एक्स्प्लोर

देशात 100 कोटी लसी दिल्या नाहीत, फक्त 23 कोटी दिल्या हे पुराव्यानिशी सिद्ध करु: संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिकच्या दौऱ्यावर असून त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. 

नाशिक : लडाखची सीमा पार करून चीनचे सैन्य भारतात आले, काश्मीरमध्ये शीख हत्याकांड झाले आणि आपल्याकडे लसीचे उत्सव साजरा केले जातात अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केली आहे. 100 कोटी लसीकरणाचा आकडा खोटा असून फक्त 23 कोटी लस दिल्या गेल्या आहेत, आपण ही गोष्ट पुराव्याने सिद्ध करु. देशातील वाढती महागाई, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवर कोणी बोलत नाही असंही ते म्हणाले. आपल्या नाशिक दौऱ्यावेळी खासदार संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, "राज्यातील भाजपचे सरकार घालवले आता दिल्लीला कूच करायची. देशात महाविकास आघाडी म्हणून नाही तर शिवसेना म्हणून जाणार. हर्षवर्धन पाटील जे बोलले, ते नशेत नसावे, त्यांना गांजा मिळाला नसावा. ते म्हणतात त्यांना शांत झोप लागते. चंद्रकांत पाटील, फडणवीस, अमित शहा यांची झोप उडाली आहे. यांना सरकारमधून बाजूला काढल्यानंतर आम्हाला शांत झोप लागते."

खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, "नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे. येत्या निवडणुकीत मनपाची सत्ता आणू, पण विधानसभेवर लक्ष घालावं लागेल. विधानसभेत शिवसेनेचा आकडा 100 वर पाहिजे. नशिकमध्ये सेनेचा आमदार नाही ही खंत वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्याकडे देशाचे सूत्र द्यायचे असेल तर पक्षाचे आमदार, खासदार वाढले पाहिजे. दादर नगर हवेलीतून आपण निवडणूक लढत आहोत, तिथल्या खासदारांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली, तिथे आपला उमेदवार निवडून येणार. यापुढे गुजरात आणि इतर राज्यात निवडणूक लढविणार."

मुंबई-ठाण्याच्या पुढे शिवसेना जाणार नाही असे बोलत असताना आपण दिल्लीत धडक मारली असं सांगत संजय राऊत म्हणाले की, "आज सेनेचे 22 खासदार आहेत. देशाचे नेतृत्व करणारा नेता म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे बघितले जाते. ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी मोदींनी 22 अमित शहा यांनी 40 सभा घेतल्या, दंगली घडविल्या, पैशाचा पाऊस पाडला, पण जनतेने ममता बॅनर्जी याना जिंकून दिले. महाराष्ट्राने बंगालचा धडा घेतला पाहिजे. महाराष्ट्र स्वाभिमानी जनतेचं राज्य आहे."

कोणाचे सरकार येणार कोणाला माहीत नव्हते. भाजपने दिलेला शब्द फिरवला आणि लढाईला सुरवात झाली. भाजपने बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत शब्द दिला होता. तो फिरवला, फसवणूक केली म्हणून आम्ही खोटेपणाच्या विरोधात लढलो असं संजय राऊत म्हणाले. 

संजय राऊत म्हणाले की, "रामायण-महाभारत कशामुळे झाले? खोटेपणामुळे झाले. रोज आमच्यावर हल्ले होत आहेत, जणू रोज भ्रष्टाचारचे पीक येतं की काय? महाराष्ट्राची बदनामी थांबवूया. याच नाशिकच्या भुमीतून सावरकर आलेत. त्या सावरकरांची बदनामी करण्याचे काम भाजपने सुरू केलं आहे. सावरकर यांनी माफी मागितली हे भाजपने सुरू केले आहे. आम्ही कोणत्याही आघाडीत असो हिंदुत्व सोडणार नाही. शिवसेनेचे काम करणे ही एक नशा आहे. माझ्यासारखे लाखो शिवसैनिक काम करतात म्हणून शिवसेना  आज आहे."

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
Sanjay Rathod : पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनला मंत्री संजय राठोडांकडून तिलांजली; हेलिकॉप्टरमधून प्रवास, दौऱ्यात 20 पेक्षा अधिक शासकीय वाहनांचा लवाजमा अन् म्हणे...
पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनला मंत्री संजय राठोडांकडून तिलांजली; हेलिकॉप्टरमधून प्रवास, दौऱ्यात 20 पेक्षा अधिक शासकीय वाहनांचा लवाजमा अन् म्हणे...
Maharashtra Live Blog Updates :सरकारचं शिष्टमंडळ अंतरावली सराटीत दाखल; रखरखत्या उन्हात मनोज जरांगे आमरण उपोषणवर ठाम
Maharashtra Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ अंतरावली सराटीत दाखल; रखरखत्या उन्हात मनोज जरांगे आमरण उपोषणवर ठाम
Nashik Crime News: शेअर मार्केट अन् प्लास्टिक कंपनीत भागीदारीचं आमिष दाखवलं, नाशिकमधील वकील, सरकारी नोकरदारांसह 40 जणांना कोट्यवधींचा गंडा; नेमकं काय घडलं?
शेअर मार्केट अन् प्लास्टिक कंपनीत भागीदारीचं आमिष दाखवलं, नाशिकमधील वकील, सरकारी नोकरदारांसह 40 जणांना कोट्यवधींचा गंडा; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
Tukaram Mundhe : धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त
धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त
Karnataka Politics: कर्नाटकात आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यानंतर डीके शिवकुमारांची नेतेपदी निवड होणार, राज्यपालांची भेट घेतली
कर्नाटकात आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यानंतर डीके शिवकुमारांची नेतेपदी निवड होणार, राज्यपालांची भेट घेतली
US Iran War Impact: वाढत्या महागाईचा भारतातील कंपन्यांना फटका बसणार? आर्थिक वर्ष 2026- 27 मध्ये कंपन्यांच्या कमाईवर दबाव येणार?
अमेरिका इराण युद्धामुळं वाढत्या महागाईचा भारतातील कंपन्यांना फटका बसणार? आर्थिक वर्ष 2026- 27 मध्ये कंपन्यांच्या कमाईवर दबाव येणार?
RCB vs GT IPL 2026 Final : एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
RSS on cockroach janata party: 'कॉक्रोच जनता पार्टी'वर RSS ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'भारतातील जेन-झी...'
'कॉक्रोच जनता पार्टी'वर RSS ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'भारतातील जेन-झी...'
Kumar Sangakkara : चेन्नईतून आलेल्या खेळाडूनं राजस्थानला दिला धोका, राजस्थान आयपीएलमधून बाहेर जाताच कुमार संगकारानं मागचं पुढचं सगळं उकरुन काढलं
राजस्थान रॉयल्सच्या त्या खेळाडूवर धोका दिल्याचा ठपका, कुमार संगकाराच्या आरोपानं खळबळ, BCCI काय करणार? 
Embed widget