एक्स्प्लोर

केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, येत्या आठ दिवसात आक्रमक होणार : राजू शेट्टी

केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी आक्रमक होणार असल्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलाय.

नंदुरबार : एफआरपीच्या दरापेक्षा जास्त दर देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून देण्यात येणाऱ्या नोटीस संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. केंद्राने घेतलेला निर्णय चांगला असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. मात्र, पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीच्या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली आहे. तसेच केंद्र आणि राज्याने राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अजूनही शेतकऱ्यांना कुठलेही प्रकारचे अनुदान मिळाले नसून शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तर विमा कंपनी आपले भांडे भरण्याचं काम करत असल्याचा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.

एफआरपी संदर्भात भूमिका
केंद्र सरकारने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला असून राज्यांकडून मत मागविण्यात येत आहे. एफआरपी कोणत्याही प्रकारात तीन तुकडे देण्यात येऊ नये, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. तसेच केंद्र सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने जास्तीचा भाव देणाऱ्या  साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून नोटीस दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा भाव मिळत नव्हता. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांचा फायदा होईल. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित व्हावी, अशी अपेक्षा राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुरघोडीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून या सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये कुरघोडी असल्याचे दिसून येते. ऊर्जा खाते हे काँग्रेसकडे असल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पूर परिस्थितीची पाहणी करताना वीज जोडणी कट केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. आता अचानक वीज जोडणी का कट केली जात आहे. अर्थ विभाग त्याला परवानगी का देत नाही? अशी गत आहे. दोन रेड्यांच्या टकरीमध्ये कुंपणाचा चुराडा होत असल्याची गत शेतकऱ्याची होत असल्याचे शेट्टी म्हणाले.

राज्यात चार पक्षांच्या टोळ्या सक्रिय यंत्रणाचा दुरुपयोग
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं कोणत्याही राजकीय पक्षाला काही पडलेले नाही. आर्यन खानचा जामीन कधी होईल हे सर्वांसाठी महत्वाचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून यंत्रणांचा अतिवापर होत असून हे राज्यासाठी चांगले नसून यंत्रणा ह्या कार्यकर्त्या सारख्या वागू लागले असल्याचा टोला राजू शेट्टी यांनी यावेळी लगावला.

१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Embed widget