एक्स्प्लोर

शिवसेना आणि भाजपात सगळं समसमान पाहिजे, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पण त्यांचा अप्रत्यक्ष इशारा सत्तेतल्या समसमान वाट्याकडे आहे, हे उपस्थित कार्यकर्त्यांना कळायला वेळ लागला नाही.

मुंबई : भाजप आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर दावा केला जात असतानाच शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. या दोन्ही नेत्यांनी आपआपल्या भाषणात सूचक विधानं केली. आपल्या भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी हे विधान केल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पण त्यांचा अप्रत्यक्ष इशारा सत्तेतल्या समसमान वाट्याकडे आहे, हे उपस्थित कार्यकर्त्यांना कळायला वेळ लागला नाही. एका युतीची पुढची गोष्ट महाराष्ट्राच्या व्यासपीठावर असून संपूर्ण देश बघतोय असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना आणि भाजपाचं ठरलं असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. वाघाच्या जबड्यात घालूनी हात म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची भाषा आज बदलली होती. वाघ आणि सिंह एकत्र आले तर जंगलात त्यांचीच सत्ता असते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर शिवसेना आणि भाजपात सगळं समसमान पाहिजे, असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलं. मुख्यमंत्रिपदावर सेनेचाही 50 टक्के हक्क आहे असं तर उद्धव ठाकरेंना सूचवायचं नव्हतं ना? अशी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. वाघ सिंहाची जोडी एकत्र आल्यावर कुणी राज्य करावं हे सांगावं लागत नाही : मुख्यमंत्री आम्ही युती केली तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून केली होती. आमचं ठरलंय, तुम्ही चिंता करू नका, असे  वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. युती करण्याची भावना महत्वाची आहे. देशात अनेक राज्यात युती आणि आघाडी झाली. मात्र आज त्यांची अवस्था काय आहे हे समोर आहे, असे ते म्हणाले. राजकारणासाठी विरोधकांच्या आघाड्या होतात, मात्र आपण आता एकसाथ दौडायचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभेच्या विजयानंतर शिवसेनेचेच नव्हे तर भाजपचे खासदार देखील भेटायला आले होते. हा एकोपा असला पाहिजे. आपण एकमेकांत लढून सोन्याची माती करतो, आता ही माती होऊन द्यायची नाही, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आणि खासदार उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले की,  संघर्षाच्या वेळेला मला शिवसेनाप्रमुखांची आठवण येत नाही कारण त्यांनी मला असे सवंगडी दिले आहेत. मात्र अशा आनंदाच्या क्षणी शिवसेनाप्रमुखांची आठवण येते. त्या सर्व शिवसैनिकांची आठवण येते ज्यांनी शिवसेना मोठी केली. ते म्हणाले की, शिवसैनिक प्रेम केलं तर भरभरून प्रेम करतो आणि लढायचं म्हटलं तर जीवाची बाजी लावून लढतो. ठाकरे यावेळी म्हणाले की, युती करण्याची भावना महत्वाची आहे. राजकारणासाठी विरोधकांच्या आघाड्या होतात. मात्र आता आपण आता एकसाथ दौडू, आपण संघर्ष केल्याने विरोधकांचं फावलं असल्याचं ठाकरे म्हणाले. यावेळी अनेक नेत्यांच्या भाजप प्रवेशावर ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे अशी काय शक्ती आहे काही माहिती नाही. आम्ही विरोधी पक्षात उतरणार होतो तर आम्ही तुमच्यासोबत आलो. राधाकृष्ण विखे विरोधी पक्ष नेते होते तर ते देखील भाजपमध्ये आले. आता विरोधी पक्षनेते कुणाला तरी केलं आहे, तर त्यांना भाजपत घेऊ नका असे अजित पवारांनी सांगितलं आहे, असे ठाकरे म्हणाले. सगळ्यांना घ्या फक्त पवार कंपनी तिथेच राहू द्या, त्यांना घेऊ नका, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान होण्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. याचा मला आनंद आहे. आपण जिंकलो याचा सर्वाधिक आनंद आहे. मला दुसऱ्यांच्या पराभवानंतर आनंद साजरा करायला आवडत नाही. मात्र सावरकरांना डरफोक म्हणणाऱ्यांना हरवलं यांचा आनंद आहे, असे ते म्हणाले. ओवेसी म्हणतो आम्ही या देशात भाडेकरू नाही. आम्ही समान भागीदार आहोत, तर वन्दे मातरम् म्हणायला लाज का वाटते. एवढं स्वातंत्र्य देऊनही तुमच्या मनातले किडे का वळवळतात?, असा सवाल ठाकरेंनी केला. मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलावलं तर तुमच्या पोटात का दुखतंय, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.  याआधीही ही परंपरा होती. भाजपचा अधिवेशनात शिवसेना प्रमुखांना आमंत्रित केलं होतं. तसेच अनेक भाजप नेत्यांनीही शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मध्यंतरी परंपरा खंडित झाली होती. मात्र  मधल्या काळातला दुरावा आता पूर्ण नाहीसा झाला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल

व्हिडीओ

Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया
Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी
Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
BMC Election 2026: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राम कदमांनी भाजपसाठी तिकीट खेचून आणलं, शिंदे गटाच्या उमेदवाराचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, विक्रोळी वॉर्ड क्रमांक 123 मध्ये काय घडलं?
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राम कदमांनी भाजपसाठी तिकीट खेचून आणलं, शिंदे गटाचा इच्छूक उमेदवार अजितदादांच्या राष्ट्रवादीत, विक्रोळीच्या वॉर्ड क्रमांक 123 मध्ये काय घडलं?
BMC Election 2026: एबी फॉर्म वाटताच मुंबईत नाराजीचा वणवा पसरला; ठाकरे बंधू, शिवसेना, भाजपमध्ये कोणी बंडखोरी केली?
एबी फॉर्म वाटताच मुंबईत बंडखोरीचा उद्रेक, ठाकरे बंधू, शिवसेना, भाजपमध्ये कोणाची बंडखोरी?
Emraan Hashmi Mesmerized By Seeing Girija Oak: जेव्हा गिरीजा ओकचं आरस्पानी सौंदर्य पाहून खुद्द इमरान हाश्मी झालेलं दंग; सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेनं सांगितला कुणालाच ठाऊक नसलेला 'तो' किस्सा
'इमरान हाश्मी स्वत: तिच्याकडे सतत पाहत होता...'; सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेनं सांगितला 21 वर्षांपूर्वीचा विमानतला 'तो' प्रसंग
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
Embed widget