एक्स्प्लोर

नवं सरकार कधी येणार? राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता महिना होत आला. मात्र, अजूनही राज्यात सरकार कधी स्थापन होईल, हे कोणीही खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. यामुळं राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सव्वीस दिवस होते आले तरी राज्यात अजूनही कोणाचीच सत्ता आलेली नाही. त्यासाठी ज्या हालचाली सुरू आहेत, त्यातूनही काही निष्पन्न होताना दिसत नाहीये. त्यामुळे नवं सरकार कधी येणार याबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यापूर्वीही सरकार स्थापन करायला बराच कालावधी गेल्याचे दाखले आता सत्ता स्थापनेच्या हालचाली करणाऱ्या पक्षांच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. या निकालानंतर राज्यात पुन्हा युतीचे सरकार येईल अशी चर्चा होती. पण मुख्यमंत्री पदावरुन शिवसेनेनं भाजपशी फारकत घेतली आणि राज्यात महाशिवआघाडीचे सरकार बनण्याबाबत हालचालींना सुरुवात झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होऊन त्यात किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार झाल्याचं या पक्षांच्या नेत्यांनी जाहीरही केलं. मात्र, सत्ता स्थापनेबाबत चर्चाच झाली नसल्याचं, तसंच किमान समान कार्यक्रमाबाबतही चर्चा झाली नसल्याचं शरद पवारांनी दिल्लीत जाहीर केलं आणि राज्यात गोंधळाचं वातावरण तयार झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील बैठकीचे सत्र सुरु होऊन आता एक आठवड्यातून अधिकच काळ गेला आहे. निकालानंतर आता 26 दिवस झाले, म्हणजेच महिना पूर्ण होत आला तरी राज्याला नवं सरकार मिळालेलं नाही. यापूर्वी 1999 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळी निवडणूक लढवली होती. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याचं ठरवलं. त्यांच्या सत्ता स्थापनेच्या चर्चेला तेव्हा तब्बल दीड महिना लागला होता. याचेच उदाहरण या पक्षांचे नेते आता देत आहेत. काय होती 1999 सालची परिस्थिती? 1999 मध्ये शिवसेनाल 69, भाजपला 56 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस 75 जागा आणि राष्ट्रवादी 58 जागा मिळाल्या होत्या. भाजपतर्फे गोपीनाथ मुंडे यांचा मुख्यमंत्री पदाचा आग्रह होता. तेव्हा नुकताच शरद पवार यांनी सोनिया गांधी यांचा विदेशी जन्माचा मुद्दा घेत काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती. भाजप आणि सेनेतील मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरु असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीची स्थापना काँग्रेस फुटून झाल्यामुळे होती, त्यामुळे हे पक्ष एकत्र येतील अशी शंका भाजप आणि सेनेला नव्हती. पण हे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थान झाली. महाशिवआघाडीतील चर्चेबाबत कुणीही कुठल्याही पक्षाचे नेते आता स्पष्ट भूमिका मांडताना दिसत नाहीत. किंबहुना आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे गोंधळात भर पडत आहे. पत्रकारांना जी माहिती दिली जातेय ती संभ्रम वाढवेल अशीच आहेत. त्यामुळे या तीनही पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारही सध्या टेन्शनमध्ये आहेत. खरंच सरकार होणार का? कुणाचं सरकार होणार हीच चर्चा राज्यात रंगली आहे. संबंधित बातम्या - शरद पवार समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील : संजय राऊत सत्ता स्थापनेबाबत चर्चा नाही, आघाडीतील मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही : शरद पवार शिवसेना आणि भाजपला विचारा सरकार कसं बनवणार? : शरद पवार व्हिडीओ :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Education : इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी; जूनपासून लागू होणार नवा आराखडा
इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी; जूनपासून लागू होणार नवा आराखडा
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
Embed widget