एक्स्प्लोर

... तर पुढच्या शंभर वर्षांत 40 टक्के मुंबई पाण्याखाली बुडालेली असेल!

मुंबई : मुंबईतील 26 जुलैच्या महाप्रलयाच्या वेदनादायी आठवणींची सल मनात ठेवणाऱ्या मुंबईच्या उंबरठ्यावर आणखी एक मोठं संकट येऊन उभं राहतंय. हे संकट सरळसोट मुंबईवर आक्रमण करणार नाही, तर कसलाही आवाज न करता, कुठलीही कल्पना न देता मुंबापुरीला आपल्या बाहूपाशात ओढणारं आहे. त्यामुळे वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर पुढच्या शंभर वर्षांत 40 टक्के मुंबई पाण्याखाली बुडालेली असेल. मुंबईतील वातावरण बदलावर झालेल्या एका रिसर्चमध्ये ही महाभयंकर भीती वर्तवली गेली आहे. मुंबईच्याच मानगुटीवर बसलेलं हे संकट नाही तर गेली काही वर्ष सातत्याने जगात समुद्रांच्या पातळीत वाढ होत आहे. जर समुद्राच्या पाण्याची पातळी अशीच वाढत राहीली तर सुमारे 40 टक्के मुंबई पुढील 100 वर्षात पाण्याखाली जाण्याची भीती वर्तवली गेली आहे. मुंबईला नेमका धोका काय? भुवनेश्वरमध्ये इंडियन मेट्रोलॉजिकल सोसायटीतर्फे ट्रॉपमेट हे राष्ट्रीय चर्चासत्र झालं. या चर्चासत्रात एका शोधनिबंधावर चर्चा झाली. त्यात या धोक्याची जाणीव करुन देण्यात आली आहे. हवामान बदलाचे मुंबईवर होणारे परिणाम या विषयासंदर्भातला हा शोधनिबंध होता. मुंबईच्या 458.53 चौरस किलोमीटरपैकी 190 चौरस किलोमीटर क्षेत्राला शंभर वर्षांत जलसमाधी मिळू शकते, अशी भीती या शोधनिबंधात व्यक्त करण्यात आली आहे. समुद्र दरवर्षी तीन मिलीमीटर मुंबईच्या किनारपट्टीकडे सरकतोय, असं निरीक्षणही त्यात नोंदवलंय. समुद्राची पातळी वाढण्याची प्रक्रिया जागतिक आणि स्थानिक पातळीवरच्या कारणांमुळे होत आहे. समुद्रजलाची खोली, पातळी आणि तापमान, क्षारता, घनता बदलल्यामुळे प्रवाळ, जलजशैव आणि शेलफिश अस्तंगत होण्याचा धोकाही वाढेल. भविष्यातल्या समुद्रपातळीच्या वाढीच्या संदर्भात विकासकामे, वस्त्या यांचं फेरनियोजन करणं आता आवश्‍यक आहे. यासाठी माणसाने समुद्राच्या म्हणजेच किनारी भागातल्या पर्यावरणात चालवलेली ढवळाढवळ कमी करणं आणि हवेचं प्रदूषण कमी करणं हा दुसरा उपाय आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे शास्त्रज्ञ आर. मनी मुरली यांनी रियास एमजे, रेशमा केएन आणि संतोष कुमार यांच्या सहकार्याने हा शोधनिबंध तयार केला आहे. यातील निष्कर्ष खूप महत्त्वाचे आणि गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे वैज्ञानिक मंडळी त्यातील निष्कर्षांचा आढावा घेत आहेत. निसर्गाचा गळा घोटत केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, मानवी सुविधांसाठी पर्यावरणाला नख लावण्याच्या धोरणांचा पुनर्विचार करायची वेळ येऊन ठेपली आहे. कारण मुंबईच्या अंगणात पसरलेल्या सागराचा प्राण तळमळला तर चोरपावलांनी मुंबईला तो कवेत घेण्याचा धोका नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील पुलाला भेगा, गॅप वाढत चालल्यामुळं वाहतूक बंद, पर्यायी व्यवस्था काय? 
रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील पुलाला भेगा, गॅप वाढत चालल्यामुळं वाहतूक बंद, पर्यायी व्यवस्था काय? 
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Embed widget