एक्स्प्लोर
Advertisement
शेतकऱ्यांवर पॅलेट गनचा वापर हा आंदोलन दडपण्याचा प्रकार : राधाकृष्ण विखे पाटील
कल्याण : शेतकऱ्यांवर झालेला पॅलेट गनचा वापर हा आंदोलन दडपण्याचा प्रकार आहे. तसंच सरकारने नेवाळी प्रकरणात अक्षम्य हलगर्जीपणा केला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
कल्याणजवळील नेवाळीमध्ये काल नौदलाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनातील जखमींची विखे पाटलांनी भेट घेचली आहे. शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार आणि संपूर्ण आंदोलनाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, अशी मागणीही राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.
नेवाळीचा प्रश्न चर्चेतून सुटला असता, मात्र संवादच झाला नाही, त्यामुळे गोळीबार करण्याची वेळ आली. येत्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचंही विखे पाटील म्हणाले.
काय आहे प्रकरण?
नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित केल्याच्या विरोधात नाका परिसरकार शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन सुरु आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवर डावलपाडा गावाजवळ पोलिसांच्या गाड्या पेटवल्या.
आपल्याच मालकीच्या शेतजमिनींवर पेरणी करण्यास मज्जाव केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कल्याण-मलंगगड रस्ता रोखून धरला. शिवाय टायर जाळून मलंगगडाकडे जाणारा मुख्य रस्ता बंद केला. इतकंच नाही तर पोलिसांवर दगडफेकही केली.
ब्रिटीश काळात दुसऱ्या महायुद्धात लष्कराने नेवाळे गावाजवळ धावपट्टीसाठी जागा घेतली होती. मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात आली होती. परंतु यावर्षी पुन्हा नौदलाने या जागेवर दावा करत तिथे कम्पाऊंड टाकायला सुरुवात केली आहे. याला या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे
जवळपास या भागातील 7 ते 8 गावांची जमिनी ताब्यात घेतली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion