एक्स्प्लोर

Raju Shetti : तर मग न्यायाधीशांना सुद्धा तीन टप्प्यात पगार द्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राजू शेट्टींचं खरमरीत पत्र

Raju Shetti : सदर याचिका एका सुनावणीमध्येच निकाली होणे अपेक्षित असतांना अद्यापही प्रकरण रेंगाळत का आहे याची मला माहीती मिळावी, अशी विचारणा सुद्धा राजू शेट्टी यांनी केली आहे.

Raju Shetti : ऊसाच्या एफआरपी मध्ये मोडतोड करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे का? संदर्भात रिट याचिका दाखल करूनही सुनावणीच होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पत्र पाठवून संताप व्यक्त केला आहे. सदर याचिका एका सुनावणीमध्येच निकाली होणे अपेक्षित असतांना अद्यापही प्रकरण रेंगाळत का आहे याची मला माहीती मिळावी, अशी विचारणा सुद्धा राजू शेट्टी यांनी केली आहे.

तर त्यांना देण्यात येणारा पगार तीन टप्यात द्यावा 

राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, ज्या न्यायाधीशांकजे यांच्याकडे मी याचिका दाखल केली आहे, त्यांना गेल्या दोन वर्षात याबाबत निर्णय घेण्यास का बरे वेळ मिळाला नसेल? खरंच जर या प्रकरणाबाबत संबधित न्यायाधीश यांना गांभीर्य नसेल तर त्यांना देण्यात येणारा पगार तीन टप्यात द्यावा जेणेकरून त्यांना त्या गोष्टींचे गांभीर्य लक्षात येईल असे मला वाटते. दिवसेंदिवस उस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या असून एकीकडे त्याला सरकारचे धोरण जबाबदार असताना आता न्याय व्यवस्थाही या धोरणाचा भाग बनू लागली आहे का? असा प्रश्न मला पडू लागला आहे. तरी तातडीने प्रकरण बोर्डावर घेत याचिका निकाली काढणेबाबत संबंधितांना आदेश देण्यात यावेत ही विनंती असल्याचेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 

काय म्हटलं आहे पत्रात? 

माझ्या वकीलांनी अनेक वेळा प्रकरण बोर्डावर घेण्यासाठी अर्ज केल्याचे मला कळविले आहे तरी देखील प्रकरण सुनावणी साठी का लागत नाही ?? न्याय देवता न्याय देणाऱ्यांसाठी का न्याय मागणाऱ्यांसाठी हा प्रश्न मला पडला आहे. केंद्र केलेल्या कायद्यांची राजरोसपणे पायमल्ली करत राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम राज्य सरकारकडून केले गेले आहे. एक रक्कमी एफ. आर. पी च्या कायद्यात बदल करण्याचे अधिकार हे केंद्र सरकारला आहेत, मात्र केंद्र सरकारने अधिकाराचा गैरवापर करून एफ. आर. पी मध्ये बदल करत तीन टप्यात देण्याचा निर्णय घेतला आहे.

तर ही न्याय व्यवस्था नेमकी कुणासाठी आहे

बेकायदेशीर रित्या केलेल्या या कायद्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात आला असून 16 महिने ऊस पिकवायचे त्यानंतर कारखान्याला गाळपास पाठवायचे व ऊस तुटल्यानंतर 14 दिवसात शेतक-यांच्या खात्यावर एफ, आर पी ची रक्कम जमा करण्याचा केंद्र सरकारने कायदा केलेला आहे. मात्र राज्य सरकार पुढील एक वर्षात म्हणजे 26व्या महिन्यात अंतिम ऊस बिल घ्यायचे अशा पध्दतीचा कायदा करून शेतक-यांची पिळवणूक केली जात आहे. याकरिता मी गेल्या दोन वर्षांपासून मुबंई उच्च न्यायालयात याबाबत न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र न्यायव्यवस्थेनेही शेतक-यांना बेदखल केले आहे. आज ऊस उत्पादक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत तरीसुध्दा शेतक-यांना न्याय मिळत नसेल तर ही न्याय व्यवस्था नेमकी कुणासाठी आहे हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडू लागला आहे.ॉ

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
Embed widget