एक्स्प्लोर

डोबिंवलीहून शीळफाट्याकडे जाणारा रस्ता बनला 'ट्रॅफिक जंक्शन'; वाहतूक कोंडीमुळे नोकरदार वर्ग पिचला

मुंबई आणि उपनगरात काम करणारे बहुतांशी नोकरदार हे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या परिसरात वास्तव्याला आहेत. तिथून दररोज मुंबईला जायचं म्हटलं तर शिळफाटा, ठाणे, नवी मुंबई असा प्रवास करत त्यांना मुंबई गाठावी लागते. मात्र या सगळ्यात शीळफाट्याची वाहतूक कोंडी या नोकरदारांची डोकेदुखी ठरलीये.

डोंबिवली : राज्यात 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत सगळे व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. यानंतर सरकारी आणि खाजगी कार्यालयही सुरु झाली. पण मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा मात्र फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांसाठी सुरु झाली. त्यामुळे सहाजिकच खाजगी नोकरदारांना रस्ते वाहतूक हा एकमेव पर्याय उरला आणि आणि इथूनच सुरू झाला वाहतूक कोंडीचा नवीन त्रास. डोंबिवली ते शीळफाटा मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे इथले वाहनचालक अक्षरशः त्रासून गेलेत. तर प्रवाशांचा बराच वेळ या वाहतूक कोंडीमुळे प्रवासातच जात आहे.

मुंबई आणि उपनगरात काम करणारे बहुतांशी नोकरदार हे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या परिसरात वास्तव्याला आहेत. तिथून दररोज मुंबईला जायचं म्हटलं तर शिळफाटा, ठाणे, नवी मुंबई असा प्रवास करत त्यांना मुंबई गाठावी लागते. मात्र या सगळ्यात शीळफाट्याची वाहतूक कोंडी या नोकरदारांची डोकेदुखी ठरलीये. कारण दररोज सकाळी एक ते दीड तास आणि संध्याकाळी एक ते दीड तास इतका वेळ फक्त शीळफाटा ते डोंबिवली इतकंच अंतर पार करायला जातोय. डोंबिवलीच्या मानपाडा आणि काटई नाक्यापासून वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात होते. ही कोंडी अगदी शीळ फाट्यापर्यंत कायम असते. याचं कारण म्हणजे या महामार्गावर सुरु असलेली रस्त्यांची कामं आणि खड्डे.

पाहा व्हिडीओ : डोंबिवली-शीळफाटा मार्ग बनला ट्रॅफिक जंक्शन, वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष

खाजगी नोकरदार वर्ग या दररोजच्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे पुरता पिचून गेलाय. आधीच मुंबईपर्यंतचा तीन ते चार तासांचा प्रवास, त्यात शीळफाट्याची वाहतूक कोंडी यामुळे नोकरदारांचे दिवसातले सात ते आठ तास फक्त प्रवासातच जात आहेत. त्यामुळे एक तर वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी किंवा खाजगी नोकरदारांना सुद्धा लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी त्रस्त वाहन चालक करत आहेत.

मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही वाहनचालकांची ही मागणी लावून धरली आहे. दररोज याच परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून ही कोंडी सोडवता येत नसेल, तर या नोकरदारांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी आणि लवकरात लवकर लोकल सेवा सुरु करावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. याबाबत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक सुद्धा घेतली. मात्र तरीही अधिकारी वर्गाकडून अद्याप तरी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीये.

या सगळ्याचं खापर वाहतूक विभागाने मात्र रस्ते विकास महामंडळावरच फोडलं आहे. डोंबिवली ते शिळफाटा दरम्यान रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचं काम सुरु असून याठिकाणी दोन लेनच्या मधली जागा खडी टाकून बुजवण्यात आली, तर एक नवीन लेन तयार होईल आणि त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल, असं वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित काळे यांचं मत आहे. मात्र याबाबत रस्ते विकास महामंडळाला सांगून सुद्धा त्यांच्याकडून याची अंमलबजावणी होत नसल्याची नाराजी अमित काळे यांनी व्यक्त केली आहे.

आधीच खाजगी नोकरदार वर्गाला कोरोनाच्या संकटात सुद्धा जीव धोक्यात घालून मुंबईला जावं लागतंय. त्यात प्रवासाचे सात ते आठ तास त्यानंतर काम आणि घराची जबाबदारी हे सगळं सांभाळतांना सर्वसामान्य नोकरदार वर्गाला मोठी तारेवरची कसरत करावी लागतेय. त्यामुळे एसी केबिनमध्ये बसून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या अधिकारी वर्गाने सर्वसामान्यांच्या समस्येकडे लवकरात लवकर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा सर्वसामान्यांच्या संतापाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या : 

कौतुकास्पद...! ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असणाऱ्या आदिवासी मुलांना 'त्यांनी' दिले शिक्षणाचे धडे

काही निर्बंधांसह प्रार्थनास्थळे खुली करण्याचा विचार करावा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी

व्हिडीओ

Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
Iran Crisis: इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
Beed News: अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
Raj Thackeray BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकायचा आत्मविश्वास, सांगितलं कारण
ठाकरे बंधूंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकण्याचा कॉन्फिडन्स का? सांगितलं कारण
BJP Vs Shivsena BMC Election 2026: मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा, शिवसैनिक संतापले
मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा, शिवसैनिक संतापले
Embed widget