एक्स्प्लोर

BEST Strike : आणखी किती दिवस मुंबईकरांचे हाल होणार? सहाव्या दिवशीही बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरुच

BEST Strike : मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा सलग सहाव्या दिवशीही संप सुरुच आहे. त्यामुळे या संपाबाबात तोडगा कधी निघणार हा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

BEST Strike : मुंबईला (Mumbai) ज्याप्रकारे मुंबई लोकल (Mumbai Local) तारते त्याप्रकारे येथे बेस्ट (BEST) बस देखील उत्तम सेवा देत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र गेल्या सहा दिवसांपासून बेस्ट बसचा काहीसा मूड बिघडलेला आहे. मुंबईकरांवर ही बेस्ट बस नाराज झाली असल्याचं म्हटलं जात आहे. बेस्ट बस (BEST Employee) कंत्राटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. पण कामगारांच्या या आंदोलनामुळे मुंबईकर मात्र हैराण झाले आहेत. पण यावर तोडगा काढण्यास सरकार प्रशासनाला अजून यश आलं नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे हा संप किती दिवस चालणार आणि मुंबईकरांचे आणखी किती दिवस हाल होणार असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. 

मुंबईकरांचे प्रचंड हाल

दररोज 35 लाख लोक बेस्ट बस ने प्रवास करत असतात. बेस्ट ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कोणत्याही भागात जायला बेस्टची सेवा आहे. नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर अशा बाजूच्या शहरांमध्येही बेस्टची सेवा आहे. गेली अनेक वर्ष भारतातल्या काही नफ्यामध्ये असणाऱ्या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे "बेस्ट". मात्र मागील काही वर्षांत झालेल्या तोट्यामुळे या व्यवस्थेचं संपूर्ण चित्रच पालटलं असल्याचं म्हटलं जात आहे. 

 बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचा समावेश आहे. बेस्ट उपक्रमाने नियुक्त केलेल्या सहा कंत्राटदारांनी भाडेतत्त्वावरील बसगाड्या उपलब्ध केल्या आहेत.  विविध मार्गांवर चालविण्यात येत आहेत. भाडेतत्त्वावरील बसेसवर संबंधित कंपनीकडूनच कंत्राटी चालक आणि अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी संप सुरु आहे.

कंत्राटदारांचे कर्मचाऱ्यांना पत्र 

बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने कंत्राटदारांचे नाव खराब होत असल्याचा दावा कंपन्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू होण्याचा इशारा कंत्राटदारांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. तसेच जर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील कंपन्यांकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात कंत्राटदारांकडून कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता तरी हे कर्मचारी संप मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कर्मचाऱ्यांनी का पुकारला संप?

मुंबईची राणी असलेल्या बेस्ट बसचं प्रशासन सध्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलं आहे.त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आपल्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने बस  घेण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी प्रशासनाकडून निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. तर या बस आणि  चालक यांची नियुक्ती कंत्राटदाराकडून करण्यात आली होती. पण आता मुंबईतील पंचवीस आगारांपैकी 19 आगारांमधील  9000 कर्मचारी कर्मचाऱ्यांनी अचानक बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरु असून यावर तातडीने तोडगा निघणं आवश्यक असल्याचं म्हटलं जात आहे. 

नेमक्या काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

या कर्मचाऱ्यांना दरमाहा देण्यात येणारं  16 हजार वेतन हे 25 हजार रुपयांपर्यंत मागणी हे कर्मचारी करत आहेत. तसेच बेस्ट बसमधून कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करण्याची सेवा देण्यात यावी. ज्या बसमध्ये बिघाड आहे त्या बस दुरुस्त करुनच आगाराबाहेर काढाव्यात. बंद बसमार्ग पुन्हा सुरू करावेत. तसेच बेस्ट हे महापालिकेमध्ये विलीन करावे अशा मागण्या हे कर्मचारी करत आहेत. 

बेस्ट प्रशासनाचं म्हणणं काय?

 सर्व कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तसेच जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहील, असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. संबंधित कंपन्या,बेस्ट प्रशासन आणि सरकारकडून या संदर्भात कोणत्याही चर्चेसाठी बोलावणं आलं नसल्याचं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. तर या कर्मचाऱ्यांचा आणि प्रशासनाचा काही संबंध नसल्याचं बेस्ट प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. पण तरही कंत्राटदारांसोबतच बोलणं सुरु असून हा संप मिटवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं देखील बेस्ट प्रशासानाकडून सांगण्यात येत आहे.

तसेच अतिरिक्त 700  गाड्या रस्त्यावर आणल्या आहेत, तर एसटीच्या अतिरिक्त 150 गाड्या मागवण्यात आल्या असून जर आणखी गरज लागल्यास ही संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. कंत्राटदारांवर नियम आणि अटीशर्तींप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर बेस्ट प्रशासन सध्या मेस्मा लावण्याच्या विचारात आहेत पण तो कंत्राटदारांवर लावयचा की कर्मचाऱ्यांवर यावर चर्चा सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. 

बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केललेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पावलं उचलण्यात येत आहे. या संपामुळे सर्व सामान्य जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करण्यास सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एसटीच्या काही गाडी देखील यामध्ये सामील करण्यात आलेल्या आहेत. पण तरीही अपुऱ्या सोयीमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा : 

BEST Strike : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला; राज्य सरकारने अधिसूचना काढत उचलले महत्त्वाचे पाऊल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?

व्हिडीओ

Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ
Embed widget