एक्स्प्लोर

Navneet Rana : 'जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं', नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. यावरून आता नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Navneet Rana Taunted Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (Shiv Sena) निवडणूक चिन्हावरून सुरू असलेला वाद शुक्रवारी संपुष्टात आला. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिले आहे. यावरून आता अमरावतीचे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना टोला लगावला आहे. नवनीत राणा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्या म्हणाल्या आहेत की, 'जो रामाचा नाही, जो हनुमानाचा नाही, तो काही कामाचा नाही आणि धनुष्यबाणही त्याचा नाही... त्याचाच परिणाम आज जाणवला आणि उद्धव ठाकरे यांना भोलेनाथांनी खूप चांगला प्रसाद दिला आहे.'

1966 नंतर पहिल्यांदा ठाकरे कुटुंबीयांनी पक्षावरील नियंत्रण गमावले 

बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेना (Shiv Sena) पक्षाची स्थापना केली होती. पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबीयांचा शिवसेना पक्षावरील ताबा सुटण्याची वेळ आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. ठाकरे गटाचे काही नेते याला सूडाचं राजकारण म्हणत आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा विरोधी पक्षांकडूनही निषेध करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलं आहे की, नवीन चिन्ह घ्यायचं, लोक नवीन चिन्ह स्वीकारतात.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Navneet Kaur Rana (@navneetravirana)

हा निर्णय म्हणजे राजकीय हिंसाचार : संजय राऊत 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना मानण्याच्या निवडणूक आयोगाच्या (EC) निर्णयावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी टीका केली आहे. राऊत यांनी हा निर्णय पक्षाला नष्ट करण्याच्या उद्देशाने राजकीय हिंसाचाराचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. हे सुडाचं राजकारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचा हा निर्णय कायदा, संविधान आणि जनतेच्या इच्छेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. सरकारने नव्याने निवडणुका घ्याव्यात आणि शिवसेना कुणाची आहे, असा जनादेश जनतेकडून घ्यावा, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget