एक्स्प्लोर

Raju Shetti : तर मग न्यायाधीशांना सुद्धा तीन टप्प्यात पगार द्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राजू शेट्टींचं खरमरीत पत्र

Raju Shetti : सदर याचिका एका सुनावणीमध्येच निकाली होणे अपेक्षित असतांना अद्यापही प्रकरण रेंगाळत का आहे याची मला माहीती मिळावी, अशी विचारणा सुद्धा राजू शेट्टी यांनी केली आहे.

Raju Shetti : ऊसाच्या एफआरपी मध्ये मोडतोड करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे का? संदर्भात रिट याचिका दाखल करूनही सुनावणीच होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पत्र पाठवून संताप व्यक्त केला आहे. सदर याचिका एका सुनावणीमध्येच निकाली होणे अपेक्षित असतांना अद्यापही प्रकरण रेंगाळत का आहे याची मला माहीती मिळावी, अशी विचारणा सुद्धा राजू शेट्टी यांनी केली आहे.

तर त्यांना देण्यात येणारा पगार तीन टप्यात द्यावा 

राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, ज्या न्यायाधीशांकजे यांच्याकडे मी याचिका दाखल केली आहे, त्यांना गेल्या दोन वर्षात याबाबत निर्णय घेण्यास का बरे वेळ मिळाला नसेल? खरंच जर या प्रकरणाबाबत संबधित न्यायाधीश यांना गांभीर्य नसेल तर त्यांना देण्यात येणारा पगार तीन टप्यात द्यावा जेणेकरून त्यांना त्या गोष्टींचे गांभीर्य लक्षात येईल असे मला वाटते. दिवसेंदिवस उस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या असून एकीकडे त्याला सरकारचे धोरण जबाबदार असताना आता न्याय व्यवस्थाही या धोरणाचा भाग बनू लागली आहे का? असा प्रश्न मला पडू लागला आहे. तरी तातडीने प्रकरण बोर्डावर घेत याचिका निकाली काढणेबाबत संबंधितांना आदेश देण्यात यावेत ही विनंती असल्याचेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 

काय म्हटलं आहे पत्रात? 

माझ्या वकीलांनी अनेक वेळा प्रकरण बोर्डावर घेण्यासाठी अर्ज केल्याचे मला कळविले आहे तरी देखील प्रकरण सुनावणी साठी का लागत नाही ?? न्याय देवता न्याय देणाऱ्यांसाठी का न्याय मागणाऱ्यांसाठी हा प्रश्न मला पडला आहे. केंद्र केलेल्या कायद्यांची राजरोसपणे पायमल्ली करत राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम राज्य सरकारकडून केले गेले आहे. एक रक्कमी एफ. आर. पी च्या कायद्यात बदल करण्याचे अधिकार हे केंद्र सरकारला आहेत, मात्र केंद्र सरकारने अधिकाराचा गैरवापर करून एफ. आर. पी मध्ये बदल करत तीन टप्यात देण्याचा निर्णय घेतला आहे.

तर ही न्याय व्यवस्था नेमकी कुणासाठी आहे

बेकायदेशीर रित्या केलेल्या या कायद्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात आला असून 16 महिने ऊस पिकवायचे त्यानंतर कारखान्याला गाळपास पाठवायचे व ऊस तुटल्यानंतर 14 दिवसात शेतक-यांच्या खात्यावर एफ, आर पी ची रक्कम जमा करण्याचा केंद्र सरकारने कायदा केलेला आहे. मात्र राज्य सरकार पुढील एक वर्षात म्हणजे 26व्या महिन्यात अंतिम ऊस बिल घ्यायचे अशा पध्दतीचा कायदा करून शेतक-यांची पिळवणूक केली जात आहे. याकरिता मी गेल्या दोन वर्षांपासून मुबंई उच्च न्यायालयात याबाबत न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र न्यायव्यवस्थेनेही शेतक-यांना बेदखल केले आहे. आज ऊस उत्पादक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत तरीसुध्दा शेतक-यांना न्याय मिळत नसेल तर ही न्याय व्यवस्था नेमकी कुणासाठी आहे हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडू लागला आहे.ॉ

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Embed widget