोनामुळे 5 महिन्यात ते मिळाले नाही.

2020 मधील रक्तसाठा

जानेवारी - 168144 युनिट फेब्रुवारी - 145289 युनिट मार्च - 110437 युनिट एप्रिल - 53630 युनिट मे - 91137 युनिट जून - 99658 युनिट जुलै - 60750 युनिट ऑगस्ट - 62001 युनिट सप्टेंबर - 63888 युनिट

मुंबईत 17 सरकारी रक्त पेढ्या आहेत. तर 10 खाजगी रक्त पेढ्या आहेत. आपल्या शहराच्या अथवा जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या 1 टक्का रक्त उपलब्ध असणे आवश्यक असते. मुंबईत कोरोना पूर्वी 1 हजार रक्ताच्या बाटल्या दिवसाला लागत होत्या. कोरोनामध्ये महत्वाची ऑपरेशन न झाल्याने रक्ताची मागणी या कालावधीत कमी झाली होती. एकदा रक्तदान केले की ते रक्त 35 दिवसच चालते. त्यानंतर ते खराब होते. त्यामुळे सध्या संकलन कमी झाले होते. कोरोनामुळे शिबिरासाठी सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते पुढं न आल्याने रक्तसाठा कमी झाला आहे. सध्या 5 ते 6 दिवस पुरेल इतका रक्तसाठा मुंबईत उपलब्ध आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने सामाजिक संस्था आणि नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी केले आहे. नवरात्रोत्सवामध्ये आरोग्य शिबिरं भरवून रक्तसाठा पुन्हा सुस्थितीत करण्याचे प्रयत्न शासनाच्या वतीने करण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो आता रक्तदान करणे ही आपली जबाबदारी आहे. असे म्हणून पुन्हा एकदा रक्तदान शिबिराला सुरुवात करा.

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget