एक्स्प्लोर

Prafull Patel : शरद पवार हेच पक्ष फोडाफोडीचे गुरू; धर्मरावबाबा आत्रामांच्या टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांचाही सुरातसुर

Praful Patel: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर आता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी यांनी देखील टीकेच्या सुरात सुर मिसळवत टीका केलीय.

Praful Patel on Sharad Pawar भंडारा :  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी नुकतेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत आम्ही पक्ष फोडाफोडीचे राजकारण हे शरद पवारांकडून शिकलो असल्याचे म्हटले आहे. धर्मरावबाबा आत्रामांच्या या टीकेनंतर आता खासदार  प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी देखील या टीकेच्या सुरात सुर मिसळवत निशाणा साधला आहे. शरद पवार हे माझ्यासाठी आदरणीय होते, आहेत आणि कायम राहतील. पण एका आदरणीय नेत्याने आपला सन्मान कधीही कमी होऊ दिल्या नाही पाहिजे,  असे माझ्या मनात असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. 

राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांच्यासोबत छगन भुजबळ हे दौऱ्यामध्ये नव्हते. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या अनुपस्थितिचा कुठलाही अर्थ, अनर्थ काढू नका, आम्ही महायुती म्हणून सगळे सोबत असल्याचे सांगितलं. सोबतच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकतीने लढणार आहोत, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. तर राज्याचे उपमुखयमंत्री अजित पवार हे कोविड काळात वेश बदलुन दिल्लीला जात होते अशी टीका विरोधकांनी केली होती. यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की,  अजित पवार हे महाराष्ट्राचे महत्वाचे नेते असून त्यांच्यावर अशा पद्धतीने खालच्या पातळीवर टीका करणे योग्य नाही. असा सल्ला टीका करणाऱ्यांना त्यांनी दिलाय.

विधानसभेत कोणती सीट कोण लढणार हे अजूनही ठरलेलं नाही- प्रफुल्ल पटेल 

आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील घटक पक्ष कोणत्या जागेवर लढणार यावर अनेक चर्चा सुरू आहेत. यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत. योग्य पद्धतीने जागांचा वाटपही होणार आहे. मात्र, कोणता पक्ष कुठे लढेल अजूनही याबद्दल चर्चा झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी मृत्यू झालेला मनसे कार्यकर्ता जय मालोरकर हा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये येणार होता. असा गौप्स्फोट अमोल मिटकरी यांनी केला होता. यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता, मला या संदर्भात काही माहिती नाही. असे म्हणत सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी एक सल्ला दिला त्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर घसरवू नये असे प्रफुल पटेल म्हणाले.

राज्याच्या राजकारणाच्या स्तर घसरू देऊ नका - प्रफुल्ल पटेल 

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये पेन ड्राइव वरून वाद पेटलेला आहे. यावर प्रफुल पटेल यांनी सर्वपक्षीय नेत्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या स्तर खाली येऊ देऊ नका. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते, असा सल्ला त्यांनी दिला आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून देखील राजकारणाच्या स्तर घसरू देऊ नका, सर्वांचा सन्मान करायला शिका, असेही प्रफुल पटेल म्हणाले.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

WhatsApp Security: हॅकर्सना बसणार दणका! एका क्लिकवर खाते होणार सुरक्षित, येतंय ‘Strict Account Setting’
Pune Crime: 'दृश्यम ४ वेळा पाहिला', Samir Jadhav ने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी Anjali ला भट्टीत जाळले
Project Cheetah: 'जानेवारीत चित्ते भारतात येतील', भोपाळच्या वन अधिकाऱ्याची माहिती
Mahayuti Rift: 'राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही', Tanaji Sawant यांचा थेट Ajit Pawar यांच्यावर हल्ला
Drone Surveillance: 'कोणतं सर्वेक्षण घरात डोकावण्याची परवानगी देतं?', आदित्य ठाकरेंचा MMRDA ला सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर  
एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, रणजीमध्ये आकाश चौधरीचं वादळ 
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget