एक्स्प्लोर

Mumbai University: सिनेट निवडणुकीसाठी ठाकरे गट पुन्हा आक्रमक! आशिष शेलारांच्या तक्रारीमध्ये तथ्य नाही; ठाकरे गटाचा दावा

Mumbai University: सिनेट निवडणुकांसंदर्भात आशिष शेलारांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. सिनेट सदस्यांनी याबाबत आज विद्यापीठातील कुलगुरुंची भेट घेऊन पत्र सोपावलं आहे.

मुंबई: मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेली सिनेट निवडणूक (Senate Election) पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित केली आहे. सिनेट निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार यादीमधील मतदारांच्या नावांमध्ये तफावत असल्याची तक्रार भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली होती. यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सिनेट निवडणुकांसंदर्भात आशिष शेलारांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

ठाकरे गटाकडून तक्रारीवर स्पष्टीकरण

भाजपकडून मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) सिनेट निवडणुकीसंदर्भात तक्रार करण्यात आली. मतदार यादीत एकाच मतदाराची नावं दोन ते तीन वेळेस आल्याची तक्रार आशिष शेलार यांनी केली. मात्र अंतिम मतदार यादीमध्ये उमेदवारांची कुठल्याही प्रकारे दोनदा किंवा तीनदा नावं आलेली नाहीत, प्रत्यक्षात एकाच नावाचे दोन मतदार हे वेगवेगळे मतदार आहेत, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

सिनेट निवडणुका लावण्याची ठाकरे गटाची मागणी

मतदार यादीत मतदारांची दोन-तीन वेळा नावं आल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलारांनी केली, तसं पत्र त्यांनी राज्य सरकारला दिलं होतं. त्यानंतर अंतिम आदेश येईपर्यंत या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या. मात्र मतदार यादीची 3 वेळा पडताळणी झाली असल्याचं ठाकरे गटाने स्पष्ट केलं आहे. युवासेना पदाधिकारी आणि सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठात कुलगुरुंची भेट घेऊन याबाबतचं पत्र देखील त्यांच्याकडे सोपावलं आहे. त्यामुळे आता कारणं शोधणं सोडा आणि निवडणुका लावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

असा होता निवडणुकीचा कार्यक्रम

सिनेटची निवडणूक 10 सप्टेंबर रोजी होणार होती. सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. तर उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया 21 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही 25 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली. तर 28 ऑगस्ट रोजी उमेदवारांची यादी जाहीर होणार होती. 10 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिनेट निवडणुकीसाठी मतदान आणि 13 सप्टेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार होता. 

आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्याने राजकीय पक्षांसोबतच विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत, तर  विरोधक देखील  आक्रमक झाले आहेत. सिनेट निवडणूक स्थगित झाल्यावरून आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) सडकून टीका केली. स्थानिक आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला देखील घाबरले, असा टोला आदित्य ठाकरे  यांनी लगावला आहे.

'सिनेट तुमचं सरकार पाडणार नाही, आम्हीच तुमचं सरकार पाडणार'

दोन पक्ष फोडले, दोन परिवार फोडले आणि आता महाशक्ती सोबत असूनही निवडणुकीला घाबरतात का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना केला. लोकसभेला देखील असंच करण्याची शक्यता आहे, लोकसभेला देखील निवडणुका जाहीर करतील आणि मग स्थगित करतील, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. सिनेट तुमचं सरकार पाडणार नाही, तर आम्हीच तुमचं सरकार पाडणार आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा:

Mumbai University : पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीवर स्थगिती का? मुंबईने विद्यापीठाने स्पष्ट सांगितलं...

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Shubman Gill : शुभमन गिलचं दोन मॅचवरुन परिक्षण करणार असाल तर अवघड होईल, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराची रोखठोक भूमिका
एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसल्यास बदलाची मागणी करणार असाल तर अवघड होईल, गिलच्या समर्थनार्थ नेहराची बॅटिंग
Embed widget