एक्स्प्लोर

केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, येत्या आठ दिवसात आक्रमक होणार : राजू शेट्टी

केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी आक्रमक होणार असल्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलाय.

नंदुरबार : एफआरपीच्या दरापेक्षा जास्त दर देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून देण्यात येणाऱ्या नोटीस संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. केंद्राने घेतलेला निर्णय चांगला असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. मात्र, पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीच्या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली आहे. तसेच केंद्र आणि राज्याने राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अजूनही शेतकऱ्यांना कुठलेही प्रकारचे अनुदान मिळाले नसून शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तर विमा कंपनी आपले भांडे भरण्याचं काम करत असल्याचा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.

एफआरपी संदर्भात भूमिका
केंद्र सरकारने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला असून राज्यांकडून मत मागविण्यात येत आहे. एफआरपी कोणत्याही प्रकारात तीन तुकडे देण्यात येऊ नये, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. तसेच केंद्र सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने जास्तीचा भाव देणाऱ्या  साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून नोटीस दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा भाव मिळत नव्हता. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांचा फायदा होईल. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित व्हावी, अशी अपेक्षा राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुरघोडीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून या सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये कुरघोडी असल्याचे दिसून येते. ऊर्जा खाते हे काँग्रेसकडे असल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पूर परिस्थितीची पाहणी करताना वीज जोडणी कट केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. आता अचानक वीज जोडणी का कट केली जात आहे. अर्थ विभाग त्याला परवानगी का देत नाही? अशी गत आहे. दोन रेड्यांच्या टकरीमध्ये कुंपणाचा चुराडा होत असल्याची गत शेतकऱ्याची होत असल्याचे शेट्टी म्हणाले.

राज्यात चार पक्षांच्या टोळ्या सक्रिय यंत्रणाचा दुरुपयोग
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं कोणत्याही राजकीय पक्षाला काही पडलेले नाही. आर्यन खानचा जामीन कधी होईल हे सर्वांसाठी महत्वाचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून यंत्रणांचा अतिवापर होत असून हे राज्यासाठी चांगले नसून यंत्रणा ह्या कार्यकर्त्या सारख्या वागू लागले असल्याचा टोला राजू शेट्टी यांनी यावेळी लगावला.

१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget