Sanjay Raut: भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची लूट थांबवा, संजय राऊतांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
सरकारमधील बाजारबुणग्यांवर कारवाई कधी करणार? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी पत्रात आमदार राहुल कुल, दादा भुसे आणि किरीट सोमय्या यांचा उल्लेख केल आहे.
![Sanjay Raut: भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची लूट थांबवा, संजय राऊतांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र Sanjay Raut writes letter to Dcm Devendra Fadnavis on Rahul kul dada bhuse kirit somaiya Sanjay Raut: भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची लूट थांबवा, संजय राऊतांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/0beace6bc12ace15c0bbd5b595aa341d168058187712389_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Raut Letter To Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची विनंती राऊतांनी पत्रातून केली आहे. सरकारमधील बाजारबुणग्यांवर कारवाई कधी करणार? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी पत्रात आमदार राहुल कुल, दादा भुसे आणि किरीट सोमय्या यांचा उल्लेख केल आहे.
संजय राऊत आपल्या पत्रात म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांविरोधात घेतलेल्या आपण घेतलेल्या भूमिकेबद्दल कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सरकारमधील अनेकांच्या बेकायदेशीर प्रकरणाबाबत पुरावे सादर करण्यासाठी आपली भेट द्यावी. गेल्या चार महिन्यापासून मी प्रयत्न करत आहे. परंतु आपण भेट देण्यास टाळाटाळ करत आहे.
महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती.
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 4, 2023
बाजार बुणगे सरकारात आहेत.आपल्या सोबत आहेत
त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणारं?@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @iambadasdanve pic.twitter.com/0HsVAk02J3
संजय राऊत यांनी आपल्या पत्रातून पुन्हा आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल कुल चेअरमन असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला आहे. शेतकऱ्यांच्या पैशांची अक्षरश: लुटमार झाली आहे. सहकारी कारखान्यात 500 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. हजारो शेतकऱ्यांची लूट झाली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संजय राऊतांनी केली आहे
संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार दादा भुसे यांनी गिरण अॅग्रो नावाने 178 कोटींचे 25 लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. गिरण कारखाना वाचवण्यासाठी भुसे यांनी हे पैसे गोळा केले या रकमेचा अपहार झाला असून कंपनीच्या वेबसाईटवर फक्त एक कोटी 67 लाखांचे शेअर्स फक्त 47 शेतकऱ्यांच्या नावावर दाखवल्या आहेत.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्ध नौका वाचवण्यासाठी जनतेतून पैसे जमा केले त्यासाठी हिशोब दिलेला नाही अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैशांवर सुरू असलेले दरोडेखोरी थांबवावी अशी विनंती आहे. बेकायदेशीर प्रकरणाबाबत पुरावे सादर करण्यासाठी आपणास भेटू इच्छितो आपल्या सोयीची वेळ कळवावी, असे संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)