एक्स्प्लोर

'सामाजिक, शैक्षणिकदृष्या मागास' धर्तीवर आरक्षण देणं चुकीचं : श्रीहरी अणे

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या डॉ. उदय ढोपले या याचिकाकर्त्यांच्यावतीनं अणेंचा युक्तिवाद सुरु आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर शुक्रवारीही सुनावणी सुरू राहील.

मुंबई : सामाजिक आणि शैक्षणिकदृष्या मागास या धर्तीवर एखाद्या जातीला किंवा समाजाला आरक्षण देणं चुकीचं आहे. कारण ही जात नसून ती वर्गवारी आहे, यात सर्व जातीची लोकं समावेशित होतात. उद्या ब्राम्हण समाजही या निकषावर आरक्षणासाठी उभा राहील. मुळात राज्य सरकार हे नागरिकांना पुरेशा शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलंय, असा युक्तिवाद राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी हायकोर्टात केला. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या डॉ. उदय ढोपले या याचिकाकर्त्यांच्यावतीनं अणेंचा युक्तिवाद सुरु आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर शुक्रवारीही सुनावणी सुरू राहील. सरकारला ओबीसींना दुखवायचं नव्हतं म्हणून स्वतंत्र वर्ग निर्माण केला "मराठ्यांची कितीही नापसंती असली तरी कायद्यानं आता त्यांनाही मागास वर्गात टाकलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे"  असं म्हणत मराठा जर मागास वर्गातील ओबीसी समाजाचाच भाग आहेत तर त्यांना स्वतंत्र वर्गाचा दर्जा देऊन आरक्षण देण्याची काय गरज होती? असा सवाल उपस्थित करत ओबीसी वर्गाचं आरक्षण वाढवून किंवा त्यातच मराठ्यांना समावून घेत सरकारला ओबीसींना दुखवायचं नव्हतं म्हणून स्वतंत्र वर्ग निर्माण केला गेला, असा युक्तिवाद अणेंनी हायकोर्टात केला. 'शिक्षण सम्राट' याच समाजातील लोकं त्याआधी सकाळच्या सत्रात आरक्षणाला विरोध करणाऱ्या अॅड. संजीत शुक्ला यांच्यावतीनं अॅड. अरविंद दातार यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. मराठा समाज हा कधीही आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल नव्हता. महाराष्ट्रात सुरूवातीपासूनच राजकीय पुढारी, साखर कारखानदार, उद्योजक, विविध शैक्षणिक महामंडळांतील 'शिक्षण सम्राट' हे याच समाजातील लोकं राहिली आहेत. त्याचबरोबर मागास वर्गातही 'मागास' आणि 'अतिमागास' अशी मुख्य वर्गवारी आहे. त्यामुळे इतर जातींना प्राधान्य देण्याऐवजी मराठ्यांना थेट १६ टक्के आरक्षण देणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्य सरकारच्या विशेषाधिकारालाच आव्हान आयोगाच्या अहवालाप्रमाणे जर एखादा समाज आर्थिक, सामाजिक अथवा शैक्षणिकदृष्या मागास असल्याचं स्पष्ट झालं असेल तर राज्य सरकार त्यांना आरक्षण देऊ शकतं का? असा सवाल गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयानं विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना विचारला. त्यावर जर संविधानाच्या अनुच्छेदातील 15(2) आणि 16(4) नुसार राज्य सरकारला  विशेष अधिकार आहेत असा राज्य सरकार दावा करत असेल तर ते चुकीचं आहे, असा दावा करत अॅड. दातार यांनी राज्य सरकारच्या विशेषाधिकारालाच आव्हान दिलं. कारण नव्यानं सुधारणा करण्यात आलेल्या संविधानाच्या अनुच्छेद 342(2) नुसार कोणताही नवा कायदा करताना केवळ राष्ट्रपतीच त्याबाबत अधिसूचना जारी करू शकतात. त्यांच्या संमतीशिवाय राज्य सरकारनं जारी केलेलं मराठा आरक्षण हे बेकायदेशीर आहे. तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राज्य मागास आयोगाकडे न जाता तो राष्ट्रीय मागास आयोगाकडे जाणं अपेक्षित होतं मात्र तसं झालेलं नाही. महाराष्ट्राचा आजवरचा इतिहास आणि भौगोलिक संचरचना लक्षात घेतली तर हे राज्य कधीच उपेक्षितांचा प्रदेश नव्हता. त्यामुळे मराठ्यांना अशा पद्धतीनं मागास ठरवून राज्य सरकार इतरांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणत जातीचं राजकारण खेळत असल्याचा आरोपही विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार
Gadchiroli Accident News: आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
Jalgaon Rain: पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget