एक्स्प्लोर

नदी पुनरुज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला, सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल

अग्रणी नदीच्या एकूण 55 किमीच्या पुनरुज्जीवनाचे कार्य केवळ दीड वर्षात पूर्ण करण्यात आले व नवीन 34 बंधारे बांधले. विशेष म्हणजे यात उगमापासून लुप्त झालेल्या 22 किमी नदी पात्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले.

सांगली : सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी जिल्ह्याची निवड झाली आहे. पुढील आठवड्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जल क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी वर्ष 2019 चे 'राष्ट्रीय जल पुरस्कार' घोषित झाले आहेत. विविध 12 श्रेणींमध्ये एकूण 88 पुरस्कार जाहीर झाले आहेत. नदी पुनरुज्जीवन श्रेणीमध्ये देशातील एकूण 6 विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्ह्यांना पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला अग्रणी नदीच्या पुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पश्चिम विभागात चार राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.

अग्रणी नदीचा झाला कायापालट

अग्रणी नदीच्या एकूण 55 किमीच्या पुनरुज्जीवनाचे कार्य केवळ दीड वर्षात पूर्ण करण्यात आले व नवीन 34 बंधारे बांधले. विशेष म्हणजे यात उगमापासून लुप्त झालेल्या 22 किमी नदी पात्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले. दीडशे वर्षांनतर अग्रणी पुन्हा प्रवाहित झाली व सुमारे 28 हजार शेतकऱ्यांच्या शेतीला याचा फायदा होणार आहे.

अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल

सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम असलेली अग्रणी नदी दीडशे वर्षांपूर्वी वाहती होती. मात्र, मध्यंतरीच्या काही दशकात ही नदी कोरडी होती व या नदीचे काही क्षेत्र लुप्त झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणी साठे निर्माण करण्याच्या कार्यांतर्गत अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले.

जिल्हा प्रशासनाने खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यातील 55 किमी लांबीची अग्रणी नदी बारमाही करण्याच्या ध्यासाने कार्य केले. राज्य शासनाची योजना, जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात कार्यरत सेवाभावी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने व लोकसहभागाने वर्षानुवर्षे कोरड्या पडलेल्या नदीला पुनरुज्जीवन मिळाले. नदीच्या उगमापासून खोलीकरण आणि रुंदीकरणातून भव्य पात्र निर्माण झाले. हे पात्र खानापूर तालुक्यामध्ये 22 किमी इतके आहे. उगमापासून तामखडी, जाधववाडी, गोरेवाडी, बेणापूर, बलवडी, करंजे, सुलतानगादे आदी गावांतील स्थानिकांनी या कार्यात सक्रीय श्रमदान दिले. त्यामुळे जवळपास 2 कोटी मूल्य असणारी ही कामे अवघ्या 65 लाख रुपयांमध्ये पूर्णत्वास आली.

या कामांतर्गत नदीपात्रातील 3 लाख, 70 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे नदीचे पात्र 50 फूट रुंद व 6 फूट खोल करण्यात प्रशासनाला यश आले .या नदीपात्रात ठिकठिकाणी 50 ते 60 नालाबांध घालण्यात आले. त्यामुळे साठणाऱ्या पाण्याचा लाभ परिसरातील जनतेला झाला आहे. अग्रणी नदी बारमाही झाल्याने नदीकाठच्या 21 गावांना लाभ झाला. तसेच अग्रणी खोरे बारमाही होऊन या खोऱ्यातील 105 गावात जलक्रांती घडून आली.

हा पुरस्कार म्हणजे अग्रणी नदी खोऱ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सन्मान - आयुक्त शेखर गायकवाड

राष्ट्रीय जल पुरस्कार हा अग्रणी नदी खोऱ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सन्मान असल्याच्या भावना सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा राज्याचे विद्यमान साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना व्यक्त केल्या. अग्रणी नदीच्या एकूण 55 किमीच्या पुनरुज्जीवनाचे कार्य केवळ दीड वर्षात पूर्ण करण्यात आले व नवीन 34 बंधारे बांधले. विशेष म्हणजे यात उगमापासून लुप्त झालेल्या 22 किमी नदी पात्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले. दीडशे वर्षांनतर अग्रणी पुन्हा प्रवाहीत झाली व सुमारे 28 हजार शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये यामुळे आनंद निर्माण झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या कार्याची प्रेरणा घेवून कर्नाटकातील तीन गावांनी लोकवर्गणीतून हे कार्य पुढे चालवले आहे ही बाबही त्यांनी यावेळी अधोरेखीत केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीस साहेब तुमचे 53 आमदार निवडून आणले, आता आम्हाला विधान परिषदेवर संधी द्या, भटक्या विमुक्तांच्या 42 जातींची मागणी 
फडणवीस साहेब तुमचे 53 आमदार निवडून आणले, आता आम्हाला विधान परिषदेवर संधी द्या, भटक्या विमुक्तांच्या 42 जातींची मागणी 
Ratnagiri : रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रात दोन पर्यटक बुडाले, एकाचा मृत्यू तर एक बचावला
Ratnagiri : रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रात दोन पर्यटक बुडाले, एकाचा मृत्यू तर एक बचावला
Rohini Khadse: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स, रोहिणी खडसे म्हणाल्या, खरात कांड खूप मोठा, थेट अटक करा!
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स, रोहिणी खडसे म्हणाल्या, खरात कांड खूप मोठा, थेट अटक करा!
Amravati Crime News: दुचाकीवरून जाताना 5 युवकांनी अडविले, नंतर 18 वर्षीय तरुणीसोबत नको ते कृत्य, मित्रालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण; अमरावतीतील संतापजनक घटना
दुचाकीवरून जाताना 5 युवकांनी अडविले, नंतर 18 वर्षीय तरुणीसोबत नको ते कृत्य, मित्रालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण; अमरावतीतील संतापजनक घटना

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
Gold Silver Rate : 4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
Iran War Live Update: 'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
Aniket Varma: अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
Embed widget