एक्स्प्लोर

अंगावर गोमूत्र शिंपडताना शांत उभे राहा, हालचाल करु नका; काँग्रेस सोडल्यानंतर वडेट्टीवारांच्या बाबा सिद्दीकींना खोचक शुभेच्छा

Baba siddique quits congress: बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने मुंबईत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, विजय वडेट्टीवार यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर खोचक टीका

मुंबई: बाबा सिद्दीकी पक्षातून बाहेर पडल्याने काँग्रेसला मुंबईत कोणताही धक्का बसणार नाही. ते आता अजित पवार गटात प्रवेश करत असल्याने त्यांना भाजपचा धार्मिक अजेंडा राबवण्याचे काम करावे लागेल. पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, आता नव्या पक्षात अंगावर गोमूत्र शिंपडताना त्यांनी शांतपणे उभे राहावे, हालचाल करु नये, अशा खोचक शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सिद्दीकी यांना लक्ष्य केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करत काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी हे अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आता ते लवकरच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

राज्यातील काही नेत्यांना ईडीचे समन्स आले आहे. हे नेते चौकशीच्या फेऱ्यात आहे. हे सर्व नेते त्यांना संरक्षण मिळेल, त्या पक्षात जात आहेत. गेल्या महिनाभरापासून बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाणार, अशी चर्चा होती. अजित पवार गटात गेल्यामुळे बाबा सिद्दीकी यांना काहीतरी घबाड मिळत असेल आणि त्यांच्या जुन्या पापांमधून मुक्ती मिळत असेल. आता त्यांनी अंगावर गोमूत्र शिंपडताना हालचाल न करता शांतपणे उभे राहण्याची सवय करुन घेतली पाहिजे. बाकी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. यावेळी वडेट्टीवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मुंबईत कोणतेही नुकसान होणार नसल्याचा दावा केला. बाबा सिद्दीकी आता अजित पवार यांच्यासोबत जाणार आहेत. अजित पवार यांना राष्ट्रवादी  काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. मात्र, ते आगामी काळात भाजपच्या इशाऱ्यावरच काम करतील, ही बाब महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. अजित पवार हे भाजपचा अजेंडा राबवणार आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाणाऱ्या बाबा सिद्दीकी यांनाही भाजपचा धर्मांध आणि जातीयवादी अजेंडा राबवण्याचे काम करावे लागणार आहे. जर एखादा माणूस धर्मांध शक्तींसोबत हातमिळवणी करत असेल तर धर्मनिरपेक्ष विचारांची मंडळी विचलित होणार नाहीत. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असे वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले.

 

मिलिंद देवरा यांच्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने आगामी विधासभा निवडणूक आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय, काँग्रेस नेते झिशान सिद्दीकीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. याविषयी विचारणा केली असता वडेट्टीवार यांनी फार बोलण्यास नकार दिला. आम्ही झिशान सिद्दीकी यांना समजवण्याचा प्रयत्न करु. मला त्यांच्याशी बोलावं लागेल. त्यांच्याविषयी आताच काही बोलता येणार नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

आणखी वाचा

मोठी बातमी! मुंबई काँग्रेसला धक्का, बाबा सिद्दीकींनी पक्षाला केला रामराम!

शाहरुख असो की सलमान,  इफ्तार पार्टीला येणारच, कोण आहेत बाबा सिद्दीकी, ज्यांचं निमंत्रण भले भले टाळू शकत नाहीत?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget