एक्स्प्लोर

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातही कोयताच, शिक्षणाचं काय?

राज्यात आजही लाखो मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. एबीपी माझा तुम्हाला असंच एक उदाहरण दाखवणार आहे.

पुणे : एकही मुल शाळाबाह्य राहू नये म्हणून 2009 मध्ये बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा पारित केला. तो 2010 साली काश्मीर वगळता सर्व देशाला लागू करण्यात आला. या कायद्यानुसार, स्थलांतरित, कधीच शाळेत न जाणाऱ्या प्रत्येक मुलाला शाळेत प्रवेश देणं सक्तीचं आणि मोफत शिक्षण देणं अनिवार्य आहे. मात्र राज्यात आजही लाखो मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. एबीपी माझा तुम्हाला असंच एक उदाहरण दाखवणार आहे. मराठवाड्यातील स्थलांतरित मुलांचं काय? ऊसतोड कामगारांची मुलं शिक्षणापासून वंचित असल्याचं राज्यभर दिसून येतं. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील मिळून 12 ते 14 लाख ऊसतोड मजूर महाराष्ट्रासह इतर राज्यात ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होत असतात. या कुटुंबासोबत त्यांची मुलंही मोठ्याप्रमाणावर स्थलांतरित होतात. मराठवाड्यात मूळ शाळेत या मुलांना शिक्षण मिळत असतं, मात्र ऑक्टोबर ते एप्रिल या सहा महिन्यांच्या साखर हंगामात ही मुलं आई वडिलांबरोबर गेली ती शाळाबाह्य होतात. या मुलांना शाळेत आणण्याची किंवा शिक्षण देण्याची कोणतीही ठोस योजना सध्या नाही. गाव सोडल्यानंतर सहा महिने शिक्षणाचा गंधही नाही पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात चार साखर कारखाने आहेत. या कारखान्याच्या ऊसाच्या तोडणीसाठी हजारो मजूर आहेत. पण त्यांच्या बरोबर आलेली मुलंही शिक्षणापासून वंचित आहेत. या मुलांना शिकवण्याची त्यांच्या आई-वडिलांचीही इच्छा आहे. मात्र परिस्थितीमुळे नाईलाजाने मुलांच्या हातातही कोयता द्यावा लागत आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातही कोयताच, शिक्षणाचं काय? ऊसतोड कामगारांची मुलंही त्यांच्याबरोबर ऊस तोडताना शेतात असतात. तर कधी ते त्यांच्या पालावर घराबाहेर काम करताना, कोणी खेळताना दिसून येतं. या मुलांनाही शिकायचंय, मोठ व्हायचंय. पण एकदा गाव सोडून ऊस तोडण्यासाठी स्थलांतर झाल्यावर पुन्हा शिक्षण नावाचा प्रकारही अनुभवायला मिळत नाही. जवळच्या शाळेत मुलांना शिकवण्याचं आवाहन इंदापूर तालुक्यात एकूण 382 शाळा आहेत, ऊसतोड कामगार येतात, त्या त्या ठिकाणापासून काही अंतरावर शाळा आहेत. त्यामुळे या शाळेत या मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कामगारांनी आपापली मुलं शाळेत दाखल करावी, असं आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलंय. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातही कोयताच, शिक्षणाचं काय? या मुलांसाठी साखर शाळा आणि त्यानंतर निवासी हंगामी वसतीगृह अशा अनेक योजना सरकारने राबवल्या. मात्र त्या कधीच यशस्वी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळेच आजही लाखो मुलं सरकारी अनास्थेमुळे शिक्षणापासून दूर आहेत, ज्यांना आई-वडिलांसोबतच ऊस तोडावा लागत आहे. ऊसतोड कामगारांची मुलं पुन्हा ऊसच तोडणार का? ऊसतोड कामगारांची मुलं ऊस तोडताना दिसतील, लहान भावंडांना सांभाळताना दिसतील, जनावरं सांभाळताना दिसतील, कारखाना परिसरातील हॉटेलवर काम करताना दिसतील... त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचं काय? नुकताच बाल दिन साजरा झाला. या बालदिनाच्या पाश्वर्भूमीवर या लहान मुलांच्या शिक्षणाचं काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातही कोयताच, शिक्षणाचं काय? एकीकडे राज्य सरकारचा शिक्षण विभाग आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारत आहे. शाळा डिजिटल करत आहे. मात्र दुसरीकडे गरिबांची, वंचित घटकांची मुलं शाळेतच येत नाहीत, त्यांना शिक्षणाचा गंधही लागत नाही. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या हातात पिढ्यान् पिढ्या कोयताच येत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon  Crime : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं
Jalgaon  Crime : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं
सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची घसरण, खरेदीदारांना मोठा दिलासा
सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची घसरण, खरेदीदारांना मोठा दिलासा
भोंदूबाबा अशोक खरातचा VSR कंपनीशी संबंध आहे का? अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या पुजेचं कनेक्शन काय? मिटकरींचे सवाल
भोंदूबाबा अशोक खरातचा VSR कंपनीशी संबंध आहे का? अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या पुजेचं कनेक्शन काय? मिटकरींचे सवाल
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज, आज 11 लाख कोटी, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज, आज 11 लाख कोटी, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला

व्हिडीओ

Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America vs Iran : अमेरिका इराणमध्ये सैन्य पाठवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांनी चित्र स्पष्ट केलं, म्हणाले...
America vs Iran : अमेरिका इराणमध्ये सैन्य पाठवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांनी चित्र स्पष्ट केलं, म्हणाले...
Raj Thackeray : महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, शेतकरी आत्महत्या ते शहरांचं बकालपण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, तीनवेळा कर्जमाफी तरी दररोज शेतकरी आत्महत्या, शहरांचं बकालपण, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Global Energy Crisis : इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
FASTag Annual Pass : 1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
IPL सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
Atanu Chakraborty Resigns: एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
Dhananjay Munde : नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
Share Market : शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला, 12 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, तब्बल 12 लाख कोटी बुडाले
Embed widget