एक्स्प्लोर

वेळअमावस्या! वनभोजनाचा आनंद लुटण्यासाठी आज लातूरकर शेतात, गावं पडली ओस

सर्व लातूरकर आज शेतात गेल्याने गावे ओस पडलेली पाहायला मिळत आहे. निमित्त आहे वेळअमावस्येचं.

लातूर : भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषीशी निगडित अनेक सणवार असतात असाच एक सण वेळअमावस्या. शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. गावातील थोर आज शेतात वनभोजनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. लातूर शहरात सध्या अघोषित संचारबंदी लागल्या सारखी स्थिती आहे.

बैलपोळा आणि वेळअमावस्या हे सण शेतक­ऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे समजले जातात. बैल पोळ्याच्यादिवशी ज्याच्या जिवावर शेती चालते त्या बैलांना खाऊपिऊ घालुन पुजा केली जाते तर वेळअमावस्यादिवशी ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो त्या काळ्या आईची पुजा केली जाते. लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत ही वेळअमावस्या दिवशीची पुजा महत्त्वाची मानली जाते. या दिवशी शेतात कडब्याचे कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पुजा मांडली जाते. शेतात खरीप व रब्बी या दोन हंगामात मिळून वेळअमावस्या दिवशी लक्ष्मीची पुजा केली जाते. मातीची लक्ष्मीची मूर्ती तयार केली जाते. कडब्याच्या कोपात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात, यथासांग पुजा केली जाते, शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. रब्बी हंगामातील गहु, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदि पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे अशी प्रार्थना केली जाते.

वेळअमावस्या! वनभोजनाचा आनंद लुटण्यासाठी आज लातूरकर शेतात, गावं पडली ओस

वनभोजनाचा आनंद.. पेरणीनंतरची सातवी अमावस्या म्हणजे वेळअमावस्या. जुनमध्ये पेरणी होते व सातवी अमावस्या डिसेबंर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवाड्यात येते. खरीपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते, तुरही ऐन बहरात असते. रब्बी हंगामातील पेरणी होऊन सपुंर्ण शेत हिरवेगार झालेले असते. ऊन्हाची तीव्रता नसते, ऊसाची गाळप सुरू होत असल्यामुळे ऊस खाण्याची हौस भागवता येते. गुळरस हाही आनंद उपभोगता येतो. घरोघरी गौरीपुजनाचे महत्त्व जितके असते तितकेच महत्त्व शेतात या दिवशीच्या लक्ष्मीपुजनाला असते. रब्बी हंगामातील पेरणी केलेल्या रानात उंडे व अंबीलचा काला तसेच पाण्याचा चर शिंपडला जातो. तोंडातून हर हर महादेव, हरभला असे म्हणत तो सर्व शेती फिरतो. ज्वारी व बाजरीचे उंडे, सर्व भाज्यांपासून तयार केली जाणारी भाजी व अंबिल या पदार्थांना वेळ अमावस्येच्या दिवशी जेवणात पहिल्या दर्जाचा मान असतो. या व्यतिरिक्त जो तो आपल्या कुवतीप्रमाणे अन्य पदार्थ तयार करतो. नुकताच आलेला वाटाणा, तुरीचे दाणे घालून केलेली भाजी, (भज्जी), तीळ गुळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी व बाजरीची भाकरी, धपाटे, भात व ताकास ज्वारीचे पीठ लावून केलेली आंबील, अशा पदार्थाचा आस्वाद घेण्यात येतो. आंबील, गव्हाची खीर, भज्जी, भाकरी, कुटलेली शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेसा. नंतर बोर,पेरू हरबरे, असे असंख्य पदार्थ असतात. जेवण्याच्या आधी ह्या रानमेवानेच पोट भरून जाते. यासाठी घरातील महिला दोन दिवसांपासून तयारी करतात.

वेळअमावस्या! वनभोजनाचा आनंद लुटण्यासाठी आज लातूरकर शेतात, गावं पडली ओस

आयुर्वेदशास्त्रनुसार हिवाळा महत्वाचा.. हिवाळा हा मनाला उत्साह आणि नवचेतना देणारा ऋतु आहे. आयुर्वेदशास्त्रनुसार या ऋतुनुसार घेतला जाणारा आहार शरीराला मानवणारा असतो. शिवाय तब्येत कमविण्यासाठी हिवाळा अत्यंत योग्य काळ आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा ऋतू लाभदायी ठरावा. यासाठी या काळात येणारा भाजीपाला फळे भरपूर खाऊन निरोगी राहण्याचा सल्ला आहार तज्ञ देतात. हिवाळ्यामध्ये विविध भाज्या तसेच फळांचा आहार घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे या ऋतूत प्रचंड भूक लागते तसेच पचन शक्तही चांगली कार्यान्वीत होते. हिवाळ्यात बाजारपेठेमध्ये आलेल्या फळभाज्या खाणे योग्य असते. या काळात त्वचा कोरडी व रूक्ष पडते. कारण शरीराला स्निग्ध पदार्थाची आवश्यकता असते, त्यामुळे या ऋतूत दुध, तुप, दही, लोणी ताक यासारख्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करावे. हिवाळ्यामध्ये शरीराला आतून उब मिळावी व थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी बाजरीची भाकरी तसेच गरम पदार्थांची घरोघरी मेजवानी असते. यामुळे दूरदुरून अनेकजण यावेळच्या लातुरात येतात.

वेळअमावस्या साजरी करण्याची प्रथा कधी सुरू झाली असावी याची निश्चित नोंद उपलब्ध नाही. वेळ अमावस्येच्या काळात लातूरसारख्या शहरी भागात तर कफ्र्यु सारखे वातावरण रस्त्यावर दिसते. आपल्यापेक्षा कोणीतरी अज्ञात शक्ती मोठी आहे. त्यासमोर वर्षातुन एकदा तरी नतमस्तक व्हावे याची शिकवणुक देणारी संस्कृती जोपासायची परंपरा या निमित्ताने पहायला मिळते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Mira Bhayandar News :आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
Dhananjay Munde: महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं, राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं, राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Shinde Samiti: शिंदे समितीचा धडाका; राज्यात आतापर्यंत 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या, 'इतक्या' मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र प्रदान, मंत्रिमंडळ बैठकीत माहिती समोर
शिंदे समितीचा धडाका; राज्यात आतापर्यंत 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या, 'इतक्या' मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र प्रदान, मंत्रिमंडळ बैठकीत माहिती समोर

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda On Indusrty: 'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Pune Accident Shiv Jayanti 2026: शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Embed widget