एक्स्प्लोर

नवं सरकार कधी येणार? राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता महिना होत आला. मात्र, अजूनही राज्यात सरकार कधी स्थापन होईल, हे कोणीही खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. यामुळं राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सव्वीस दिवस होते आले तरी राज्यात अजूनही कोणाचीच सत्ता आलेली नाही. त्यासाठी ज्या हालचाली सुरू आहेत, त्यातूनही काही निष्पन्न होताना दिसत नाहीये. त्यामुळे नवं सरकार कधी येणार याबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यापूर्वीही सरकार स्थापन करायला बराच कालावधी गेल्याचे दाखले आता सत्ता स्थापनेच्या हालचाली करणाऱ्या पक्षांच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. या निकालानंतर राज्यात पुन्हा युतीचे सरकार येईल अशी चर्चा होती. पण मुख्यमंत्री पदावरुन शिवसेनेनं भाजपशी फारकत घेतली आणि राज्यात महाशिवआघाडीचे सरकार बनण्याबाबत हालचालींना सुरुवात झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होऊन त्यात किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार झाल्याचं या पक्षांच्या नेत्यांनी जाहीरही केलं. मात्र, सत्ता स्थापनेबाबत चर्चाच झाली नसल्याचं, तसंच किमान समान कार्यक्रमाबाबतही चर्चा झाली नसल्याचं शरद पवारांनी दिल्लीत जाहीर केलं आणि राज्यात गोंधळाचं वातावरण तयार झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील बैठकीचे सत्र सुरु होऊन आता एक आठवड्यातून अधिकच काळ गेला आहे. निकालानंतर आता 26 दिवस झाले, म्हणजेच महिना पूर्ण होत आला तरी राज्याला नवं सरकार मिळालेलं नाही. यापूर्वी 1999 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळी निवडणूक लढवली होती. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याचं ठरवलं. त्यांच्या सत्ता स्थापनेच्या चर्चेला तेव्हा तब्बल दीड महिना लागला होता. याचेच उदाहरण या पक्षांचे नेते आता देत आहेत. काय होती 1999 सालची परिस्थिती? 1999 मध्ये शिवसेनाल 69, भाजपला 56 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस 75 जागा आणि राष्ट्रवादी 58 जागा मिळाल्या होत्या. भाजपतर्फे गोपीनाथ मुंडे यांचा मुख्यमंत्री पदाचा आग्रह होता. तेव्हा नुकताच शरद पवार यांनी सोनिया गांधी यांचा विदेशी जन्माचा मुद्दा घेत काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती. भाजप आणि सेनेतील मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरु असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीची स्थापना काँग्रेस फुटून झाल्यामुळे होती, त्यामुळे हे पक्ष एकत्र येतील अशी शंका भाजप आणि सेनेला नव्हती. पण हे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थान झाली. महाशिवआघाडीतील चर्चेबाबत कुणीही कुठल्याही पक्षाचे नेते आता स्पष्ट भूमिका मांडताना दिसत नाहीत. किंबहुना आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे गोंधळात भर पडत आहे. पत्रकारांना जी माहिती दिली जातेय ती संभ्रम वाढवेल अशीच आहेत. त्यामुळे या तीनही पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारही सध्या टेन्शनमध्ये आहेत. खरंच सरकार होणार का? कुणाचं सरकार होणार हीच चर्चा राज्यात रंगली आहे. संबंधित बातम्या - शरद पवार समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील : संजय राऊत सत्ता स्थापनेबाबत चर्चा नाही, आघाडीतील मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही : शरद पवार शिवसेना आणि भाजपला विचारा सरकार कसं बनवणार? : शरद पवार व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Chhatrapati Sambhajinagar Crime: शंभर रुपयांचं आमिष, 10 वर्षांच्या चिमुकलीला रिक्षात ओढलं अन्...; तीन नागरिकांनी उधळला 'तो' भयानक डाव, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
शंभर रुपयांचं आमिष, 10 वर्षांच्या चिमुकलीला रिक्षात ओढलं अन्...; तीन नागरिकांनी उधळला 'तो' भयानक डाव, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget