एक्स्प्लोर

तीन दिवसात तीन तरुणांची आत्महत्या, हिंगोलीतील बोराळा गावावर शोककळा!

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोराळा गावात 9, 10 आणि 11 ऑक्टोबर या तीन दिवसात तीन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 25 ते 32 वयोगटातील हे तीनही तरुण होते. या तीन तरुणांच्या जाण्याने बोराळा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोराळा येथे तीन दिवसात तीन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. तिन्ही घटना वेगवेगळ्या कारणांनी घडल्या आहेत. यापैकी दोन घटनांची नोंद वसमत येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनांमुळे बोराळा गावावर शोककळा पसरली आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बँकेची कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून बोराळा येथील प्रभाकर जाधव (वय 32 वर्ष) यांनी राहत्या घरी 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.

तीन दिवसात तीन तरुणांची आत्महत्या, हिंगोलीतील बोराळा गावावर शोककळा!

तर दुसर्‍या घटनेत बोराळा येथील संतोष बालाजी खराटे (वय 22 वर्ष) याने 10 ऑक्‍टोबर रोजी दुपारी चार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. धमक्यांच्या त्रासाला कंटाळून संतोषने आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतोषच्या आईच्या फिर्यादीवरुन वसमत ग्रामीण पोलीस स्थानकात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दिवसात तीन तरुणांची आत्महत्या, हिंगोलीतील बोराळा गावावर शोककळा!

तर तिसरी घटना ही 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी उशिरा घडली आहे. या घटनेत राजू गंगातीरे यांनी गावाशेजारील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू यांचा मृतदेह वसमत येथील रुग्णालयात ठेवण्यात आला असून, त्यांचे शवविच्छेदनानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्या करणारे तीनही तरुण शेतकरी कुटुंबातील आहे.

तीन दिवसात तीन तरुणांची आत्महत्या, हिंगोलीतील बोराळा गावावर शोककळा!

घटनेची कारणे जरी वेगवेगळी असली तरी एकापाठोपाठ एकाच गावात तीन आत्महत्या होणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

महत्त्वाच्या बातम्या

लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
आषाढी एकादशीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार, द्वादशीपासून उघडीप, राज्यात नेमकं कसं असणार हवामान?
आषाढी एकादशीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार, द्वादशीपासून उघडीप, राज्यात नेमकं कसं असणार हवामान?

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget