एक्स्प्लोर

केळी उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी! फळ पीकविमा योजनेचा कालावधी वाढवला, 'या' तारखेपर्यंत व्हा सहभागी

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. फळ पीकविमा योजनेत सहभागी होण्याचा कालावधी वाढवला आहे.

Dhananjay Munde : केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. तांत्रिक अडचणींमुळं काही केळी उत्पादक शेतकरी फळ पीकविमा योजनेत विहित वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. सहभागी होण्यासाठी 31 ऑक्टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. या  केळी उत्पादक शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घेण्यासाठी 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. याबाबतची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी दिली आहे. 

फळ पीकविमा योजनेची मुदत वाढवून मिळावी यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारला विनंती केली होती. केंद्र सरकारनं याची दखल घेऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग होण्यासाठी 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत हवामान आधारित फळ पिक विमा योजनेमध्ये आंबिया बहार 2023-24 साठी केळी पिकाचा विमा योजनेत सहभागासाठी अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 हा होता. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत 45731 अर्जदारांनी केळीसाठी विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे. तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन विमा योजनेत आपला सहभाग वाढवावा असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना संरक्षण मिळावं म्हणून ही योजना

प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजना राबविली जाते, ज्यामध्ये मृगबहार व आंबिया बहार अशा दोन ऋतूसाठी शेतकऱ्यांकडून पिकविमा भरून घेतला जातो. कृषी क्षेत्राच्या उत्पन्न वाढीमध्ये फळ पिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. फळ पिकांची मागणी जास्त असल्याकारणाने शेतकऱ्यांना मिळणार उत्पन्न सुद्धा चांगलंच आहे. उत्पन्न चांगला असला, तरी नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अन्यकारणाने फळ पिकांचा नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान, नैसर्गिक धोका, अवकाळी पाऊस इत्यादीपासून संरक्षण मिळावं यासाठी राज्यात फळ पीकविमा योजना सुरू करण्यात आली.

चालू वर्ष 2023-24 साठी फळबागांना हवामान आधारित विमा अर्ज मागविण्यात येत असून कर्जदार शेतकऱ्यांना विमा नको असल्यास, अशा प्रकारचे घोषणापत्र त्यांना द्यावे लागेल, अन्यथा त्यांचा विमा हप्ता परस्पर कापला जाणार आहे. या फळबाग विमा योजनेत संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, द्राक्ष, सीताफळ, व लिंबू, इत्यादी फळपिकांचा समावेश आहे.

'या' योजनेची वैशिष्ट्ये

  • नैसर्गिक आपत्ती किंवा हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या फळ पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावा.
  • शेतकऱ्यांना बाजारातील नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहित करणे.
  • फळपिकांच नुकसान झाल्यास शेतकरी परिणामी हातबल व निराश होतो, अशा कठीण काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी फळपिक विमा योजना मोलाचं काम करते.
  • शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी हा फळपिक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या:

60 हजारच्या विमा संरक्षणासाठी 51 हजारांचा हप्ता! फळपीक विमा योजनेत पालघरच्या शेतकऱ्यांच्या विमा हप्त्यात सहा पटींनी वाढ

 

महत्त्वाच्या बातम्या

तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: 'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ
'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ
Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत कोल्हापूर ते मुंबई एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत कोल्हापूर ते मुंबई एकत्र प्रवास!
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Embed widget