एक्स्प्लोर

एका राजकारण्याचा दुसऱ्या राजकारण्यावर विश्वास किती? कुठे काही घोळ होऊ नये म्हणून दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचे नाव

मृत्यूपत्रात कुठं काही घोळ होऊ नये म्हणून आपण गडकरींचं (Nitin Gadkari) नाव टाकल्याचं माजी खासदार दत्ता मेघे (Datta Meghe) म्हणाले.

वर्धा : राजकारण म्हटलं की टोकाचा विरोध असंच काहीसं चित्र डोळ्यांपुढं येत. पण राजकरणात अनेक व्यक्ती नात्या-गोत्याच्या पलीकडच्या ठरतात, त्यांच्यावर प्रचंड  विश्वास ठेवला जातो. हीच बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी खासदार दत्ता मेघे यांच्या बाबतीत दिसतेय. मृत्यूपत्रात कुठं काही घोळ होवू नये याकरिता दत्ता मेघे यांच्या मृत्यूपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव लिहिलं असल्याचं गुपित खुद्द माजी खासदार दत्ता मेघे यांनीच जाहीररित्या उघड केलं. वर्ध्याच्या नगरपालिकेत विकासकामाचं ई-भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी ही गोष्ट उघड केली. 

माजी खासदार दत्ता मेघे म्हणाले की, "सर्व पक्षांशी मी चांगले संबंध प्रस्थापित केलं. नितीनजी आमच्या फॅमिलीचे महत्वाचे नेते आहेत. मी माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये म्हणून त्यांचं नाव दिलं आहे." एका राजकारण्याने आपली हयात एका पक्षात घालवली आणि मृत्यूपत्रात नाव मात्र स्वत:च्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं किंवा पूर्वाश्रमीच्या पक्षातील कोणत्याही नेत्याचं घातलं नाही, पण नवीन पक्षात प्रवेश केलेल्या नेत्याचे नाव घातलं ही आश्चर्याची गोष्ट आहे.  

दत्ता मेघेंच्या या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचे नाव नेमकं का आणि कशासाठी टाकण्यात आलं आहे हे मात्र समजू शकलं नाही. गडकरींचे नाव मेघेनी वारसा म्हणून टाकलं की संपत्तीचे ट्रस्टी म्हणून टाकलं हे कळायला मार्ग नाही. 

आता उठता-बसता एकमेकांवर टीका करणारे, सत्ता येईल त्या पक्षात जाहीरपणे प्रवेश करणाऱ्या राजकारणांच्या एकमेकांवर आजिबात विश्वास नसतो. राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं. पण दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्राच्या वक्तव्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. एका राजकारणी व्यक्तीचा दुसऱ्या राजकारणी व्यक्तीवर इतका विश्वास असतो का असा सवालही अनेकांना पडला आहे. मृत्यूपत्रात कुठं काही घोळ होऊ नये म्हणून आपण गडकरींचं नाव त्यामध्ये टाकत असल्याचं मेघे म्हणाले. म्हणजे मेघेंना स्वत:च्या कुटुंबापेक्षा नितीन गडकरी यांच्यावर जास्त विश्वास आहे का असा सवालही अनेकजण विचारत आहेत. 

दत्ता मेघे हे काँग्रेसच्या तिकिटावर चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर ते काँग्रेसच्याच तिकिटावर राज्यसभेवर निवडून गेले आहेत. नंतरच्या काळात राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

काय असतं मृत्यूपत्र? 
मृत्यूपत्र हे एक कायदेशीर दस्तऐवज असते ज्यात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिची मालमत्ता आणि आर्थिक संपत्ती ज्या व्यक्तीला किंवा वारसाला मिळणार असते त्याचं नाव त्यामध्ये नमूद असतं. जी व्यक्ती हे दस्तऐवज कार्यान्वित करते, ती जीवंत असेपर्यन्त हे दस्तऐवज मागे घेऊ शकते, बदलू शकते किंवा त्याच्या जागी दुसरं एखादं मृत्यूपत्र निर्माण करू शकते.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget