एक्स्प्लोर

नवं सरकार कधी येणार? राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता महिना होत आला. मात्र, अजूनही राज्यात सरकार कधी स्थापन होईल, हे कोणीही खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. यामुळं राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सव्वीस दिवस होते आले तरी राज्यात अजूनही कोणाचीच सत्ता आलेली नाही. त्यासाठी ज्या हालचाली सुरू आहेत, त्यातूनही काही निष्पन्न होताना दिसत नाहीये. त्यामुळे नवं सरकार कधी येणार याबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यापूर्वीही सरकार स्थापन करायला बराच कालावधी गेल्याचे दाखले आता सत्ता स्थापनेच्या हालचाली करणाऱ्या पक्षांच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. या निकालानंतर राज्यात पुन्हा युतीचे सरकार येईल अशी चर्चा होती. पण मुख्यमंत्री पदावरुन शिवसेनेनं भाजपशी फारकत घेतली आणि राज्यात महाशिवआघाडीचे सरकार बनण्याबाबत हालचालींना सुरुवात झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होऊन त्यात किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार झाल्याचं या पक्षांच्या नेत्यांनी जाहीरही केलं. मात्र, सत्ता स्थापनेबाबत चर्चाच झाली नसल्याचं, तसंच किमान समान कार्यक्रमाबाबतही चर्चा झाली नसल्याचं शरद पवारांनी दिल्लीत जाहीर केलं आणि राज्यात गोंधळाचं वातावरण तयार झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील बैठकीचे सत्र सुरु होऊन आता एक आठवड्यातून अधिकच काळ गेला आहे. निकालानंतर आता 26 दिवस झाले, म्हणजेच महिना पूर्ण होत आला तरी राज्याला नवं सरकार मिळालेलं नाही. यापूर्वी 1999 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळी निवडणूक लढवली होती. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याचं ठरवलं. त्यांच्या सत्ता स्थापनेच्या चर्चेला तेव्हा तब्बल दीड महिना लागला होता. याचेच उदाहरण या पक्षांचे नेते आता देत आहेत. काय होती 1999 सालची परिस्थिती? 1999 मध्ये शिवसेनाल 69, भाजपला 56 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस 75 जागा आणि राष्ट्रवादी 58 जागा मिळाल्या होत्या. भाजपतर्फे गोपीनाथ मुंडे यांचा मुख्यमंत्री पदाचा आग्रह होता. तेव्हा नुकताच शरद पवार यांनी सोनिया गांधी यांचा विदेशी जन्माचा मुद्दा घेत काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती. भाजप आणि सेनेतील मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरु असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीची स्थापना काँग्रेस फुटून झाल्यामुळे होती, त्यामुळे हे पक्ष एकत्र येतील अशी शंका भाजप आणि सेनेला नव्हती. पण हे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थान झाली. महाशिवआघाडीतील चर्चेबाबत कुणीही कुठल्याही पक्षाचे नेते आता स्पष्ट भूमिका मांडताना दिसत नाहीत. किंबहुना आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे गोंधळात भर पडत आहे. पत्रकारांना जी माहिती दिली जातेय ती संभ्रम वाढवेल अशीच आहेत. त्यामुळे या तीनही पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारही सध्या टेन्शनमध्ये आहेत. खरंच सरकार होणार का? कुणाचं सरकार होणार हीच चर्चा राज्यात रंगली आहे. संबंधित बातम्या - शरद पवार समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील : संजय राऊत सत्ता स्थापनेबाबत चर्चा नाही, आघाडीतील मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही : शरद पवार शिवसेना आणि भाजपला विचारा सरकार कसं बनवणार? : शरद पवार व्हिडीओ :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Liquor Ban Protest : दारूमुळं गाव बिघडलं! दारू दुकान बंद करा, नाहीतर लग्नंही होणार नाहीत; महिलांचा संताप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
दारूमुळं गाव बिघडलं! दारू दुकान बंद करा, नाहीतर लग्नंही होणार नाहीत; महिलांचा संताप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Ashok Kharat : अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
भारतात लॉकडाउन लागू होणार का? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?  
भारतात लॉकडाउन लागू होणार का? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?  
Rupali Chakankar : मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

व्हिडीओ

Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report
Mamta Kulkarni  : कारनामे खरातचे, ताशेरे ममताचे, ममत कुलकर्णींचा महिलांना सवाल Special Report
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Dhananjay Munde Speech | मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
Rupali Chakankar : मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
Ashok Kharat : रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार का, चौकशी होणार का? नाशिक पोलीस आयुक्तांचे Exclusive मुलाखतीत सविस्तर उत्तर
रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार का, चौकशी होणार का? नाशिक पोलीस आयुक्तांचे Exclusive मुलाखतीत सविस्तर उत्तर
Stock Market Crash : शेअर बाजारात हाहाकार! 9 लाख कोटी पाण्यात, रिलायन्ससह दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळले, कारणे काय?
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी पाण्यात
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
Video: दबावाची भीती, रात्रीचे 11 वाजता गुंडास्कॉड अशोक खरातच्या घरात घुसले, चोरनीतीचा वापर; आयुक्तांनी उलगडला थरार
Video: दबावाची भीती, रात्रीचे 11 वाजता गुंडास्कॉड अशोक खरातच्या घरात घुसले, चोरनीतीचा वापर; आयुक्तांनी उलगडला थरार
ह्रदयद्रावक... हॉलिबॉल खेळताना पाण्यात उतरला; 20 वर्षीय युवकाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... हॉलिबॉल खेळताना पाण्यात उतरला; 20 वर्षीय युवकाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू
मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी
मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी
Embed widget