एक्स्प्लोर

तृतीयपंथी नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणार : राजकुमार बडोले

राज्यात तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली असून त्यामाध्यमातून तृतीयपंथी नागरिकांचे कल्याण करून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिली.

राज्यात तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना मुंबई : राज्यात तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली असून त्यामाध्यमातून तृतीयपंथी नागरिकांचे कल्याण करून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी आज मुंबईत दिली. यासंबंधी बडोले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी आपल्या दालनात पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. "तृतीयपंथीय, ट्रान्सजेंडर हा समाजातील दुर्लक्षित घटक असून त्यांच्याप्रती असलेल्या गैरसमजातून त्यांना समाजाकडून भेदभावाची वागणूक दिली जाते. त्यामुळे उद्विग्न अवस्थेत जीवन कंठणारा हा घटक कायम विकासाच्या प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिलेला आहे. त्यामुळे समाजिक घटकांचे पालकत्व स्विकारलेल्या शासनाने तृतीयपंथी घटकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करणाऱ्या तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. या कल्याण मंडळामुळे येत्या काळात तृतीयपंथी नागरिकांना सन्मानाने जगण्याचा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे," असा विश्वास बडोले यांनी यावेळी व्यक्त केला. "तृतीयपंथीय कल्याण मंडळाच्यावतीने तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र वितरीत केली जातील. त्यांना शिक्षणात सहाय्य होईल, अशी मॅट्रीकोत्तर शिष्यवृती देण्यात येईल, पात्र असूनही ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा तृतीयपंथी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल. या योजनेंतर्गत वार्षिक 48 हजार ते 60 हजार रूपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल. सुशिक्षित तृतीयपंथीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून कौशल्यविकासाच्या योजना राबवल्या जातील. अशा भक्कम उपाययोजना राबवल्यामुळे तृतीयपंथी घटकाला जगण्यासाठी समाजापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही," असेही बडोले यावेळी म्हणाले. बडोले म्हणाले की, "समाजात सन्मानाने वास्तव्य करता यावे यासाठी तृतीयपंथीय घटकांकरीता आवास योजना राबवण्यात येईल. आरोग्यविषयक जागृतीसाठी आणि उपचारांसाठी कॅम्प राबवण्यात येतील त्यामुळे स्वतःच्या आरोग्यविषयक असलेल्या उदासीनतेपासून तृतीयपंथीयांना परावृत्त करता येईल, याशिवाय व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी व्यसनमुक्तीचे कार्यक्रमही राबवण्यात येतील. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली स्थापित या कल्याण मंडळाचे सह अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री असून विभागाचे प्रधान सचिव उपाध्यक्ष आहेत. तृतीयपंथीय समुदायातील विख्यात एक व्यक्ती सहउपाध्यक्ष तर विधान परिषद, विधानसभेच्या प्रत्येकी एक सदस्यासह विधी, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकी एक व्यक्ती सदस्य असणार आहे. याशिवाय विविध 14 विभागांचे सह सचिव/ उपसचिव दर्जाचा एक प्रतिनिधी सदस्य, तर बार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, एड्स कंट्रोल सोसायटीचा प्रत्येकी एक सदस्य, आयुक्त समाजकल्याण हे मंडळाचे सदस्य सचिव व समन्वयक असलेली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे, असे बडोले यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जून 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जून 2026 | बुधवार
Abhijeet Dipke CJP : मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन
मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन
Thane News : वाढदिवसाचा थीम केक बेतला जीवावर! 3 वर्षीय चिमुकल्याच्या पोटात गेल्या धातूच्या तारा, अन् पुढे तब्बल 48 तासानंतर....; ठाण्यातील खळबळजनक घटना
वाढदिवसाचा थीम केक बेतला जीवावर! 3 वर्षीय चिमुकल्याच्या पोटात गेल्या धातूच्या तारा, अन् पुढे तब्बल 48 तासानंतर....; ठाण्यातील खळबळजनक घटना
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं

व्हिडीओ

Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget