एक्स्प्लोर

नवं सरकार कधी येणार? राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता महिना होत आला. मात्र, अजूनही राज्यात सरकार कधी स्थापन होईल, हे कोणीही खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. यामुळं राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सव्वीस दिवस होते आले तरी राज्यात अजूनही कोणाचीच सत्ता आलेली नाही. त्यासाठी ज्या हालचाली सुरू आहेत, त्यातूनही काही निष्पन्न होताना दिसत नाहीये. त्यामुळे नवं सरकार कधी येणार याबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यापूर्वीही सरकार स्थापन करायला बराच कालावधी गेल्याचे दाखले आता सत्ता स्थापनेच्या हालचाली करणाऱ्या पक्षांच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. या निकालानंतर राज्यात पुन्हा युतीचे सरकार येईल अशी चर्चा होती. पण मुख्यमंत्री पदावरुन शिवसेनेनं भाजपशी फारकत घेतली आणि राज्यात महाशिवआघाडीचे सरकार बनण्याबाबत हालचालींना सुरुवात झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होऊन त्यात किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार झाल्याचं या पक्षांच्या नेत्यांनी जाहीरही केलं. मात्र, सत्ता स्थापनेबाबत चर्चाच झाली नसल्याचं, तसंच किमान समान कार्यक्रमाबाबतही चर्चा झाली नसल्याचं शरद पवारांनी दिल्लीत जाहीर केलं आणि राज्यात गोंधळाचं वातावरण तयार झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील बैठकीचे सत्र सुरु होऊन आता एक आठवड्यातून अधिकच काळ गेला आहे. निकालानंतर आता 26 दिवस झाले, म्हणजेच महिना पूर्ण होत आला तरी राज्याला नवं सरकार मिळालेलं नाही. यापूर्वी 1999 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळी निवडणूक लढवली होती. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याचं ठरवलं. त्यांच्या सत्ता स्थापनेच्या चर्चेला तेव्हा तब्बल दीड महिना लागला होता. याचेच उदाहरण या पक्षांचे नेते आता देत आहेत. काय होती 1999 सालची परिस्थिती? 1999 मध्ये शिवसेनाल 69, भाजपला 56 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस 75 जागा आणि राष्ट्रवादी 58 जागा मिळाल्या होत्या. भाजपतर्फे गोपीनाथ मुंडे यांचा मुख्यमंत्री पदाचा आग्रह होता. तेव्हा नुकताच शरद पवार यांनी सोनिया गांधी यांचा विदेशी जन्माचा मुद्दा घेत काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती. भाजप आणि सेनेतील मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरु असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीची स्थापना काँग्रेस फुटून झाल्यामुळे होती, त्यामुळे हे पक्ष एकत्र येतील अशी शंका भाजप आणि सेनेला नव्हती. पण हे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थान झाली. महाशिवआघाडीतील चर्चेबाबत कुणीही कुठल्याही पक्षाचे नेते आता स्पष्ट भूमिका मांडताना दिसत नाहीत. किंबहुना आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे गोंधळात भर पडत आहे. पत्रकारांना जी माहिती दिली जातेय ती संभ्रम वाढवेल अशीच आहेत. त्यामुळे या तीनही पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारही सध्या टेन्शनमध्ये आहेत. खरंच सरकार होणार का? कुणाचं सरकार होणार हीच चर्चा राज्यात रंगली आहे. संबंधित बातम्या - शरद पवार समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील : संजय राऊत सत्ता स्थापनेबाबत चर्चा नाही, आघाडीतील मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही : शरद पवार शिवसेना आणि भाजपला विचारा सरकार कसं बनवणार? : शरद पवार व्हिडीओ :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! पालघरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग, चालकाचा जळून मृत्यू तर वाहक गंभीर जखमी 
धक्कादायक! पालघरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग, चालकाचा जळून मृत्यू तर वाहक गंभीर जखमी 
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
Sharad Pawar : एका जागेवरुन मविआत चढाओढ, मात्र शेवटी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं झालं? आदित्य ठाकरेंच्या नाराजीचं काय? 
एका जागेवरुन मविआत चढाओढ, मात्र शेवटी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं झालं? आदित्य ठाकरेंच्या नाराजीचं काय? 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget