एक्स्प्लोर
मराठवाड्यात वीज कोसळून सहा जणांचा बळी, गारपीटीचाही फटका

बीड : मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. ऐन रब्बीच्या मोसमात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. तर वीज कोसळून मराठवाड्यात सहा जणांचा बळी गेला आहे. ज्वारी, गहू, हरभऱ्यासह आंबा आणि द्राक्षाचे प्रचंड नुकसान झाले. लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर सोलापूर जिल्ह्यातही गारपीट झाली. वीज पडून बीड जिल्ह्यात पाच जणांचा तर सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात एकाचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्याला सायंकाळी पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले. पावसाचा सर्वाधिक तडाखा दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मंगळवेढा तालुक्यांना बसला. गहू, हरभरा, ज्वारी, द्राक्ष यासारख्या पिकांना मोठा फटका बसला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील द्राक्षबागा भुईसपाट झाल्या.
संबंधित बातम्या :
हाताशी आलेली पीकं गेली, मराठवाड्यावर पुन्हा निसर्गाची अवकृपा
बीडमध्ये अवकाळी पावसाचा कहर, परळीत वीज पडून दोघांचा मृत्यू
मराठवाड्यात गारपीट, पिकांचं मोठं नुकसान
उस्मानाबादलाही गारपीटीचा तडाखा, पिकांचं नुकसान
Before You Go
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















